शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
4
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
5
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
7
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
8
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
9
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
10
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
11
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
12
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
13
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
14
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
15
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
16
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
17
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
18
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
19
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
20
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?

तीन महिन्यांपासून ‘सीटीस्कॅन’ सुविधा बंद

By admin | Updated: June 18, 2016 00:52 IST

उस्मानाबाद : राज्याच्या आरोग्यमंत्र्यांकडे जिल्ह्याचे पालकत्व असले तरी जिल्ह्यातील आरोग्याच्या समस्या सुटताना दिसत नाहीत़

उस्मानाबाद : राज्याच्या आरोग्यमंत्र्यांकडे जिल्ह्याचे पालकत्व असले तरी जिल्ह्यातील आरोग्याच्या समस्या सुटताना दिसत नाहीत़ विशेषत: जिल्हा रूग्णालयातील समस्या कायम असून, येथील अती महत्त्वाचे असलेले ‘सीटीस्कॅन’ मशीन मागील तब्बल तीन-साडेतीन महिन्यांपासून बंद पडले आहे़ सीटीस्कॅन मशीन बंद पडल्याने अपघातासह इतर आजारातील रूग्णांना हजारो रूपये खर्च करून खासगी सेंटरवर सिटीस्कॅन करून घ्यावे लागत आहे़उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालयात शहरासह जिल्ह्याच्या विविध भागातून रूग्ण तपासणीसाठी येतात़ विविध शस्त्रक्रियांसह अचानक उद्भवलेल्या आरोग्याच्या समस्येसाठी प्रत्येकजण प्रारंभी जिल्हा रूग्णालय गाठून उपचार घेण्याला प्राधान्य देतो़ अपघातातील जखमी असो किंवा मेंदी, पोटाच्या आजारातील रूग्ण असोत या रूग्णांचे वेळप्रसंगी सिटीस्कॅन करावे लागते़ विशेषत: जिल्हा रूग्णालयात अपघातात जखमी होवून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे़ जिल्ह्यात दिवसाकाठी तीन-चार अपघात होतात़ तर जिल्हा रूग्णालयात एखादा तरी अपघातातील जखमी उपचारासाठी आणण्यात येत असल्याचे दिसून येते़ अपघात असो किंवा इतर आरोग्याची अचानक उद्भवलेली समस्या असो यात प्रत्येक सेकेंदाला, मिनिटाला महत्त्व दिले जाते़ अशा परिस्थितीत सिटीस्कॅन करून त्या जखमीच्या मेंदूला, डोक्याला गंभीर दुखापत झाली की नाही हे पाहून वैद्यकीय अधिकारी पुढील उपचार देतात़ मात्र, जिल्हा रूग्णालयातील सिटीस्कॅन मशीन मागील तीन-साडेतीन महिन्यांपासून बंद पडली आहे़ मशीन बंद पडल्यानंतर संबंधित कंपनीचे कर्मचारी येवून पाहणी करून गेले़ त्यांच्या सूचेनुसार जिल्हा रूग्णालयाकडून निधीसाठीचा प्रस्ताव लातूर येथील उपसंचालक कार्यालयाकडे तर तेथून मंत्रालयातील आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला़ या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यासच मोठा विलंब लागत असल्याने अद्यापही ही सिटीस्कॅन मशीन दुरूस्त झालेली नाही़ सिटीस्कॅन मशीन बंद असल्याने रूग्णांच्या नातेवाईकांना नाहक आर्थिक फटका बसत असून, मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे़राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे पालकत्व आहे़ त्याच जिल्ह्यातील सिटीस्कॅन मशीन तीन-तीन महिने दुरूस्त होत नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे़ मुंबईतून ‘व्हाया’ हैद्राबादमार्गे जिल्ह्यात प्रवेश करणारे पालकमंत्री जिल्हा रूग्णालयाला अत्याधुनिक यंत्रणा पुरविण्याकडे लक्ष देतील का ? असा प्रश्न विचारला जात आहे. (प्रतिनिधी)