शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

शहर पोलिसांना एसीपी-डीसीपी मिळेना

By admin | Updated: July 25, 2014 00:49 IST

निवृत्ती गवळी , औरंगाबाद औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेपासून डीसीपी-एसीपीसारख्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त राहण्याची परंपरा कायम आहे.

निवृत्ती गवळी , औरंगाबादऔरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेपासून डीसीपी-एसीपीसारख्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त राहण्याची परंपरा कायम आहे. शहरात पोलीस उपायुक्त (मुख्यालय) पद तीन महिन्यांपासून, तर गुन्हे शाखेचे सहायक आयुक्तांचे पद अडीच वर्षांपासून रिक्तच आहे. तिकडे ग्रामीण पोलीस दलातही उपअधीक्षक (गृह) पद भरले गेलेले नाही.पद रिक्त राहण्याचे कारण प्रशासकीय बाब सांगण्यात येत असली तरी वाढता कामाचा ताण, शहरात राजेंद्र सिंह आणि ग्रामीणला ईशू सिंधूसारखे शिस्तीचे कडक वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे बाहेरून पोलीस अधिकारी येथे सहजासहजी यायला धजावत नाही. परिणामी आहे त्या अधिकाऱ्यांकडूनच कामे करून घेतली जात आहेत. विशेष म्हणजे शहरात तब्बल ७ एसीपी असूनही गुन्हे शाखा पदाच्या लायकीचा एकही अधिकारी वरिष्ठांच्या नजरेत अजून तरी आलेला नाही. म्हणूनच की काय जमेल त्याप्रमाणे निरीक्षकच एसीपीचेही काम करीत आहेत.गुन्हेगारी वाढतेयजगाच्या नकाशावर आणि देशातील प्रमुख महानगरांपैकी संवेदनशील शहर म्हणून औरंगाबादचा उल्लेख होतो. शहरात रोज कोणता ना कोणता बंदोबस्त असतोच. राज्य व देशात काही गडबड झालीच तर येथे पोलिसांना अलर्ट राहावे लागते. दहशतवादाची पाळेमुळे औरंगाबादपर्यंत पोहोचलेली अनेक उदाहरणे समोर आली आहेत. दुसरीकडे चोऱ्या, खून, मंगळसूत्र चोरी, तोतये पोलीस, लूटमारसारख्या घटनांनी सामान्य नागरिकांबरोबर पोलिसांचीही झोप उडविली आहे. अशा वेळी तपासाच्या दृष्टीने गुन्हे शाखेकडून उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जाते.डीसीपी-एसीपीचा खो- खोचा खेळतत्कालीन पोलीस उपायुक्त (मुख्यालय) सोमनाथ घार्गे यांची २७ फेब्रुवारी २०१४ रोजी अमरावतीला बदली झाली. तेव्हापासून हे पद रिकामेच आहे. शहर गुन्हे शाखेचे तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त दीपकसिंग गौर फेब्रुवारी २०१२ मध्ये सेवानिवृत्त झाले. गेल्या अडीच वर्षांत गुन्हे शाखेला एसीपी मिळालेला नाही. नंतर अनेक एसीपींनी जिवाचा आटापिटा केला; पण तत्कालीन आणि वर्तमान, अशा दोन्ही पोलीस आयुक्तांनी एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे पदभार न देता पोलीस निरीक्षकावरच या पदाची जबाबदारी सोपविली जात आहे.वरिष्ठ-कनिष्ठ वादसध्या गुन्हे शाखेच्या एसीपीचा पदभार पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्याकडे आहे. शहरात सध्या ७ एसीपी कार्यरत आहेत, तर दुसरीकडे अनेक ठाण्यांचे निरीक्षक आघाव यांना वरिष्ठ आहेत. त्यामुळे आघाव यांना प्रभारी एसीपी म्हणून काम पाहणे अथवा करून घेणे कसरतीचे झाले आहे. म्हणूनच की काय जवळपास सर्वच शाखा आणि पोलीस ठाण्यात निरीक्षकांनी आपल्या नावाच्या पाटीवर ‘वरिष्ठ निरीक्षक’ असे आवर्जून लिहिणे सुरू केले आहे. परिणामी वरिष्ठ-कनिष्ठ असा नवाच वाद आता सुरू झाला आहे. यात मात्र, गुन्हेगार हात धुवून घेत आहेत.ग्रामीणचीही तीच अवस्थाऔरंगाबाद जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील महत्त्वाचे समजले जाणारे उपअधीक्षक (होम) पद गेल्या चार महिन्यांपासून रिक्त आहे. तत्कालीन उपअधीक्षक संदीप जाधव यांची चाळीसगावला बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी कोणालाही नेमणूक मिळालेली नाही. परिणामी चिकलठाणा ग्रामीणच्या उपअधीक्षक कल्पना बारावकर दोन्ही पदे सांभाळत आहेत. डीसीपी, एसीपी आणि डीवायएसपीची रिक्त पदे केव्हा भरली जाणार, असा प्रश्न आहे.