शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

वैजापूर शहरात चक्क देशी दारूच्या दुकानासमोर नवीन बसथांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:01 IST

शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकानंतर सर्वाधिक गजबजलेला परिसर म्हणून लक्ष्मी टॉकीजजवळील चौफुलीची ओळख आहे. औरंगाबाद- नाशिक महामार्गावरील बाहेरगावाहून येणाºया प्रवाशांना मध्यवर्ती ठरणारा हा चौक प्रवाशांसाठी आता असुरक्षित बनला आहे.

मोबीन खान ।लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकानंतर सर्वाधिक गजबजलेला परिसर म्हणून लक्ष्मी टॉकीजजवळील चौफुलीची ओळख आहे.औरंगाबाद- नाशिक महामार्गावरील बाहेरगावाहून येणाºया प्रवाशांना मध्यवर्ती ठरणारा हा चौक प्रवाशांसाठी आता असुरक्षित बनला आहे. कारण एसटी महामंडळाने सहा महिन्यांपूर्वी चौफुलीवरील बस थांबा बंद करुन चक्क देशी दारुच्या दुकानासमोरच हा नवीन बस थांबा बनविल्याने तिकडे दारुड्यांची नेहमीच जत्रा भरलेली असते.त्यामुळे विद्यार्थिनी व महिलांना या बस थांब्यावर असुरक्षित वाटत असून अनेक वेळा वैजापुरकरांनी एस.टी. महामंडळाकडे तक्रार केली, तरीही हा बस थांबा हलविण्यात आलेला नाही, हे विशेष.लक्ष्मी टॉकीजजवळ असलेला परिवहन महामंडळाचा बस थांबा सहा महिन्यांपूर्वी वाहतूक पोलिसांनी बंद पाडला. मात्र, महामंडळाच्या अधिकाºयांनी बस थांबा सुरक्षितस्थळी हलविण्याऐवजी चक्क लक्ष्मी टॉकीजपासून पाचशे मीटरच्या अंतरावर असलेल्या स्टेशन रस्त्यावरील देशी दारुच्या दुकानासमोर हा नवीन बस थांबा सुरु केल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, महाविद्यालयीन तरुणींना त्रास वाढला आहे. या ठिकाणी महिलांसोबत छेडछाड झाल्याच्या तक्रारी वाढत आहेत. दुपारी वा सायंकाळी येथे दारुड्यांची सतत रेलचेल असते.अशा असुरक्षित ठिकाणाहून प्रवास करण्यास प्रवाशांची तयारी नसते. त्यामुळेच ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी येथील थांबे टाळत असल्याचे सांगितले जाते. त्याचा फटका बसच्या प्रवासीसंख्येवर होत आहे. तरीही वैजापूर आगार त्याविषयी फार सकारात्मक दृष्टिकोन अवलंबत नसल्याचा आरोप केला जात आहे.च्एसटीतून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. खासगी स्पर्धेला तोंड देत असताना एसटीचा प्रवासी दूर जाऊ नये यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना केल्या जातात. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्याची मानसिकता वैजापूर आगाराची नसल्याचे समोर येत आहे.च्प्रवाशांच्या तक्रारीनंतर त्याची अंमलबजावणी काही दिवस केली जाते, त्यानंतर पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ असे चित्र पाहायला मिळत आहे.या महामार्गावर राज्य परिवहन महामंडळासाठी उत्पन्नाच्या दृष्टीने हा थांबा मोठा फायदेशीर आहे. दररोज या थांब्यावरून शेकडो प्रवाशांची ये-जा सुरू असते. ग्रामीण भागात आजही ‘वाट पाहीन पण एस.टी.नेच जाईन’ अशी प्रवाशांची मानसिकता आहे. तरीही बस चालक- वाहकांच्या उद्दामपणामुळे बस थांबत नसल्याने प्रवाशांना नाईलाजाने खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. याच थांब्यावरून करुणा निकेतन, सेंट मोनिका इंग्लिश स्कूल, हल्के दवानायक उर्दू शाळेचे शेकडो विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी जातात. मात्र दोन-दोन तास थांबूनही बस थांबत नसल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले.