शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४०६ गावांत होणार हवामानावर आधारित शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:15 IST

हवामान बदलाने निर्माण होत असलेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊन पीक उत्पादकतेत वाढ करणे काळाची गरज बनली आहे. राज्य शासनाने जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू केला आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील ४०६ गावांची निवड करण्यात आली आहे. यात पहिल्या टप्प्यात ७७ गावांचा समावेश आहे.

ठळक मुद्दे१४,६०० अर्ज दाखल : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

औरंगाबाद : हवामान बदलाने निर्माण होत असलेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊन पीक उत्पादकतेत वाढ करणे काळाची गरज बनली आहे. राज्य शासनाने जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू केला आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील ४०६ गावांची निवड करण्यात आली आहे. यात पहिल्या टप्प्यात ७७ गावांचा समावेश आहे. उल्लेखनीय म्हणजे सततच्या दुष्काळाने होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांमध्येही जागरूकता निर्माण झाली असून, या प्रकल्पाचा फायदा घेण्यासाठी १४,६०० अर्ज प्राप्त झाले आहेत.६० ते ७० टक्के शेतकºयांची शेतीधारण क्षमता २.५ ते ३ एकर आहे. त्यामुळे मान्सूनवर अवलंबून असणारी शेती आणि त्यात कमी शेतीधारण क्षमता लक्षात घेता, यापुढील काळात हवामानावर आधारित शेती करणाºयांचाच टिकाव लागणार आहे. कमीत कमी जोखीम आणि जास्तीत जास्त शाश्वत उत्पादन, अशी शेती पद्धती अवलंबिणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन राज्य शासनाने जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू केला आहे. यासाठी ४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातील ७० टक्के रक्कम जागतिक बँक तर उर्वरित ३० टक्के रक्कम राज्य शासन उभारत आहे. यात मराठवाड्यातील ८, विदर्भातील ६, खान्देशातील १, अशी १५ जिल्ह्यांतील ५,१४२ गावांची निवड करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ४०६ गावांचा समावेश आहे. यात पहिल्या टप्प्यात ७७, दुसºया टप्प्यात १३५ व तिसºया टप्प्यात १३५ गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पात बांधावर वृक्ष लागवड, फळबाग, शेडनेट, पॉलिहाऊस, सामूहिक शेततळे, सुरक्षित शेती, बंदिस्त शेळीपालन, कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन, मत्स्य शेती, रेशीम शेती, गांडूळ युनिट, सेंद्रिय निविष्ठा युनिट, विहीर पुनर्भरण, इतर कृषी आधारित उद्योगांचा समावेश आहे. यासाठी कृषी विभागाच्या वतीने शेतकºयांसाठी मार्गदर्शन व अर्थसाह्य करण्यात येणार आहे. याकरिता ग्रामस्तरावर ५९ ग्राम कृषी संजीवनी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष सरपंच आहेत. तर १००३ सदस्य आहेत. प्रकल्पात सहभागी होण्यासाठी पहिल्या टप्प्यातील ७७ गावांतून १४,६०० शेतकºयांनी अर्ज सादर केले आहे. त्यातील १,७६१ जणांना पूर्व परवानगी दिली आहे. उर्वरित पूर्व परवानगी येत्या १५ दिवसांत देण्यात येणार आहे. \

कृषी विभागातील अधिकाºयांनी सांगितले की, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत नोंदणीकृत महिला बचत गट, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, भूमिहीन शेतमजूर गट यांना प्रकल्प उभारण्यासाठी ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

हवामान अनुकूल तंत्रज्ञान १६ शेतीशाळाहवामान अनुकूल तंत्रज्ञान शिकविण्यासाठी जिल्ह्यात शेतीशाळा सुरू झाल्या आहेत. यात औरंगाबाद तालुका-२, फुलंब्री- २, सिल्लोड- २, कन्नड-५, खुलताबाद- ३, गंगापूर- २, अशा एकूण १६ शेतीशाळा सुरू आहेत. प्रत्येक शेतीशाळेत ३० याप्रमाणे ४८० जण यात प्रशिक्षण घेत आहेत. यात माती परीक्षण, खत व्यवस्थापन, तंत्र व्यवस्थापन आदी विषयांचा समावेश आहे.

टॅग्स :agricultureशेतीAurangabadऔरंगाबाद