बदनापूर : राज्यातील ग्रामपंचायत व नगरपंचायतचे सरपंच व नगराध्यांच्या निवडणुका थेट जनतेतून घेण्याची व त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी शेतकरी क्रांती सेनेच्या वतीने मुखयमंत्र्यांकडे करण्यात आली आहे याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या पक्षाच्या वतीने एक निवेदन पाठविण्यात आले असून त्यामध्ये नमूद केले की गावचा व गावातील नागरिकांचा विकास करणारी जवळची संस्था म्हणजेच ग्रामपंचायती व नगरपंचायती असून त्यांचा प्रमुख असलेले सरपंच व नगराध्यक्ष ही पदे सदस्यांमधून निवडल्या जात असल्यामुळे सदरील पद हे स्थानिक सदस्यांच्या नियंत्रणात राहून ते आपल्या मनमानी कारभार करतात. जेणेकरून सरपंच व नगराध्यक्ष यांना विकास कामे करताना अडथळा निर्माण होतो व यामुळे जनतेचा पैसा व वेळ वाया जात असून ग्रामीण महाराष्ट्र हा विकासापासुन कोसो दुर जात आहे. या पदांवरील व्यक्तींना भरीव स्वरूपाचे मानधन देण्यात यावे,अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर या पक्षाचे अध्यक्ष रामभाऊ उणगे बाबासाहेब खैरे,अप्पासाहेब कोल्हे,ज्ञानेश्वर इंदलकर,रामराव शिर्के आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत
सरपंच व नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडा
By admin | Updated: August 18, 2015 00:50 IST