शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

जिल्ह्यात ४०६ गावांत होणार हवामानावर आधारित शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:15 AM

हवामान बदलाने निर्माण होत असलेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊन पीक उत्पादकतेत वाढ करणे काळाची गरज बनली आहे. राज्य शासनाने जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू केला आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील ४०६ गावांची निवड करण्यात आली आहे. यात पहिल्या टप्प्यात ७७ गावांचा समावेश आहे.

ठळक मुद्दे१४,६०० अर्ज दाखल : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

औरंगाबाद : हवामान बदलाने निर्माण होत असलेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊन पीक उत्पादकतेत वाढ करणे काळाची गरज बनली आहे. राज्य शासनाने जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू केला आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील ४०६ गावांची निवड करण्यात आली आहे. यात पहिल्या टप्प्यात ७७ गावांचा समावेश आहे. उल्लेखनीय म्हणजे सततच्या दुष्काळाने होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांमध्येही जागरूकता निर्माण झाली असून, या प्रकल्पाचा फायदा घेण्यासाठी १४,६०० अर्ज प्राप्त झाले आहेत.६० ते ७० टक्के शेतकºयांची शेतीधारण क्षमता २.५ ते ३ एकर आहे. त्यामुळे मान्सूनवर अवलंबून असणारी शेती आणि त्यात कमी शेतीधारण क्षमता लक्षात घेता, यापुढील काळात हवामानावर आधारित शेती करणाºयांचाच टिकाव लागणार आहे. कमीत कमी जोखीम आणि जास्तीत जास्त शाश्वत उत्पादन, अशी शेती पद्धती अवलंबिणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन राज्य शासनाने जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू केला आहे. यासाठी ४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातील ७० टक्के रक्कम जागतिक बँक तर उर्वरित ३० टक्के रक्कम राज्य शासन उभारत आहे. यात मराठवाड्यातील ८, विदर्भातील ६, खान्देशातील १, अशी १५ जिल्ह्यांतील ५,१४२ गावांची निवड करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ४०६ गावांचा समावेश आहे. यात पहिल्या टप्प्यात ७७, दुसºया टप्प्यात १३५ व तिसºया टप्प्यात १३५ गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पात बांधावर वृक्ष लागवड, फळबाग, शेडनेट, पॉलिहाऊस, सामूहिक शेततळे, सुरक्षित शेती, बंदिस्त शेळीपालन, कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन, मत्स्य शेती, रेशीम शेती, गांडूळ युनिट, सेंद्रिय निविष्ठा युनिट, विहीर पुनर्भरण, इतर कृषी आधारित उद्योगांचा समावेश आहे. यासाठी कृषी विभागाच्या वतीने शेतकºयांसाठी मार्गदर्शन व अर्थसाह्य करण्यात येणार आहे. याकरिता ग्रामस्तरावर ५९ ग्राम कृषी संजीवनी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष सरपंच आहेत. तर १००३ सदस्य आहेत. प्रकल्पात सहभागी होण्यासाठी पहिल्या टप्प्यातील ७७ गावांतून १४,६०० शेतकºयांनी अर्ज सादर केले आहे. त्यातील १,७६१ जणांना पूर्व परवानगी दिली आहे. उर्वरित पूर्व परवानगी येत्या १५ दिवसांत देण्यात येणार आहे. \

कृषी विभागातील अधिकाºयांनी सांगितले की, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत नोंदणीकृत महिला बचत गट, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, भूमिहीन शेतमजूर गट यांना प्रकल्प उभारण्यासाठी ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

हवामान अनुकूल तंत्रज्ञान १६ शेतीशाळाहवामान अनुकूल तंत्रज्ञान शिकविण्यासाठी जिल्ह्यात शेतीशाळा सुरू झाल्या आहेत. यात औरंगाबाद तालुका-२, फुलंब्री- २, सिल्लोड- २, कन्नड-५, खुलताबाद- ३, गंगापूर- २, अशा एकूण १६ शेतीशाळा सुरू आहेत. प्रत्येक शेतीशाळेत ३० याप्रमाणे ४८० जण यात प्रशिक्षण घेत आहेत. यात माती परीक्षण, खत व्यवस्थापन, तंत्र व्यवस्थापन आदी विषयांचा समावेश आहे.

टॅग्स :agricultureशेतीAurangabadऔरंगाबाद