शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पुलासाठी केले नागरिकांनी मुंडण

By admin | Updated: December 26, 2014 00:15 IST

औरंगाबाद : सातारा परिसरातील धोकादायक पुलासाठी जिल्हा प्रशासनाने डीपीटीसीमधून मंजुरी देऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला; परंतु अद्यापही काम सुरू होत नाही.

औरंगाबाद : सातारा परिसरातील धोकादायक पुलासाठी जिल्हा प्रशासनाने डीपीटीसीमधून मंजुरी देऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला; परंतु अद्यापही काम सुरू होत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या निषेधार्थ सातारा- देवळाई विकास संघर्ष कृती समितीने ‘कुठे नेऊन ठेवलाय पूल आमचा?’ म्हणत पुलावरच मुंडण आंदोलन केले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दोनदा पुलाचे उद्घाटनही झालेले आहे. मंजुरी झाली, टेंडर निघाले, अशी विविध प्रकारची आश्वासने नागरिकांना देणे सुरू आहे. नगर परिषद स्थापन झाली असून, निवडणुकीचे वेध लागले आहेत. तरीदेखील पुलाचा प्रश्न रेंगाळलेला आहे. या पुलावरून सुधाकरनगरकडे जाणाऱ्यांची मोठी वर्दळ असते. विविध सोसायट्या व शाळा, महाविद्यालय या भागात असल्याने शाळकरी मुलांची ने-आण करणाऱ्या वाहनांची संख्या या भागात सतत असते. पावसाळ्यात या पुलावर शाळकरी मुलांची बस अडकली होती. एक वाहन वाहून गेल्याने एकाचा प्राणही गेल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या धोकादायक पुलाची पाहणी करून जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी तात्काळ दोन पुलांना डीपीटीसीतून मंजुरी दिली आहे. दोन्ही पुलांचे उद्घाटन झाले; मात्र अद्याप कोणतेही काम सुरू झालेले नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी मुंडण आंदोलन केले.