शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
4
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
5
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
6
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
7
New Year 2026: २०२६ मध्ये तुमचे प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण; त्यासाठी वापरा '३६९ मॅनिफेस्टेशन' टेक्निक 
8
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
9
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
10
२०२५ वर्षाची सांगता: ७ राशींना शुभ काळ, धनलाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, इच्छापूर्तीचे उत्तम योग!
11
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
12
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
13
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
14
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
15
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
16
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
17
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
18
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
19
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
20
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

फसलेला प्रयोग शहरात

By admin | Updated: June 26, 2014 01:00 IST

औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने पथदिव्यांचे कंत्राट बीओटीवर बसविण्यासाठी चेन्नईतील एका कंपनीशी संपर्क सुरू केल्याचे वृत्त हाती आले आहे.

औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने पथदिव्यांचे कंत्राट बीओटीवर बसविण्यासाठी चेन्नईतील एका कंपनीशी संपर्क सुरू केल्याचे वृत्त हाती आले आहे. ७० ते ८० कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट असण्याची शक्यता आहे. त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभारणी आणि एलईडी बल्ब बसविण्याचे काम केले जाईल. एलईडीमध्ये वीज वाचेल आणि बल्बचा चांगला प्रकाश मिळेल, असा दावा पालिकेकडून केला जात आहे. पिंपरी- चिंचवड मनपात एलईडीचा प्रयोग फसला आहे. तेथे फसलेला प्रयोग औरंगाबाद मनपा का करीत आहे, असा प्रश्न आहे. वीनवॉक या नाशिक येथील कंत्राटदार कंपनीचा बीओटीवरील करार संपुष्टात आला आहे. त्यामुळे पालिकेने नवीन कंत्राटदाराचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी येत्या काही दिवसांमध्ये टेंडर निघणार असे पालिकेने ठरविल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कोरियन तंत्रज्ञानाने बनविलेल्या बल्बची चाचणी सध्या सुरू असून आयुक्त डॉ. कांबळे यांचे निवासस्थान, सिद्धार्थ, नेहरू बालोद्यान आणि जालना रोडवरील पथदिव्यांवर ते बल्ब बसविण्यात आले आहेत. उपअभियंत्यांना पदोन्नतीविद्युत विभागातील उपअभियंता पी.आर. बनसोडे यांना सेवानिवृत्तीसाठी अंदाजे १ वर्ष बाकी आहे. तत्पूर्वी, त्यांना कार्यकारी अभियंतापदी पदोन्नती देण्याच्या हालचाली सुरू आहेत. एलईडी प्रकल्पासाठीच त्यांना पदोन्नती देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. जुना वीज बचतीचा रेकॉर्ड नाहीवीनवॉक या संस्थेने एनर्जी सेव्हिंग फिटिंग दिली होती. त्यातून किती वीज वाचली, याचा रेकॉर्ड पालिकेच्या विद्युत विभागाकडे नाही. या प्रकरणी उपअभियंता पी.आर. बनसोडे यांना विचारले असता ते म्हणाले, त्याचे कॅल्क्युलेशन करावे लागेल. सहा कंपन्यांनी केला संपर्कआजवर ६ कंपन्यांनी पथदिवे बसवून देण्याबाबत पालिकेशी संपर्क केला. त्या सर्व कंपन्यांनी बल्ब बसवून देणार असल्याचे सांगितले.इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात त्या कंपन्यांनी रस दाखविला नाही. पालिकेला इन्फ्रास्ट्रक्चर आणि बल्ब बसवून देणारी कंपनी हवी आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये काय झालेपिंपरी- चिंचवड मनपाने एलईडी फिटिंगचा प्रकल्प दोन वर्षांपूर्वी राबविला. ४ बाय २४ असा तो प्रकल्प होता. त्यामध्ये वीज बचत होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. २५० ते २८० वॅटपर्यंच वीज त्या पथदिव्यांना लागली. पथदिवेनिहाय १५० ते १६० वॅटपर्यंत वीज लागल्याचे दाखविले गेले. त्यामध्ये पालिकेचे नुकसान होत असल्याचे समोर आले. त्यामुळे मनपाने एचपीएसव्हीची फिटिंग करण्याचा निर्णय घेतला.