शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
3
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
4
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
5
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
6
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
7
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
8
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
9
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
10
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
11
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
12
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
13
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
14
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
15
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
16
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
17
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
18
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
19
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
20
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...

धनगर समाजाच्या मोर्चाने शहर दणाणले

By admin | Updated: August 8, 2014 00:33 IST

उस्मानाबाद : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीसाठी ७ जुलै रोजी मोर्चा काढण्यात आला.

उस्मानाबाद : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीसाठी ७ जुलै रोजी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो धनगर समाज बांधव सहभागी झाले होते. आंदोलकांच्या गगनभेदी घोषणांनी शहर दणाणून निघाले.धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मागील पंधरा दिवसांपासून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ३१ जुलैपासून कमलाकर दाणे, संदीप वाघमोडे, यशवंत डोलारे, अनिल ठोंबरे यांनी अमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गुरूवारी धनगर समाज बांधवांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. दुपारी सव्वाएक वाजेच्या सुमारास मोर्चाला जिजाऊ चौक (बार्शी नाका) येथून प्रारंभ झाला. त्यानंतर हा मोर्चा भंडाऱ्याची उधळण करीत ढोल-ताशांच्या गजरात श्रीपतराव भोसले हायस्कूल, आर्य समाज चौक, शहर पोलिस ठाणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चामध्ये आरक्षण कृती समितीचे राज्य अध्यक्ष हनुमंत सुळ, सदस्य सुधाकर व्हट्टे, मच्छिंद्र ठवरे, डॉ. गोविंद कोकाटे, गणेश सोनटक्के, भारत डोलारे, दत्ता बंडगर, आश्रुबा कोळेकर, महानंद पैलवान, अ‍ॅड. खंडेराव चौरे, अभिमन्यु शेंडगे, राजाभाऊ वैद्य, बाळासाहेब खांडेकर, सुरेश कांबळे, गणेश एडके, राजाभाऊ देवकते, गोपने, मुसळे आदींसह हजारो समाजबांधव सहभागी झाले होते. आंदोलन पक्षाच्या विरोधात नाही : सूळधनगर समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचे आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंत सूळ यांनी यावेळी बोलताना नमूद केले. स्वातंत्र्याच्या साठ वर्षानंतरही शासनाने या समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच हे आंदोलन उभे करावे लागले. समाजबांधवांनी आरक्षणाचा लढा शांततेच्या मार्गाने लढावा, असे सांगतानाच धनगर समाजाचे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नसल्याचेही सूळ यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)