शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

शहराचा पाणीप्रश्न मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:29 IST

नांदेड शहराची तहान भागविणाºया विष्णूपुरी प्रकल्पाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रकल्पात ४५ दलघमीहून अधिक पाणी होते़ त्यामुळे नांदेडकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: नांदेड शहराची तहान भागविणाºया विष्णूपुरी प्रकल्पाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रकल्पात ४५ दलघमीहून अधिक पाणी होते़ त्यामुळे नांदेडकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे़पावसाने ओढ दिल्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पात केवळ अकरा दलघमी एवढा पाणीसाठा शिल्लक होता़ जिल्हाभरातील प्रकल्पांनीही तळ गाठला होता़ त्यामुळे आॅगस्टमध्येच हदगाव आणि हिमायतनगरमध्ये टँकर सुरु करण्यात आले होते़ त्याचप्रमाणेही शहरातही एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता़दरम्यान, गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे नांदेडकरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे़ विष्णूपुरी प्रकल्पात शुक्रवारी केवळ ११ दलघमी पाणी होते़ रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रकल्पात ४५ दलघमीपेक्षा अधिक पाणीसाठा झाला होता़ रात्री उशिरापर्यंत प्रकल्पात ८० दलघमीपर्यंत पाणी येईल असा अंदाज वर्तविण्यात आला होता़ त्यामुळे प्रकल्पाचे दरवाजे उघडण्याची तयारीही प्रशासनाने केली आहे़