शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नागरी पाणीपुरवठा योजना बारगळली !

By admin | Updated: January 14, 2015 00:58 IST

लातूर : लोकसंख्येच्या प्रमाणात दरवर्षी नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाकडून नगरपालिकांना निधी देण्यात येतो.

लातूर : लोकसंख्येच्या प्रमाणात दरवर्षी नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाकडून नगरपालिकांना निधी देण्यात येतो. मात्र गेल्या तीन वर्षांपासून लातूर जिल्ह्यातील चारही नगरपालिकांचेप्रस्ताव राज्य शासनाकडे धूळ खात पडून आहेत. अहमदपूर नगरपालिकेने तर वारंवार पाठपुरावा करूनही या योजनेचा निधी शासनाकडून मिळू शकला नाही. परिणामी, ही योजनाच बारगळण्याच्या मार्गावर आहे.नागरी भागातील दलित वस्त्यांमध्ये पाणीपुरवठ्याची सोय करण्यासाठी नगरपालिकांमार्फत नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा योजना राबविण्यात येते. राज्य शासनाकडून त्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी पुरविला जातो. दलित वस्तीत पाणीपुरवठ्याची कामे करण्यासाठी स्थानिक समिती गठित करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. पाणीपुरवठा समितीच्या सभापतींच्या अध्यक्षतेखाली एक अशासकीय सदस्य, दोन मागासवर्गीय प्रतिनिधी, एक मागासवर्गीय नगरसेवक आदींचा या समितीत समावेश आहे. या समितीने सुचविलेल्या ठिकाणी पाणीपुरवठ्याची सोय करण्याचे या योजनेत अभिप्रेत आहे. प्रारंभी योजना सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील चारही नगरपालिकांना या योजनेअंतर्गत लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळाला. मात्र गेल्या तीन वर्षांपासून प्रस्ताव पाठवूनही निधी मिळत नाही. अहमदपूर नगरपालिकेलातीन वर्षांपूर्वी १० लाख रुपये मिळाले होते. परंतु, योजनेसाठी अटींमध्ये बदल करण्यात आला. जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मान्यता घेण्याची अट लादण्यात आली. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून प्रस्ताव पाठवूनही निधी मिळाला नाही. जिल्ह्यातील चारही पालिकांत ही स्थिती आहे.अहमदपूर नगरपालिकेच्या हद्दीतील दलित वस्त्यांमध्ये या योजनेतून प्रारंभी १० लाखांची कामे झाली होती. त्यामुळे या पालिकेने पुन्हा प्रस्ताव शासनाकडे सादर केले. ४जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मान्यता घेण्याची अट आल्यानंतरही प्रस्ताव सादर केला. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून या योजनेचा निधी अहमदपूर पालिकेला मिळू शकला नाही. त्यामुळे विनाकारण वेळ गेला. सभापतींच्या अध्यक्षतेखाली असलेल्या स्थानिक समितीने पाठपुरावा करूनही शासनाने निधी दिला नसल्याचे अहमदपूर पालिकेतील गटनेते डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले. ४अहमदपूर, औसा, निलंगा, उदगीर या चारही नगरपालिकांना या योजनेत निधी मिळू शकला नाही. शिवाय, निधी मिळत नसल्यामुळे नगरपालिकांनीही प्रस्ताव सादर करणे बंद केले आहे. नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा योजना वस्त्यांमध्ये राबविण्यासाठी समितीने सुचविलेल्या कामांसाठी जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मान्यतेची अट ठेवण्यात आली आहे. जीवन प्राधिकरणाकडून मान्यता मिळण्यास अडसर येतो. त्यावर मात करूनही प्रस्ताव दिले असताना शासनाकडून निधी मिळत नसल्याचे या पालिकांतील पाणीपुरवठा समितीच्या सभापतींचे म्हणणे आहे.