शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी नागरिकांचे हाल

By admin | Updated: August 25, 2014 00:25 IST

वाळूज महानगर : चार दिवसांआड पाणी मिळत असल्याने जोगेश्वरीतील नागरिकांचे हाल सुरू आहेत.

वाळूज महानगर : चार दिवसांआड पाणी मिळत असल्याने जोगेश्वरीतील नागरिकांचे हाल सुरू आहेत. अपुऱ्या पाण्यामुळे भर पावसाळ्यातही हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी रहिवाशांना भटकंती करावी लागत आहे. स्थानिक प्रशासन ठोस पावले उचलत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. आयएसओ नामांकनाचे बिरुद लावून मिरविणारी जोगेश्वरी ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरत आहे. पाणीपट्टी वसूल करणारे प्रशासन नागरिकांना महिन्यातून केवळ ८ दिवसच पाणीपुरवठा करते. एमआयडीसीचे पाणी जोगेश्वरी वसाहतीतील आंबेडकरनगर, न्यू आंबेडकरनगर, गौतमनगर भागांसह मूळ गावाला चार दिवसांआड सोडले जाते, तेही कमी दाबाने. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. पाण्याची निश्चित वेळ नसल्यामुळे अनेकांना पाणीच मिळत नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना पायपीट करावी लागते. एमआयडीसीच्या गळक्या जलवाहिनीच्या खड्ड्यातून नागरिकांना पाणी आणावे लागते. पाण्यासाठी कामधंदे सोडून कंपनीच्या गेटवर व नळावर महिलांना व लहान मुलांना तासन्तास ताटकळत राहावे लागत असल्याने अनेकांना कामाला दांडी मारावी लागते. ग्रामपंचायतीची मनमानीपाणीपट्टीच्या निकषानुसार दररोज नळाला पाणी येणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत महिन्यातून आठच दिवस पाणी देते आणि संपूर्ण महिन्याची पाणीपट्टी सक्तीने वसूल करते. हा अन्याय आहे. ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांची नियमबाह्य मनमानी सुरू आहे. त्यांच्या मनमानीमुळेच नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत असल्याचे प्रवीण दुबिले यांनी सांगितले.ग्रा.पं.ने सर्वांना पाणी द्यावेमीना पनाड म्हणाल्या, ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांकडून सक्तीने पाणीपट्टी वसूल करते. मात्र, पुरेसे पाणी देत नाही. पाणी मिळत नसल्याने नागरिकांना रोजगार बुडवून पाणी भरावे लागते. त्यामुळे कामगारांचे नुकसान होत आहे. गावाला पाणी पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची आहे. त्यांनी ती पार पाडावी. पाईपलाईनचे काम सुरूपाणीपट्टी ही वार्षिक आकारणी आहे. एमआयडीसीकडून जेवढे पाणी मिळते. तेवढे पाणी आम्ही नागरिकांना देतो. सध्या जलवाहिनीचे काम सुरूअसल्याने पाण्याची अडचण भासत आहे; परंतु काम पूर्ण होताच सुरळीत पाणी मिळेल.जोगेश्वरीचे ग्रामविकास प्रकाश तुपे अधिकारी यांनी सांगितले.