शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

कोथिंबीरचा दर २०० रुपये किलोवर

By admin | Updated: July 13, 2014 00:25 IST

नांदेड : जुलैचा अर्धा महिना संपत आला तरी अद्याप पाऊस झाला नसल्याचा परिणाम भाजीबाजारावर जाणवू लागला असून कोथिंबीरचे दर तब्बल २०० रुपये किलोवर पोहोचले आहेत.

नांदेड : जुलैचा अर्धा महिना संपत आला तरी अद्याप पाऊस झाला नसल्याचा परिणाम भाजीबाजारावर जाणवू लागला असून कोथिंबीरचे दर तब्बल २०० रुपये किलोवर पोहोचले आहेत. यामुळे गृहिणीचे मात्र महिन्याचे बजेट कोलमडले आहे.नांदेड शहरातील विविध भाजी बाजारात भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने शेतकरी वर्गाला काही प्रमाणात दिलासा मिळत असला तरी ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागत आहे. मृग नक्षत्र सुरु होऊन सव्वा महिन्याचा कालावधी होत असताना पाऊस झाला नाही, याचा परिणाम भूगर्भातील पाणीपातळीत घट होत असल्याने उत्पन्न कमी होऊन बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. मागणी जास्त आणि आवक कमी यामुळे भाजीपाल्यांसह पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. सध्या असलेले भाजीपाल्याचे दर असे- कोथिंबीर २०० रु. किलो, बटाटे ४० रु.किलो, टोमॅटो ४० रु.किलो, हिरवी मिरची ८० रु.किलो, वांगी ६० रु.किलो, भेंडी ६० रु. शेवगा ६० रु.किलो, पालक १० रु. पाव, चुका १० रु.पाव, कोबी ८० रु.किलो याप्रमाणे दर आहेत.एप्रिल- मे महिन्यात बाजारात भाजीपाल्याची आवक जास्त असल्याने दरही आटोक्यात होते. मे मध्ये तर टोमॅटोचे दर २ रुपये किलोवर ेयेवून ठेपले होते, शेतकऱ्यांना तोडणी करुन विक्रीसाठी आणण्याचा खर्चही निघत नव्हता. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची तोडणी बंद करुन टोमॅटोच्या शेतीची नांगरटी करुन टाकली होती. मात्र आजघडीला टोमॅटोचे उत्पादन कमी झाल्याने ६०० ते ७०० रुपये कॅरेट (प्रति २० किलो) याप्रमाणे दर मिळत आहेत. उपलब्ध पाणीसाठा कमी झाल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली नाही. याचा परिणाम होवून सर्वच भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. (प्रतिनिधी)