शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

घरे वाचविण्यासाठी नागरिक एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:14 IST

रांजणगाव शेणपुंजी येथे घरे वाचविण्यासाठी नागरिक एकवटले असून, या संदर्भात रविवारी अतिक्रमणधारकांची बैठक घेण्यात आली.

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथे घरे वाचविण्यासाठी नागरिक एकवटले असून, या संदर्भात रविवारी अतिक्रमणधारकांची बैठक घेण्यात आली. बैठकीत मालमत्तेचे पुरावे गोळा करुन उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

वाळूज औद्योगिक वसाहत क्षेत्रातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या रांजणगाव शेणपुंजी गावातील अनेकांनी शासकीय गायरान व महार हाडोळा जमिनीवर अतिक्रमणे करुन पक्की घरे बांधली आहेत. येथील शासकीय गट क्रमांक २, ५५,७५, ७६, ७७,७८, ७९, ८२, ८३ व ८४ मधील जमिनीवर जवळपास ४ हजार घरे बांधली आहे. दरम्यान, हे अतिक्रमण हटविण्यासाठी सामाजिक कायकर्ते शेख सिंकदर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने अतिक्रमण काढण्याचे आदेश दीड महिन्यापूर्वी दिले आहेत.

तसेच ग्रामपंचायतीने अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरु केली आहे. विशेष म्हणजे या जागेवर ग्रामपंचायत कार्यालय, जि.प. शाळा, अंगणवाड्या, खाजगी शाळा आदीसह हजारो नागरिकांची घरे आहेत. याच बरोबर अनेकांनी छोटे-मोठे व्यवसाय सुरु केले आहेत. या संदर्भात कायदेशीर लढा उभारण्यासाठी शिवसेनेचे विभाग प्रमुख कैलास हिवाळे यांनी पुढाकार घेत रविवार अतिक्रमणधारकांची बैठक घेतली. यात अ‍ॅड. आर.यू.हनवते यांनी न्यायालयाच्या आदेशाविषयीची माहिती देवून उपस्थितांच्या शंकाचे निरसन केले. बैठकीला कैलास हिवाळे, गोरखनाथ लोहकरे, रावसाहेब भोसले, शिवराम ठोंबरे, भगवान साळुंखे, शेख जावेद, प्रदिप सवई, राजेश उनवणे आदींसह सुमारे ४०० नागरिकांची उपस्थिती होती.

टॅग्स :WalujवाळूजEnchroachmentअतिक्रमण