शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

घरे वाचविण्यासाठी नागरिक एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:14 IST

रांजणगाव शेणपुंजी येथे घरे वाचविण्यासाठी नागरिक एकवटले असून, या संदर्भात रविवारी अतिक्रमणधारकांची बैठक घेण्यात आली.

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथे घरे वाचविण्यासाठी नागरिक एकवटले असून, या संदर्भात रविवारी अतिक्रमणधारकांची बैठक घेण्यात आली. बैठकीत मालमत्तेचे पुरावे गोळा करुन उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

वाळूज औद्योगिक वसाहत क्षेत्रातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या रांजणगाव शेणपुंजी गावातील अनेकांनी शासकीय गायरान व महार हाडोळा जमिनीवर अतिक्रमणे करुन पक्की घरे बांधली आहेत. येथील शासकीय गट क्रमांक २, ५५,७५, ७६, ७७,७८, ७९, ८२, ८३ व ८४ मधील जमिनीवर जवळपास ४ हजार घरे बांधली आहे. दरम्यान, हे अतिक्रमण हटविण्यासाठी सामाजिक कायकर्ते शेख सिंकदर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने अतिक्रमण काढण्याचे आदेश दीड महिन्यापूर्वी दिले आहेत.

तसेच ग्रामपंचायतीने अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरु केली आहे. विशेष म्हणजे या जागेवर ग्रामपंचायत कार्यालय, जि.प. शाळा, अंगणवाड्या, खाजगी शाळा आदीसह हजारो नागरिकांची घरे आहेत. याच बरोबर अनेकांनी छोटे-मोठे व्यवसाय सुरु केले आहेत. या संदर्भात कायदेशीर लढा उभारण्यासाठी शिवसेनेचे विभाग प्रमुख कैलास हिवाळे यांनी पुढाकार घेत रविवार अतिक्रमणधारकांची बैठक घेतली. यात अ‍ॅड. आर.यू.हनवते यांनी न्यायालयाच्या आदेशाविषयीची माहिती देवून उपस्थितांच्या शंकाचे निरसन केले. बैठकीला कैलास हिवाळे, गोरखनाथ लोहकरे, रावसाहेब भोसले, शिवराम ठोंबरे, भगवान साळुंखे, शेख जावेद, प्रदिप सवई, राजेश उनवणे आदींसह सुमारे ४०० नागरिकांची उपस्थिती होती.

टॅग्स :WalujवाळूजEnchroachmentअतिक्रमण