शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

वैजापूर शहरात चक्क देशी दारूच्या दुकानासमोर नवीन बसथांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:01 IST

शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकानंतर सर्वाधिक गजबजलेला परिसर म्हणून लक्ष्मी टॉकीजजवळील चौफुलीची ओळख आहे. औरंगाबाद- नाशिक महामार्गावरील बाहेरगावाहून येणाºया प्रवाशांना मध्यवर्ती ठरणारा हा चौक प्रवाशांसाठी आता असुरक्षित बनला आहे.

मोबीन खान ।लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकानंतर सर्वाधिक गजबजलेला परिसर म्हणून लक्ष्मी टॉकीजजवळील चौफुलीची ओळख आहे.औरंगाबाद- नाशिक महामार्गावरील बाहेरगावाहून येणाºया प्रवाशांना मध्यवर्ती ठरणारा हा चौक प्रवाशांसाठी आता असुरक्षित बनला आहे. कारण एसटी महामंडळाने सहा महिन्यांपूर्वी चौफुलीवरील बस थांबा बंद करुन चक्क देशी दारुच्या दुकानासमोरच हा नवीन बस थांबा बनविल्याने तिकडे दारुड्यांची नेहमीच जत्रा भरलेली असते.त्यामुळे विद्यार्थिनी व महिलांना या बस थांब्यावर असुरक्षित वाटत असून अनेक वेळा वैजापुरकरांनी एस.टी. महामंडळाकडे तक्रार केली, तरीही हा बस थांबा हलविण्यात आलेला नाही, हे विशेष.लक्ष्मी टॉकीजजवळ असलेला परिवहन महामंडळाचा बस थांबा सहा महिन्यांपूर्वी वाहतूक पोलिसांनी बंद पाडला. मात्र, महामंडळाच्या अधिकाºयांनी बस थांबा सुरक्षितस्थळी हलविण्याऐवजी चक्क लक्ष्मी टॉकीजपासून पाचशे मीटरच्या अंतरावर असलेल्या स्टेशन रस्त्यावरील देशी दारुच्या दुकानासमोर हा नवीन बस थांबा सुरु केल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, महाविद्यालयीन तरुणींना त्रास वाढला आहे. या ठिकाणी महिलांसोबत छेडछाड झाल्याच्या तक्रारी वाढत आहेत. दुपारी वा सायंकाळी येथे दारुड्यांची सतत रेलचेल असते.अशा असुरक्षित ठिकाणाहून प्रवास करण्यास प्रवाशांची तयारी नसते. त्यामुळेच ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी येथील थांबे टाळत असल्याचे सांगितले जाते. त्याचा फटका बसच्या प्रवासीसंख्येवर होत आहे. तरीही वैजापूर आगार त्याविषयी फार सकारात्मक दृष्टिकोन अवलंबत नसल्याचा आरोप केला जात आहे.च्एसटीतून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. खासगी स्पर्धेला तोंड देत असताना एसटीचा प्रवासी दूर जाऊ नये यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना केल्या जातात. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्याची मानसिकता वैजापूर आगाराची नसल्याचे समोर येत आहे.च्प्रवाशांच्या तक्रारीनंतर त्याची अंमलबजावणी काही दिवस केली जाते, त्यानंतर पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ असे चित्र पाहायला मिळत आहे.या महामार्गावर राज्य परिवहन महामंडळासाठी उत्पन्नाच्या दृष्टीने हा थांबा मोठा फायदेशीर आहे. दररोज या थांब्यावरून शेकडो प्रवाशांची ये-जा सुरू असते. ग्रामीण भागात आजही ‘वाट पाहीन पण एस.टी.नेच जाईन’ अशी प्रवाशांची मानसिकता आहे. तरीही बस चालक- वाहकांच्या उद्दामपणामुळे बस थांबत नसल्याने प्रवाशांना नाईलाजाने खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. याच थांब्यावरून करुणा निकेतन, सेंट मोनिका इंग्लिश स्कूल, हल्के दवानायक उर्दू शाळेचे शेकडो विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी जातात. मात्र दोन-दोन तास थांबूनही बस थांबत नसल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले.