शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

जालना शहरात काँग्रेसची उद्या दुष्काळ परिषद

By admin | Updated: August 23, 2015 23:44 IST

जालना : यंदा मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असून, त्यातही जालन्यातील स्थिती गंभीर आहे. मात्र, राज्य सरकाराचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप करून

जालना : यंदा मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असून, त्यातही जालन्यातील स्थिती गंभीर आहे. मात्र, राज्य सरकाराचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप करून दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण हे मंगळवारी जालना दौऱ्यावर येत आहेत. सायंकाळी ४ वाजता जालन्यात दुष्काळ परिषद होणार असल्याची माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे यांनी रविवारी पत्र परिषदेत दिली. डोंंगरे म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचा दुष्काळी दौरा मंठ्यापासून सुरू होणार आहे. परतूर तालुक्यातील आनंदवाडी येथे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे ते सांत्वन करणार आहेत. सुरेश जेथलिया यांची व स्व. बाबसाहेब आकात यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. जालना तालुक्यातील रामनगर येथील पीकस्थितीची पाहणी करणार आहे. त्यानंतर बोरखेडी येथे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत. सायंकाळी ४ वाजता जालन्यातील मातोश्री मंगलकार्यालयात दुष्काळी परिषद घेण्यात येणार आहे. यावेळी माजी मंत्री अब्दुल सत्तार, प्रदेश सरचिटणीस अरुण मुगदिया यांची प्रमुख उपस्थिती राहील. परिषदेनंतर विविध मागण्यांचे काँग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे डोंगरे यावेळी म्हणाले. माजी आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून बिहार राज्यासाठी तब्बल सव्वा लाख कोटींची मदत जाहीर केली. मात्र, महाराष्ट्र आणि त्यातही मराठवाड्यात भीषण दुष्काळी स्थिती असताना याकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप गोरंट्याल यांनी केला. गेल्या नऊ महिन्यांत फडणवीस सरकारने शेतकरी हिताचा कुठलाही ठोस कार्यक्रम राबविलेला नाही. या सरकारला शेतकऱ्यांचे दुख; दिसत नसून ते केवळ शहरी जनतेसाठीच असल्याची टीका करून विदर्भातील शेतकरी आत्महत्येचे लोण आता मराठवाड्यातही पोहोचल्याचे ते म्हणाले. आघाडी सरकारच्या कार्यकाळात राज्यातील शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई दिली, तर सध्याचे सरकार शेतकरीविरोधी असल्याचे गोरंट्याल म्हणाले. पत्र परिषदेस राम सावंत, नगरसेवक महावीर ढक्का, विनोद यादव, विजय चौधरी, जगदीश भरतीया उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)