शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

नागरिकांना पचनी पडेना ‘सिटीजन कनेक्ट’ ॲप; वर्षभरात अवघ्या ३९६ जणांचा वापर

By विजय सरवदे | Updated: September 15, 2023 19:09 IST

‘महा-ई-ग्राम सिटीजन कनेक्ट’ हे ॲप कार्यान्वित होऊन आता वर्षभराचा कालावधी होत आला आहे

छत्रपती संभाजीनगर : बदलत्या काळानुसार आता ग्रामपंचायतींचा कारभारही हायटेक झाला आहे. नागरिकांना मोबाइलच्या माध्यमातून घरबसल्या आपल्या मिळकतींना लागणारा कर, पाणीपट्टी भरता यावी, विविध प्रकारचे दाखले काढता यावेत, यासाठी ‘महा-ई-ग्राम सिटीजन कनेक्ट’ हे ॲप कार्यान्वित होऊन आता वर्षभराचा कालावधी होत आला आहे; पण जिल्ह्यातील नागरिकांना हे ‘ॲप’ फारसे पचनी पडलेले दिसत नाही. जिल्ह्यात ८६७ ग्रामपंचायती आहेत. यांपैकी अवघ्या २४ हजार ४८० नागरिकांनीच ‘महा-ई-ग्राम सिटीजन कनेक्ट’ ॲप आपल्या मोबाइलवर डाउनलोड करून घेतले असून, या ॲपच्या माध्यमातून केवळ ३९६ नागरिकांपैकी काहींनी कर भरला, तर काहींनी दाखले काढण्याचा व्यवहार केला असल्याची माहिती समोर आली आहे.

दैनंदिन कामाच्या धबडग्यात करभरणा किंवा आवश्यक दाखले काढण्यासाठी अनेकांना तेवढा वेळ नाही. हे लक्षात घेऊन शासनाने ग्रामपंचायतीचा करभरणा व दाखले काढण्यासाठी या ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्या. विशेष म्हणजे, आता जिल्हा पंचायत विभागाने घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यासाठी ‘क्यूआर कोड’चीही व्यवस्था केली आहे. ‘क्यूआर कोड’मुळे आर्थिक व्यवहार करणे अधिक सोपे झाले आहे. तरीही या तंत्रज्ञानाला नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीच्या आकडेवारीवरून दिसून येते.

मालमत्ता कराची वसुलीजिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे मालमत्ता कराची मार्च २०२३ पूर्वीची थकबाकी ३ कोटी ८२ लाख ३२ हजार एवढी असून, चालू आर्थिक वर्षातील मागणी ४३ कोटी ४२ लाख २६ हजार रुपये, असे मिळून एकूण ४७ कोटी २४ लाख ५८ हजार रुपये नागरिकांकडून वसूल करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, जुलै अखेरपर्यंत ५ कोटी २६ लाख ५ हजार रुपये अर्थात ११.१३ टक्के वसुली पूर्ण होऊ शकली.

पाणीपट्टीची तीन कोटींची वसुलीग्रामीण नागरिकांना नळ व हातपंपाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यानुसार ग्रामपंचायतींना वीज आणि देखभाल-दुरुस्तीवर खर्च करावा लागतो. त्यामुळे झालेला हा खर्च पाणीपट्टीच्या माध्यमातून वसूल केला जातो. मागील वर्षाची पाणीपट्टीची थकबाकी १ कोटी ५९ लाख १५ हजार रुपये असून, चालू आर्थिक वर्षातील मागणी १७ कोटी २० लाख रुपये आहे. तथापि, एकूण १८ कोटी ७९ लाख १५ हजार रुपये पाणीपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायतींकडून प्रयत्न सुरू असून, जुलैअखेरपर्यंत ३ कोटी ५ लाख ९२ हजार रुपये एवढीच वसुली पूर्ण झाली आहे. वसुलीची ही टक्केवारी १६.२८ टक्के एवढी आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMobileमोबाइलgram panchayatग्राम पंचायत