शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांपासून ‘सीटीस्कॅन’ सुविधा बंद

By admin | Updated: June 18, 2016 00:52 IST

उस्मानाबाद : राज्याच्या आरोग्यमंत्र्यांकडे जिल्ह्याचे पालकत्व असले तरी जिल्ह्यातील आरोग्याच्या समस्या सुटताना दिसत नाहीत़

उस्मानाबाद : राज्याच्या आरोग्यमंत्र्यांकडे जिल्ह्याचे पालकत्व असले तरी जिल्ह्यातील आरोग्याच्या समस्या सुटताना दिसत नाहीत़ विशेषत: जिल्हा रूग्णालयातील समस्या कायम असून, येथील अती महत्त्वाचे असलेले ‘सीटीस्कॅन’ मशीन मागील तब्बल तीन-साडेतीन महिन्यांपासून बंद पडले आहे़ सीटीस्कॅन मशीन बंद पडल्याने अपघातासह इतर आजारातील रूग्णांना हजारो रूपये खर्च करून खासगी सेंटरवर सिटीस्कॅन करून घ्यावे लागत आहे़उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालयात शहरासह जिल्ह्याच्या विविध भागातून रूग्ण तपासणीसाठी येतात़ विविध शस्त्रक्रियांसह अचानक उद्भवलेल्या आरोग्याच्या समस्येसाठी प्रत्येकजण प्रारंभी जिल्हा रूग्णालय गाठून उपचार घेण्याला प्राधान्य देतो़ अपघातातील जखमी असो किंवा मेंदी, पोटाच्या आजारातील रूग्ण असोत या रूग्णांचे वेळप्रसंगी सिटीस्कॅन करावे लागते़ विशेषत: जिल्हा रूग्णालयात अपघातात जखमी होवून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे़ जिल्ह्यात दिवसाकाठी तीन-चार अपघात होतात़ तर जिल्हा रूग्णालयात एखादा तरी अपघातातील जखमी उपचारासाठी आणण्यात येत असल्याचे दिसून येते़ अपघात असो किंवा इतर आरोग्याची अचानक उद्भवलेली समस्या असो यात प्रत्येक सेकेंदाला, मिनिटाला महत्त्व दिले जाते़ अशा परिस्थितीत सिटीस्कॅन करून त्या जखमीच्या मेंदूला, डोक्याला गंभीर दुखापत झाली की नाही हे पाहून वैद्यकीय अधिकारी पुढील उपचार देतात़ मात्र, जिल्हा रूग्णालयातील सिटीस्कॅन मशीन मागील तीन-साडेतीन महिन्यांपासून बंद पडली आहे़ मशीन बंद पडल्यानंतर संबंधित कंपनीचे कर्मचारी येवून पाहणी करून गेले़ त्यांच्या सूचेनुसार जिल्हा रूग्णालयाकडून निधीसाठीचा प्रस्ताव लातूर येथील उपसंचालक कार्यालयाकडे तर तेथून मंत्रालयातील आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला़ या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यासच मोठा विलंब लागत असल्याने अद्यापही ही सिटीस्कॅन मशीन दुरूस्त झालेली नाही़ सिटीस्कॅन मशीन बंद असल्याने रूग्णांच्या नातेवाईकांना नाहक आर्थिक फटका बसत असून, मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे़राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे पालकत्व आहे़ त्याच जिल्ह्यातील सिटीस्कॅन मशीन तीन-तीन महिने दुरूस्त होत नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे़ मुंबईतून ‘व्हाया’ हैद्राबादमार्गे जिल्ह्यात प्रवेश करणारे पालकमंत्री जिल्हा रूग्णालयाला अत्याधुनिक यंत्रणा पुरविण्याकडे लक्ष देतील का ? असा प्रश्न विचारला जात आहे. (प्रतिनिधी)