शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

कोथिंबीरचा दर २०० रुपये किलोवर

By admin | Updated: July 13, 2014 00:25 IST

नांदेड : जुलैचा अर्धा महिना संपत आला तरी अद्याप पाऊस झाला नसल्याचा परिणाम भाजीबाजारावर जाणवू लागला असून कोथिंबीरचे दर तब्बल २०० रुपये किलोवर पोहोचले आहेत.

नांदेड : जुलैचा अर्धा महिना संपत आला तरी अद्याप पाऊस झाला नसल्याचा परिणाम भाजीबाजारावर जाणवू लागला असून कोथिंबीरचे दर तब्बल २०० रुपये किलोवर पोहोचले आहेत. यामुळे गृहिणीचे मात्र महिन्याचे बजेट कोलमडले आहे.नांदेड शहरातील विविध भाजी बाजारात भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने शेतकरी वर्गाला काही प्रमाणात दिलासा मिळत असला तरी ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागत आहे. मृग नक्षत्र सुरु होऊन सव्वा महिन्याचा कालावधी होत असताना पाऊस झाला नाही, याचा परिणाम भूगर्भातील पाणीपातळीत घट होत असल्याने उत्पन्न कमी होऊन बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. मागणी जास्त आणि आवक कमी यामुळे भाजीपाल्यांसह पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. सध्या असलेले भाजीपाल्याचे दर असे- कोथिंबीर २०० रु. किलो, बटाटे ४० रु.किलो, टोमॅटो ४० रु.किलो, हिरवी मिरची ८० रु.किलो, वांगी ६० रु.किलो, भेंडी ६० रु. शेवगा ६० रु.किलो, पालक १० रु. पाव, चुका १० रु.पाव, कोबी ८० रु.किलो याप्रमाणे दर आहेत.एप्रिल- मे महिन्यात बाजारात भाजीपाल्याची आवक जास्त असल्याने दरही आटोक्यात होते. मे मध्ये तर टोमॅटोचे दर २ रुपये किलोवर ेयेवून ठेपले होते, शेतकऱ्यांना तोडणी करुन विक्रीसाठी आणण्याचा खर्चही निघत नव्हता. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची तोडणी बंद करुन टोमॅटोच्या शेतीची नांगरटी करुन टाकली होती. मात्र आजघडीला टोमॅटोचे उत्पादन कमी झाल्याने ६०० ते ७०० रुपये कॅरेट (प्रति २० किलो) याप्रमाणे दर मिळत आहेत. उपलब्ध पाणीसाठा कमी झाल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली नाही. याचा परिणाम होवून सर्वच भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. (प्रतिनिधी)