शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
5
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
6
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
7
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
8
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
9
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
10
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
11
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
12
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
13
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
14
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
15
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
16
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
17
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
18
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
19
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
20
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा

गुंठेवारीतील मालमत्ता नियमितीकरणाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:07 IST

औरंगाबाद : शहरातील गुंठेवारी वसाहतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना शासनाने बुधवारी मोठा दिलासा दिला आहे. गुंठेवारी विकास अधिनियम २००१ ची व्याप्ती ...

औरंगाबाद : शहरातील गुंठेवारी वसाहतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना शासनाने बुधवारी मोठा दिलासा दिला आहे. गुंठेवारी विकास अधिनियम २००१ ची व्याप्ती वाढवून ती ३१ डिसेंबर २०२० करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री सुभाष देसाई आणि खात्यांच्या सचिवांसमोर मनपाचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ३० डिसेंबर २०२० रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुंठेवारी वसाहतीबाबतचा प्रस्ताव ठेवला होता. त्या प्रस्तावावर शासनाने शिक्कामोर्तब केले आहे. या प्रस्तावात एमआरटीपी अ‍ॅक्टमधील तरतुदींचा आधार घेण्यात आला असून, एफएसआय वापर, प्रशमन शुल्क, विकासशुल्क, प्रीमियम आकारणीचा विचार करण्यात आला आहे. मूळ प्रस्ताव महापालिका नगररचना विभागाचा असला, तरी त्याला प्रभारी आयुक्त चव्हाण यांनी गती देत महसूल अधिनियम आणि नगररचना कायद्याच्या चौकटीत तो प्रस्ताव बसविला.

शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला ११८ वसाहतींमधील सुमारे सव्वा लाख घरांना नियमित करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. महापालिका हद्दीतील अनधिकृतपणे विकसित झालेली गुंठेवारीतील घरे नियमित करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली. या निर्णयामुळे ३१ डिसेंबर २०२० पर्यंत बांधलेली गुंठेवारीतील सुमारे सव्वा लाख घरे नियमित होण्याचा दावा करण्यात येत आहे.

२००८ सालच्या मंत्रिमंडळ बैठकीत दिला होता प्रस्ताव

२००८ साली स्व. विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या उपस्थितीत मराठवाड्याच्या अनुशेष अनुषंगाने मंत्रिमंडळाची बैठक औरंगाबादेत झाली होती. या बैठकीत तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री तथा ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी गुंठेवारी वसाहतींसाठी एका अभ्यासपूर्ण प्रस्तावात नागरी सुविधांबाबतची वस्तुस्थिती मांडली होती. त्या प्रस्तावावरून २००१ च्या कायद्यात सुधारणा करून लोकप्रतिनिधींना स्थानिक विकासनिधी गुंठेवारी वसाहतीत खर्च करण्याची अनुमती शासनाने दिली होती.

गुंठेवारी वसाहतीच्या नियमितीकरणाचा प्रवास असा

१९९९ पासून गुंठेवारी वसाहतींच्या अडचणी समोर येण्यास सुरुवात

२००१ ला गुंठेवारी अधिनियम आणला.

२००२ ला मनपाने ठराव घेऊन शासनाला पाठविला.

२००५ ला वसाहतींचा टोटल स्टेशन सर्व्हे करण्यात आला.

२००५ ला मालकीहक्काच्या पुराव्यांसाठी सवलत मिळाली.

२००८ ला मंत्रिमंडळ बैठकीसमोर प्रस्ताव ठेवण्यात आला.

२०१५ ला मनपा निवडणुकीच्या तोंडावर नियमितीकरणात सुधारणा

२०२० ला मूळ कायद्याची व्याप्ती वाढविण्याचा कायदेशीर प्रस्ताव.

२०२१ ला मंत्रिमंडळ बैठकीत नगररचना कायद्याचा आधार घेत अधिनियमात सुधारणा.

गुंठेवारी एक दृष्टिक्षेप असा

११८ वसाहती होत्या.

५४ वसाहती नवीन झाल्याचा अंदाज

१ लाख २५ हजारांहून अधिक घरे

५ लाखांच्या लोकसंख्येचे वास्तव्य