शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्वी स्वच्छता आवश्यक

By admin | Updated: May 14, 2014 23:54 IST

हिंगोली : शहरातील स्वच्छतेचा प्रश्न उन्हाळ्यात गंभीर झालेला असल्याने पावसाळ्यात त्याची तीव्रत्ता अधिक जाणवणार आहे.

 हिंगोली : शहरातील स्वच्छतेचा प्रश्न उन्हाळ्यात गंभीर झालेला असल्याने पावसाळ्यात त्याची तीव्रत्ता अधिक जाणवणार आहे. अस्वच्छतेमुळे पावसाळ्यापूर्वी शहराची स्वच्छता हाती घेणे महत्वाचे आहे. यामुळे मान्सूनच्या आगमनापूर्वी नगरपरिषदेने संपूर्ण शहर स्वच्छ करण्याची मागणी होत आहे. शहरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असून शहरातील नाल्या व गटारी तुंबल्या असल्याने जागोजागी कचर्‍याचे ढीग साचले आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांनी स्वच्छतागृहांचे आऊटलेट नाल्यात सोडून दिले आहेत. नाल्या तुंबल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला असून डासांच्या चाव्याने तापाचे रुग्ण वाढले आहेत. उकंड्यावर डुकरे व त्यांच्या पिलांचा मुक्त संचार वाढल्यामुळे स्वाईन फ्ल्यूचा धोका निर्माण झाला आहे. दसर्‍यासाठी राखीव असलेल्या रामलीला मैदानावर सर्वात मोठा उकंडा व कचरा डेपो तयार झाला आहे. जुने ग्रामीण पोलिस ठाणे, भाजी - मंडई, जुना सरकारी दवाखाना, तोफखाना, पेन्शनपुरा, मंगळवारा, शास्त्रीनगर, शिवाजीनगर, तलाब कट्टा आदी भागात कचरा रस्त्यावर टाकण्यात येत आहे. नगरपरिषदेच्या कचराकुंड्यांचा वापर नागरिक करण्याची गरज असताना अनेकजण ते टाळताना दिसतात व बेजबाबदारपणे वागतात. जुन्या शहरातील तोफखाना, मंगळवारा, भोईपुरा, कोमटी गल्ली, कासारवाडा, कुंभारवाडा, मंगळवारा, गाडीपुरा, पेशनपुरा, आंबिका टॉकीजजवळील भाग, भाजी मंडी, पोस्ट आॅफीस रोड, सिद्धार्थनगर आदी भागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. नाल्या व गटारी तुंबल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. नगरसेवक व स्वच्छता निरीक्षकांच्या दुर्लक्षाने सफाई कामगार थातूरमातूर नाल्या उपसून आपले कर्तव्य बजावतात. मुसळधार पावसामुळे गल्लीबोळात गटाराचे पाणी अनेक घरांत शिरते. आता मान्सून जवळ आला आहे म्हणून स्वच्छता मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे. नाल्या व गटारी तळापासून उपसण्याची गरज आहे. डासांच्या प्रार्दुभाव रोखण्यासाठी किटकनाशक व धूरफवारणी करण्याची आवश्यक आहे. त्यादृष्टीने नगरपरिषदेने नियोजन व अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)