शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
3
"गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
4
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
5
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
6
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
7
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
8
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
9
२०२५ची सांगता एकदशीने: २०२६मध्ये किती एकादशी? २ अधिक व्रतांची भर; पाहा, आषाढी-कार्तिकी तिथी
10
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
11
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
12
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
13
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
14
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
15
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
16
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
17
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
18
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
19
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
20
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
Daily Top 2Weekly Top 5

दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांच्या उड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:04 IST

औरंगाबाद : केंद्र शासनाकडून औरंगाबाद शहराला मुबलक प्रमाणात लसीचा साठा मिळत नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. शुक्रवारी रात्री ...

औरंगाबाद : केंद्र शासनाकडून औरंगाबाद शहराला मुबलक प्रमाणात लसीचा साठा मिळत नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. शुक्रवारी रात्री मनपाला फक्त ६ हजार डोस प्राप्त झाले. शनिवारी दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांनी प्रत्येक केंद्रावर अलोट गर्दी केली होती. अनेकांना टोकन न मिळाल्याने परत फिरावे लागले. रविवारी लसीकरण बंद राहणार आहे. लसींचा साठा प्राप्त झाला तरच सोमवारी लसीकरण होईल, अन्यथा नाही, अशी स्थिती आहे.

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी शहरातील ७० टक्के नागरिकांचे लसीकरण झालेच पाहिजे यादृष्टीने मनपा प्रशासन प्रयत्न करीत आहे; मात्र केंद्र शासनाकडून पुरेसे पाठबळ मिळायला तयार नाही. तुटपुंज्या स्वरूपात लसींचा साठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. दररोज २० हजार नागरिकांना डोस देण्याची व्यवस्था केलेली असताना फक्त ५ ते ६ हजार लसींचा साठा देण्यात येत आहे. शनिवारी लसीचा साठा मिळताच ३९ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था केली. सकाळपासून दुसरा डोस घेण्यासाठी केंद्रावर नागरिकांची गर्दी उसळली. पहिला डोस घेण्यासाठी कोविन अ‍ॅपवर ऑनलाइन नोंदणी करण्याची अट टाकण्यात आल्यामुळे पाच केंद्रांवर गर्दी झाली नाही. ६ हजार लसीचे वितरण प्रत्येक केंद्रावर दीडशे लसीप्रमाणे करण्यात आले. अवघ्या चार तासात केंद्रावरील लसींचा साठा संपला. केवळ २०० ते २५० लसी शिल्लक राहिल्या आहेत. दरम्यान, उद्या रविवार असल्यामुळे लसीकरणाला सुटी राहणार असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत साठा मिळाला तर सोमवारी लसीकरण शक्य आहे. अन्यथा सोमवारीही मोहीम बंद ठेवावी लागणार आहे.