शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांना पचनी पडेना ‘सिटीजन कनेक्ट’ ॲप; वर्षभरात अवघ्या ३९६ जणांचा वापर

By विजय सरवदे | Updated: September 15, 2023 19:09 IST

‘महा-ई-ग्राम सिटीजन कनेक्ट’ हे ॲप कार्यान्वित होऊन आता वर्षभराचा कालावधी होत आला आहे

छत्रपती संभाजीनगर : बदलत्या काळानुसार आता ग्रामपंचायतींचा कारभारही हायटेक झाला आहे. नागरिकांना मोबाइलच्या माध्यमातून घरबसल्या आपल्या मिळकतींना लागणारा कर, पाणीपट्टी भरता यावी, विविध प्रकारचे दाखले काढता यावेत, यासाठी ‘महा-ई-ग्राम सिटीजन कनेक्ट’ हे ॲप कार्यान्वित होऊन आता वर्षभराचा कालावधी होत आला आहे; पण जिल्ह्यातील नागरिकांना हे ‘ॲप’ फारसे पचनी पडलेले दिसत नाही. जिल्ह्यात ८६७ ग्रामपंचायती आहेत. यांपैकी अवघ्या २४ हजार ४८० नागरिकांनीच ‘महा-ई-ग्राम सिटीजन कनेक्ट’ ॲप आपल्या मोबाइलवर डाउनलोड करून घेतले असून, या ॲपच्या माध्यमातून केवळ ३९६ नागरिकांपैकी काहींनी कर भरला, तर काहींनी दाखले काढण्याचा व्यवहार केला असल्याची माहिती समोर आली आहे.

दैनंदिन कामाच्या धबडग्यात करभरणा किंवा आवश्यक दाखले काढण्यासाठी अनेकांना तेवढा वेळ नाही. हे लक्षात घेऊन शासनाने ग्रामपंचायतीचा करभरणा व दाखले काढण्यासाठी या ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्या. विशेष म्हणजे, आता जिल्हा पंचायत विभागाने घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यासाठी ‘क्यूआर कोड’चीही व्यवस्था केली आहे. ‘क्यूआर कोड’मुळे आर्थिक व्यवहार करणे अधिक सोपे झाले आहे. तरीही या तंत्रज्ञानाला नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीच्या आकडेवारीवरून दिसून येते.

मालमत्ता कराची वसुलीजिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे मालमत्ता कराची मार्च २०२३ पूर्वीची थकबाकी ३ कोटी ८२ लाख ३२ हजार एवढी असून, चालू आर्थिक वर्षातील मागणी ४३ कोटी ४२ लाख २६ हजार रुपये, असे मिळून एकूण ४७ कोटी २४ लाख ५८ हजार रुपये नागरिकांकडून वसूल करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, जुलै अखेरपर्यंत ५ कोटी २६ लाख ५ हजार रुपये अर्थात ११.१३ टक्के वसुली पूर्ण होऊ शकली.

पाणीपट्टीची तीन कोटींची वसुलीग्रामीण नागरिकांना नळ व हातपंपाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यानुसार ग्रामपंचायतींना वीज आणि देखभाल-दुरुस्तीवर खर्च करावा लागतो. त्यामुळे झालेला हा खर्च पाणीपट्टीच्या माध्यमातून वसूल केला जातो. मागील वर्षाची पाणीपट्टीची थकबाकी १ कोटी ५९ लाख १५ हजार रुपये असून, चालू आर्थिक वर्षातील मागणी १७ कोटी २० लाख रुपये आहे. तथापि, एकूण १८ कोटी ७९ लाख १५ हजार रुपये पाणीपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायतींकडून प्रयत्न सुरू असून, जुलैअखेरपर्यंत ३ कोटी ५ लाख ९२ हजार रुपये एवढीच वसुली पूर्ण झाली आहे. वसुलीची ही टक्केवारी १६.२८ टक्के एवढी आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMobileमोबाइलgram panchayatग्राम पंचायत