शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
4
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
5
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
6
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
7
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
8
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
9
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
10
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
11
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
12
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
13
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
14
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
15
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
16
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
17
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
18
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
19
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
20
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?

पाण्यासाठी नागरिकांचे हाल

By admin | Updated: August 25, 2014 00:25 IST

वाळूज महानगर : चार दिवसांआड पाणी मिळत असल्याने जोगेश्वरीतील नागरिकांचे हाल सुरू आहेत.

वाळूज महानगर : चार दिवसांआड पाणी मिळत असल्याने जोगेश्वरीतील नागरिकांचे हाल सुरू आहेत. अपुऱ्या पाण्यामुळे भर पावसाळ्यातही हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी रहिवाशांना भटकंती करावी लागत आहे. स्थानिक प्रशासन ठोस पावले उचलत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. आयएसओ नामांकनाचे बिरुद लावून मिरविणारी जोगेश्वरी ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरत आहे. पाणीपट्टी वसूल करणारे प्रशासन नागरिकांना महिन्यातून केवळ ८ दिवसच पाणीपुरवठा करते. एमआयडीसीचे पाणी जोगेश्वरी वसाहतीतील आंबेडकरनगर, न्यू आंबेडकरनगर, गौतमनगर भागांसह मूळ गावाला चार दिवसांआड सोडले जाते, तेही कमी दाबाने. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. पाण्याची निश्चित वेळ नसल्यामुळे अनेकांना पाणीच मिळत नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना पायपीट करावी लागते. एमआयडीसीच्या गळक्या जलवाहिनीच्या खड्ड्यातून नागरिकांना पाणी आणावे लागते. पाण्यासाठी कामधंदे सोडून कंपनीच्या गेटवर व नळावर महिलांना व लहान मुलांना तासन्तास ताटकळत राहावे लागत असल्याने अनेकांना कामाला दांडी मारावी लागते. ग्रामपंचायतीची मनमानीपाणीपट्टीच्या निकषानुसार दररोज नळाला पाणी येणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत महिन्यातून आठच दिवस पाणी देते आणि संपूर्ण महिन्याची पाणीपट्टी सक्तीने वसूल करते. हा अन्याय आहे. ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांची नियमबाह्य मनमानी सुरू आहे. त्यांच्या मनमानीमुळेच नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत असल्याचे प्रवीण दुबिले यांनी सांगितले.ग्रा.पं.ने सर्वांना पाणी द्यावेमीना पनाड म्हणाल्या, ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांकडून सक्तीने पाणीपट्टी वसूल करते. मात्र, पुरेसे पाणी देत नाही. पाणी मिळत नसल्याने नागरिकांना रोजगार बुडवून पाणी भरावे लागते. त्यामुळे कामगारांचे नुकसान होत आहे. गावाला पाणी पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची आहे. त्यांनी ती पार पाडावी. पाईपलाईनचे काम सुरूपाणीपट्टी ही वार्षिक आकारणी आहे. एमआयडीसीकडून जेवढे पाणी मिळते. तेवढे पाणी आम्ही नागरिकांना देतो. सध्या जलवाहिनीचे काम सुरूअसल्याने पाण्याची अडचण भासत आहे; परंतु काम पूर्ण होताच सुरळीत पाणी मिळेल.जोगेश्वरीचे ग्रामविकास प्रकाश तुपे अधिकारी यांनी सांगितले.