शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पायाभूत सुविधांसाठी सातारा- देवळाईकर खंडपीठात; राज्य शासन व महानगरपालिकेला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 11:59 IST

२८ ऑगस्ट २०१४ रोजी महाराष्ट्र शासनाने सातारा, देवळाई नगर परिषदेची स्थापना केली व त्यानंतर १४ मे २०१५ रोजी या नगर परिषदेचा संपूर्ण भाग औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केला.

औरंगाबाद : सातारा, देवळाईच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह इतर नागरी सुविधा त्वरित पुरवण्याची विनंती करणारी याचिका खंडपीठात दाखल झाली आहे. न्या. संजय गंगापूरवाला व न्या. एस. जी. दिघे यांनी राज्य शासन व महानगरपालिकेला नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

सुवर्णा लक्ष्मण शिंदे व राहुल कारभारी देशमुख यांनी ही याचिका ॲड. देवदत्त पालोदकर यांच्यामार्फत दाखल केली. याचिकेत म्हटल्यानुसार २८ ऑगस्ट २०१४ रोजी महाराष्ट्र शासनाने सातारा, देवळाई नगर परिषदेची स्थापना केली व त्यानंतर १४ मे २०१५ रोजी या नगर परिषदेचा संपूर्ण भाग औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केला. सातारा व देवळाई येथे ग्रामपंचायत असल्यापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. याविषयी नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत.

विशेष तरतूदमहाराष्ट्र शासनाच्या २७ मार्च २०१२ रोजीच्या निर्णयाप्रमाणे एखादा भाग नव्याने महानगरपालिकेत समाविष्ट झाला असेल तर, त्या परिसराच्या नागरी सुविधांचा विकास आराखडा तयार करून शासनास सादर करण्यात येतो. विशेष अर्थसहाय्य योजनेंतर्गत या सर्व कामांसाठी शासनाकडून ८० टक्के अनुदान देण्यात येते व मनपास केवळ २० टक्के खर्च उचलावा लागतो.

सातारा, देवळाईसाठी यापूर्वीच ४१५ कोटींचा विकास आराखडा तयार झाला असून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. मात्र मनपाच्या सर्वसाधारण सभेने ठराव करून शहराच्या सर्वच भागांसाठी नव्याने विकास आराखडा तयार करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे सातारा देवळाईची कामे रखडली आहेत.

शहराच्या समांतर जलवाहिनीचा अनुभव बघता एकत्रितरीत्या पाणीपुरवठा योजना तयार करून तिची अंमलबजावणी होण्यास बराच विलंब होईल. शासनाच्या धोरणाप्रमाणे सातारा देवळाईच्या नागरिकांना विशेष अर्थसहाय्य मिळते. त्यामुळे विकास आराखड्याची लगेच अंमलबजावणी करून सुविधा पुरविण्यात याव्यात व तसे आदेश राज्य शासन, तसेच महापालिकेस देण्यात यावेत, अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे. राज्य शासनाकडून ॲड. डी. आर. काळे काम पाहत आहेत.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabadऔरंगाबाद