शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
2
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
3
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
4
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
5
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
6
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
7
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
8
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
9
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
10
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
11
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
12
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
13
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
14
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
15
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
16
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
17
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
18
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
19
Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 
Daily Top 2Weekly Top 5

वैजापूर शहरात चक्क देशी दारूच्या दुकानासमोर नवीन बसथांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:01 IST

शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकानंतर सर्वाधिक गजबजलेला परिसर म्हणून लक्ष्मी टॉकीजजवळील चौफुलीची ओळख आहे. औरंगाबाद- नाशिक महामार्गावरील बाहेरगावाहून येणाºया प्रवाशांना मध्यवर्ती ठरणारा हा चौक प्रवाशांसाठी आता असुरक्षित बनला आहे.

मोबीन खान ।लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकानंतर सर्वाधिक गजबजलेला परिसर म्हणून लक्ष्मी टॉकीजजवळील चौफुलीची ओळख आहे.औरंगाबाद- नाशिक महामार्गावरील बाहेरगावाहून येणाºया प्रवाशांना मध्यवर्ती ठरणारा हा चौक प्रवाशांसाठी आता असुरक्षित बनला आहे. कारण एसटी महामंडळाने सहा महिन्यांपूर्वी चौफुलीवरील बस थांबा बंद करुन चक्क देशी दारुच्या दुकानासमोरच हा नवीन बस थांबा बनविल्याने तिकडे दारुड्यांची नेहमीच जत्रा भरलेली असते.त्यामुळे विद्यार्थिनी व महिलांना या बस थांब्यावर असुरक्षित वाटत असून अनेक वेळा वैजापुरकरांनी एस.टी. महामंडळाकडे तक्रार केली, तरीही हा बस थांबा हलविण्यात आलेला नाही, हे विशेष.लक्ष्मी टॉकीजजवळ असलेला परिवहन महामंडळाचा बस थांबा सहा महिन्यांपूर्वी वाहतूक पोलिसांनी बंद पाडला. मात्र, महामंडळाच्या अधिकाºयांनी बस थांबा सुरक्षितस्थळी हलविण्याऐवजी चक्क लक्ष्मी टॉकीजपासून पाचशे मीटरच्या अंतरावर असलेल्या स्टेशन रस्त्यावरील देशी दारुच्या दुकानासमोर हा नवीन बस थांबा सुरु केल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, महाविद्यालयीन तरुणींना त्रास वाढला आहे. या ठिकाणी महिलांसोबत छेडछाड झाल्याच्या तक्रारी वाढत आहेत. दुपारी वा सायंकाळी येथे दारुड्यांची सतत रेलचेल असते.अशा असुरक्षित ठिकाणाहून प्रवास करण्यास प्रवाशांची तयारी नसते. त्यामुळेच ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी येथील थांबे टाळत असल्याचे सांगितले जाते. त्याचा फटका बसच्या प्रवासीसंख्येवर होत आहे. तरीही वैजापूर आगार त्याविषयी फार सकारात्मक दृष्टिकोन अवलंबत नसल्याचा आरोप केला जात आहे.च्एसटीतून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. खासगी स्पर्धेला तोंड देत असताना एसटीचा प्रवासी दूर जाऊ नये यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना केल्या जातात. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्याची मानसिकता वैजापूर आगाराची नसल्याचे समोर येत आहे.च्प्रवाशांच्या तक्रारीनंतर त्याची अंमलबजावणी काही दिवस केली जाते, त्यानंतर पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ असे चित्र पाहायला मिळत आहे.या महामार्गावर राज्य परिवहन महामंडळासाठी उत्पन्नाच्या दृष्टीने हा थांबा मोठा फायदेशीर आहे. दररोज या थांब्यावरून शेकडो प्रवाशांची ये-जा सुरू असते. ग्रामीण भागात आजही ‘वाट पाहीन पण एस.टी.नेच जाईन’ अशी प्रवाशांची मानसिकता आहे. तरीही बस चालक- वाहकांच्या उद्दामपणामुळे बस थांबत नसल्याने प्रवाशांना नाईलाजाने खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. याच थांब्यावरून करुणा निकेतन, सेंट मोनिका इंग्लिश स्कूल, हल्के दवानायक उर्दू शाळेचे शेकडो विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी जातात. मात्र दोन-दोन तास थांबूनही बस थांबत नसल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले.