शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
3
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
4
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
5
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
6
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
7
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
8
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
9
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
10
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
11
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
12
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
13
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
14
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
15
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
16
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
17
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
18
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
19
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
20
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

शहर पोलिसांना एसीपी-डीसीपी मिळेना

By admin | Updated: July 25, 2014 00:49 IST

निवृत्ती गवळी , औरंगाबाद औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेपासून डीसीपी-एसीपीसारख्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त राहण्याची परंपरा कायम आहे.

निवृत्ती गवळी , औरंगाबादऔरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेपासून डीसीपी-एसीपीसारख्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त राहण्याची परंपरा कायम आहे. शहरात पोलीस उपायुक्त (मुख्यालय) पद तीन महिन्यांपासून, तर गुन्हे शाखेचे सहायक आयुक्तांचे पद अडीच वर्षांपासून रिक्तच आहे. तिकडे ग्रामीण पोलीस दलातही उपअधीक्षक (गृह) पद भरले गेलेले नाही.पद रिक्त राहण्याचे कारण प्रशासकीय बाब सांगण्यात येत असली तरी वाढता कामाचा ताण, शहरात राजेंद्र सिंह आणि ग्रामीणला ईशू सिंधूसारखे शिस्तीचे कडक वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे बाहेरून पोलीस अधिकारी येथे सहजासहजी यायला धजावत नाही. परिणामी आहे त्या अधिकाऱ्यांकडूनच कामे करून घेतली जात आहेत. विशेष म्हणजे शहरात तब्बल ७ एसीपी असूनही गुन्हे शाखा पदाच्या लायकीचा एकही अधिकारी वरिष्ठांच्या नजरेत अजून तरी आलेला नाही. म्हणूनच की काय जमेल त्याप्रमाणे निरीक्षकच एसीपीचेही काम करीत आहेत.गुन्हेगारी वाढतेयजगाच्या नकाशावर आणि देशातील प्रमुख महानगरांपैकी संवेदनशील शहर म्हणून औरंगाबादचा उल्लेख होतो. शहरात रोज कोणता ना कोणता बंदोबस्त असतोच. राज्य व देशात काही गडबड झालीच तर येथे पोलिसांना अलर्ट राहावे लागते. दहशतवादाची पाळेमुळे औरंगाबादपर्यंत पोहोचलेली अनेक उदाहरणे समोर आली आहेत. दुसरीकडे चोऱ्या, खून, मंगळसूत्र चोरी, तोतये पोलीस, लूटमारसारख्या घटनांनी सामान्य नागरिकांबरोबर पोलिसांचीही झोप उडविली आहे. अशा वेळी तपासाच्या दृष्टीने गुन्हे शाखेकडून उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जाते.डीसीपी-एसीपीचा खो- खोचा खेळतत्कालीन पोलीस उपायुक्त (मुख्यालय) सोमनाथ घार्गे यांची २७ फेब्रुवारी २०१४ रोजी अमरावतीला बदली झाली. तेव्हापासून हे पद रिकामेच आहे. शहर गुन्हे शाखेचे तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त दीपकसिंग गौर फेब्रुवारी २०१२ मध्ये सेवानिवृत्त झाले. गेल्या अडीच वर्षांत गुन्हे शाखेला एसीपी मिळालेला नाही. नंतर अनेक एसीपींनी जिवाचा आटापिटा केला; पण तत्कालीन आणि वर्तमान, अशा दोन्ही पोलीस आयुक्तांनी एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे पदभार न देता पोलीस निरीक्षकावरच या पदाची जबाबदारी सोपविली जात आहे.वरिष्ठ-कनिष्ठ वादसध्या गुन्हे शाखेच्या एसीपीचा पदभार पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्याकडे आहे. शहरात सध्या ७ एसीपी कार्यरत आहेत, तर दुसरीकडे अनेक ठाण्यांचे निरीक्षक आघाव यांना वरिष्ठ आहेत. त्यामुळे आघाव यांना प्रभारी एसीपी म्हणून काम पाहणे अथवा करून घेणे कसरतीचे झाले आहे. म्हणूनच की काय जवळपास सर्वच शाखा आणि पोलीस ठाण्यात निरीक्षकांनी आपल्या नावाच्या पाटीवर ‘वरिष्ठ निरीक्षक’ असे आवर्जून लिहिणे सुरू केले आहे. परिणामी वरिष्ठ-कनिष्ठ असा नवाच वाद आता सुरू झाला आहे. यात मात्र, गुन्हेगार हात धुवून घेत आहेत.ग्रामीणचीही तीच अवस्थाऔरंगाबाद जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील महत्त्वाचे समजले जाणारे उपअधीक्षक (होम) पद गेल्या चार महिन्यांपासून रिक्त आहे. तत्कालीन उपअधीक्षक संदीप जाधव यांची चाळीसगावला बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी कोणालाही नेमणूक मिळालेली नाही. परिणामी चिकलठाणा ग्रामीणच्या उपअधीक्षक कल्पना बारावकर दोन्ही पदे सांभाळत आहेत. डीसीपी, एसीपी आणि डीवायएसपीची रिक्त पदे केव्हा भरली जाणार, असा प्रश्न आहे.