शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सिडको वाळूज महानगरात सिडको प्रशासनाकडून लोकशाही दिनाला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 19:21 IST

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात सुरु असलेल्या लोकशाही दिनाला प्रशासनाने खो दिला आहे. दोन-तीन महिन्यांपासून लोकशाही दिन बंद आहे. वरिष्ठ अधिकारीही इकडे फिरकत नसल्याने नागरिकांच्या समस्येचा निपटारा होत नाही. त्यामुळे नागरिकांतून नाराजीचा सूर आळवला जात असून, पुन्हा लोकशाही दिन सुरु करण्याची मागणी केली जात आहे.

वाळूज महानगर : सिडकोवाळूज महानगरात सुरु असलेल्या लोकशाही दिनाला प्रशासनाने खो दिला आहे. दोन-तीन महिन्यांपासून लोकशाही दिन बंद आहे. वरिष्ठ अधिकारीही इकडे फिरकत नसल्याने नागरिकांच्या समस्येचा निपटारा होत नाही. त्यामुळे नागरिकांतून नाराजीचा सूर आळवला जात असून, पुन्हा लोकशाही दिन सुरु करण्याची मागणी केली जात आहे.

सिडको वाळूज महानगरात वास्तव्यास असणारे नागरिक व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न व नागरी समस्या स्थानिक पातळीवरच सोडविता याव्या. तसेच लोकांशी संपर्क रहावा यासाठी तत्कालीन मुख्य प्रशासक ओमप्रकाश बकोरिया यांनी लोकशाही दिन घेण्याचा निर्णय घेतला. दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी येथील सिडको कार्यालयात लोकशाही दिन घेवून नागरिकांच्या समस्यांचा निपटारा केला जात होता. प्राप्त तक्रारीचा पुढील लोकशाही दिनात संबंधित अधिकाºयाला खुलासा करावा लागत असल्याने अधिकारीही तक्रारीची गांभिर्याने दखल घेवून नागरिकांचे प्रश्न मार्गी लागत. स्वत: बकोरिया हजर रहात असल्याने लोकशाही दिनाला नागरिकही मोठ्या संख्येने हजर रहायचे. मात्र, बकोरिया यांची बदली होताच प्रशासनाला लोकशाही दिनाचा विसर पडला. दोन ते तीन महिन्यांपासून तर लोकशाही दिन बंदच झाला आहे.

महिन्याच्या शेवटच्या सोमवारी अनेक नागरिक तक्रारी घेवून कार्यालयात येतात. पण जबाबदार वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना रिकाम्या हातांनी परतावे लागत आहे. लोकशाही दिन बंद झाल्यामुळे स्थानिक अधिकारी वरिष्ठांनी सूचना देवूनही नागरी समस्या सोडविण्यास स्वारस्य दाखवत नाहीत. मुख्य प्रशासक मधुकर आर्दड हे ही वाळूज कार्यालयात अपवादानेच येतात. त्यामुळे येथील अधिकाºयावर वरिष्ठ अधिकाºयाचा म्हणावा तसा वचक राहिलेला नाही. अनेकवेळा अधिकारी कार्यालयातही हजर रहात नाहीत.

त्यामुळे बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र, नोंद करणे आदी कामासाठी नागरिकांना कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. पाणी, ड्रेनेज, लाईट आदी समस्याकडेही अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे. बंद केलेला लोकशाही दिन पुन्हा सुरु करुन स्थानिक पातळीवर समस्या सोडवाव्यात, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. यासंदर्भात सिडकोचे प्रशासक पंजाबराव चव्हाण म्हणाले की, लोकशाही दिन हे जिल्हाधिकारी व आयुक्तांच्या अखत्यारित असलेला विषय असल्याने तो बंद करण्यात आला आहे.एखाद्या अधिका-याने समस्या सोडविण्यास टाळाटाळ केली तर वरिष्ठ अधिकारी संबंधिताची खरडपट्टी काढायचे. त्यामुळे वेळेत प्रश्न मार्गी लागत. आता वरिष्ठ अधिकाºयाचा वचर राहिला नसल्याने अधिकारी नागरिकांच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करित आहेत. विकसित केलेल्या भागात समस्येचा महापूर आहे. तरीही प्रशासनाकडून सेवा दिल्या जात नाहीत, असा आरोप रहिवासी दत्तात्रय वर्पे यांनी केला आहे.

टॅग्स :cidcoसिडकोWalujवाळूज