शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सिडको वाळूज महानगरात सिडको प्रशासनाकडून लोकशाही दिनाला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 19:21 IST

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात सुरु असलेल्या लोकशाही दिनाला प्रशासनाने खो दिला आहे. दोन-तीन महिन्यांपासून लोकशाही दिन बंद आहे. वरिष्ठ अधिकारीही इकडे फिरकत नसल्याने नागरिकांच्या समस्येचा निपटारा होत नाही. त्यामुळे नागरिकांतून नाराजीचा सूर आळवला जात असून, पुन्हा लोकशाही दिन सुरु करण्याची मागणी केली जात आहे.

वाळूज महानगर : सिडकोवाळूज महानगरात सुरु असलेल्या लोकशाही दिनाला प्रशासनाने खो दिला आहे. दोन-तीन महिन्यांपासून लोकशाही दिन बंद आहे. वरिष्ठ अधिकारीही इकडे फिरकत नसल्याने नागरिकांच्या समस्येचा निपटारा होत नाही. त्यामुळे नागरिकांतून नाराजीचा सूर आळवला जात असून, पुन्हा लोकशाही दिन सुरु करण्याची मागणी केली जात आहे.

सिडको वाळूज महानगरात वास्तव्यास असणारे नागरिक व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न व नागरी समस्या स्थानिक पातळीवरच सोडविता याव्या. तसेच लोकांशी संपर्क रहावा यासाठी तत्कालीन मुख्य प्रशासक ओमप्रकाश बकोरिया यांनी लोकशाही दिन घेण्याचा निर्णय घेतला. दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी येथील सिडको कार्यालयात लोकशाही दिन घेवून नागरिकांच्या समस्यांचा निपटारा केला जात होता. प्राप्त तक्रारीचा पुढील लोकशाही दिनात संबंधित अधिकाºयाला खुलासा करावा लागत असल्याने अधिकारीही तक्रारीची गांभिर्याने दखल घेवून नागरिकांचे प्रश्न मार्गी लागत. स्वत: बकोरिया हजर रहात असल्याने लोकशाही दिनाला नागरिकही मोठ्या संख्येने हजर रहायचे. मात्र, बकोरिया यांची बदली होताच प्रशासनाला लोकशाही दिनाचा विसर पडला. दोन ते तीन महिन्यांपासून तर लोकशाही दिन बंदच झाला आहे.

महिन्याच्या शेवटच्या सोमवारी अनेक नागरिक तक्रारी घेवून कार्यालयात येतात. पण जबाबदार वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना रिकाम्या हातांनी परतावे लागत आहे. लोकशाही दिन बंद झाल्यामुळे स्थानिक अधिकारी वरिष्ठांनी सूचना देवूनही नागरी समस्या सोडविण्यास स्वारस्य दाखवत नाहीत. मुख्य प्रशासक मधुकर आर्दड हे ही वाळूज कार्यालयात अपवादानेच येतात. त्यामुळे येथील अधिकाºयावर वरिष्ठ अधिकाºयाचा म्हणावा तसा वचक राहिलेला नाही. अनेकवेळा अधिकारी कार्यालयातही हजर रहात नाहीत.

त्यामुळे बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र, नोंद करणे आदी कामासाठी नागरिकांना कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. पाणी, ड्रेनेज, लाईट आदी समस्याकडेही अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे. बंद केलेला लोकशाही दिन पुन्हा सुरु करुन स्थानिक पातळीवर समस्या सोडवाव्यात, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. यासंदर्भात सिडकोचे प्रशासक पंजाबराव चव्हाण म्हणाले की, लोकशाही दिन हे जिल्हाधिकारी व आयुक्तांच्या अखत्यारित असलेला विषय असल्याने तो बंद करण्यात आला आहे.एखाद्या अधिका-याने समस्या सोडविण्यास टाळाटाळ केली तर वरिष्ठ अधिकारी संबंधिताची खरडपट्टी काढायचे. त्यामुळे वेळेत प्रश्न मार्गी लागत. आता वरिष्ठ अधिकाºयाचा वचर राहिला नसल्याने अधिकारी नागरिकांच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करित आहेत. विकसित केलेल्या भागात समस्येचा महापूर आहे. तरीही प्रशासनाकडून सेवा दिल्या जात नाहीत, असा आरोप रहिवासी दत्तात्रय वर्पे यांनी केला आहे.

टॅग्स :cidcoसिडकोWalujवाळूज