शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

चिकलठाणा एमआयडीसीची दररोज वीज गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 23:17 IST

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत महिनाभरापासून दररोज एक ते तीन तास वीजपुरवठा बंद पडत असल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. तासन्तास मशीन बंद होत असल्याने वेळेवर आॅर्डर पूर्ण करून देता येत नसल्याने नवीन काम मिळण्यावर परिणाम होत आहे.

ठळक मुद्देपरिणाम : महिनाभरापासून उद्योजक त्रास्त, उत्पादनावर परिणाम

औरंगाबाद : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत महिनाभरापासून दररोज एक ते तीन तास वीजपुरवठा बंद पडत असल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. तासन्तास मशीन बंद होत असल्याने वेळेवर आॅर्डर पूर्ण करून देता येत नसल्याने नवीन काम मिळण्यावर परिणाम होत आहे.चिकलठाणा औद्योगिक वसाहत शासनाला कोट्यवधीचा महसूल देत आहे. मात्र, या परिसरात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण राहिले नाही. येथील उद्योजक पैसा लावण्यास तयार आहेत, अत्याधुनिक मशीन आहेत, कामगारही सज्ज आहेत; पण वीजपुरवठा नसल्याने सर्व काम ठप्प पडत आहे. मागील महिनाभरापासून दररोज कोणत्या ना कोणत्या फिडरवर एक ते तीन तास वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे कंपनीतील सर्व काम ठप्प पडत आहे. यासंदर्भात उद्योजक किशोर राठी यांनी सांगितले की, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत असंख्य अडचणींना तोंड देत येथील कंपन्या तग धरून आहेत. कोट्यवधीचा महसूल या परिसरातून शासनाला प्राप्त होतो; पण त्या तुलनेत या वसाहतीत मूलभूत सुविधा पुरविण्यात शासनाला अपयश येत आहे. दररोज येथील उद्योगांना नवनवीन समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मागील महिनाभरापासून या परिसरातील वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे वेळेवर उत्पादन तयार करून आॅर्डर पूर्ण करणे कठीण जात आहे. परिणामी, नवीन आॅर्डर मिळण्यास विलंब होत आहे. याचा परिणाम, येथील उलाढालीवर होत आहे. उद्योजक मनीष अग्रवाल म्हणाले की, दररोेज एक ते तीन तास वीजपुरवठा बंद पडला की, पुन्हा मशीन सुरू होऊन काम सुरळीत होण्यास एक ते दीड तास लागतो. यात विनाकारणच वेळ व पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. तासन्तास कामगार बसून राहत आहेत. मागील अनेक दिवसांपासून महावितरण फॉल्ट शोधत आहे; पण यश येत नाही. लवकरात लवकर फॉल्ट शोधून वीजपुरवठा अखंडित करावा, असे आवाहन आम्हा सर्व उद्योगाजकांच्या वतीने करण्यात आले आहे.दिवसेंदिवस काम करणे कठीणमागील महिनाभरापासून कधी इंडस्ट्रिअल फिडर १, कधी फिडर २, तर कधी रेडिएन्ट फिडर, अशा तीन फिडरवरील वीजपुरवठा आलटूनपालटून बंद होत आहे. पूर्वी दिवसातून अर्धातास वीजपुरवठा खंडित होत असे. आता तो २ ते ३ तास खंडित होत आहे. महावितरणचे अंडरग्राऊंड काम सुरू आहे. यामुळे वीज खंडित होते, असे सांगितले जात आहे. पूर्वी शुक्रवारीच वीजपुरवठा बंद होईल, असे सांगण्यात आले होते. एखाद्या दिवशी ठीक आहे; पण दररोज वीजपुरवठा बंद पडत असल्याने कंपनी चालविणे कठीण झाले आहे.-अनुप काबरा,उद्योजक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसीmahavitaranमहावितरण