शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

पहाटे ४ वाजता शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जायकवाडी पंपहाऊसजवळील १४०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला लागलेली गळती दुरुस्त करण्याचे काम पूर्ण झाल्यावर शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या ...

औरंगाबाद : जायकवाडी पंपहाऊसजवळील १४०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला लागलेली गळती दुरुस्त करण्याचे काम पूर्ण झाल्यावर शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत झाला. दुरुस्तीसाठी मनपाच्या पाणीपुरवठा विभागाला जवळपास १२ तास लागले. यावेळेत पंपहाऊस, मुख्य जलवाहिनीवरील ठिकठिकाणी सुरू असलेल्या गळत्याही बंद करण्यात आल्या.

औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या १४०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला जायकवाडी येथील पंपहाऊस जवळच मोठी गळती लागली होती. पंपहाऊसच्या परिसरात असलेल्या वीज उपकेंद्रात जलवाहिनीतून बाहेर पडणारे पाणी जाण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर दुरुस्तीचा निर्णय घेतला. १२ तासांचे शटडाऊन घेऊन कामही हाती घेतले. दरम्यानच्या काळात औरंगाबाद शहराचा जायकवाडीहून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे मुख्य जलवाहिनी कोरडी पडली. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर पंपहाऊस सुरू करुन पाणीपुरवठा देखील सुरू करण्यात आला. रिकाम्या जलवाहिनीतून पाण्याचा प्रवाह सुरू झाल्यामुळे जलवाहिनीतील हवेचा दाब वाढला आणि जायकवाडी ते औरंगाबाद दरम्यान मुख्य जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्ह फुटण्याच्या काही घटना घडल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली. फुटलेले एअर व्हॉल्व्ह लगेचच दुरुस्त करण्यात आले. रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान जायकवाडीहून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. शहरातील सर्व जलकुंभ भरल्यावर पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास शहरातील विविध भागांना पाणीपुरवठा करण्यात आला. शुक्रवारी शहराच्या ज्या भागांमध्ये पाणीपुरवठा झाला नाही, त्या भागांना शनिवारी पाणी देण्यात आले अशी माहिती धांडे यांनी दिली.