शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

मान्सूनपूर्वी स्वच्छता आवश्यक

By admin | Updated: May 14, 2014 23:54 IST

हिंगोली : शहरातील स्वच्छतेचा प्रश्न उन्हाळ्यात गंभीर झालेला असल्याने पावसाळ्यात त्याची तीव्रत्ता अधिक जाणवणार आहे.

 हिंगोली : शहरातील स्वच्छतेचा प्रश्न उन्हाळ्यात गंभीर झालेला असल्याने पावसाळ्यात त्याची तीव्रत्ता अधिक जाणवणार आहे. अस्वच्छतेमुळे पावसाळ्यापूर्वी शहराची स्वच्छता हाती घेणे महत्वाचे आहे. यामुळे मान्सूनच्या आगमनापूर्वी नगरपरिषदेने संपूर्ण शहर स्वच्छ करण्याची मागणी होत आहे. शहरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असून शहरातील नाल्या व गटारी तुंबल्या असल्याने जागोजागी कचर्‍याचे ढीग साचले आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांनी स्वच्छतागृहांचे आऊटलेट नाल्यात सोडून दिले आहेत. नाल्या तुंबल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला असून डासांच्या चाव्याने तापाचे रुग्ण वाढले आहेत. उकंड्यावर डुकरे व त्यांच्या पिलांचा मुक्त संचार वाढल्यामुळे स्वाईन फ्ल्यूचा धोका निर्माण झाला आहे. दसर्‍यासाठी राखीव असलेल्या रामलीला मैदानावर सर्वात मोठा उकंडा व कचरा डेपो तयार झाला आहे. जुने ग्रामीण पोलिस ठाणे, भाजी - मंडई, जुना सरकारी दवाखाना, तोफखाना, पेन्शनपुरा, मंगळवारा, शास्त्रीनगर, शिवाजीनगर, तलाब कट्टा आदी भागात कचरा रस्त्यावर टाकण्यात येत आहे. नगरपरिषदेच्या कचराकुंड्यांचा वापर नागरिक करण्याची गरज असताना अनेकजण ते टाळताना दिसतात व बेजबाबदारपणे वागतात. जुन्या शहरातील तोफखाना, मंगळवारा, भोईपुरा, कोमटी गल्ली, कासारवाडा, कुंभारवाडा, मंगळवारा, गाडीपुरा, पेशनपुरा, आंबिका टॉकीजजवळील भाग, भाजी मंडी, पोस्ट आॅफीस रोड, सिद्धार्थनगर आदी भागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. नाल्या व गटारी तुंबल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. नगरसेवक व स्वच्छता निरीक्षकांच्या दुर्लक्षाने सफाई कामगार थातूरमातूर नाल्या उपसून आपले कर्तव्य बजावतात. मुसळधार पावसामुळे गल्लीबोळात गटाराचे पाणी अनेक घरांत शिरते. आता मान्सून जवळ आला आहे म्हणून स्वच्छता मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे. नाल्या व गटारी तळापासून उपसण्याची गरज आहे. डासांच्या प्रार्दुभाव रोखण्यासाठी किटकनाशक व धूरफवारणी करण्याची आवश्यक आहे. त्यादृष्टीने नगरपरिषदेने नियोजन व अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)