शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

चिकलठाणा एमआयडीसीची दररोज वीज गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 23:17 IST

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत महिनाभरापासून दररोज एक ते तीन तास वीजपुरवठा बंद पडत असल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. तासन्तास मशीन बंद होत असल्याने वेळेवर आॅर्डर पूर्ण करून देता येत नसल्याने नवीन काम मिळण्यावर परिणाम होत आहे.

ठळक मुद्देपरिणाम : महिनाभरापासून उद्योजक त्रास्त, उत्पादनावर परिणाम

औरंगाबाद : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत महिनाभरापासून दररोज एक ते तीन तास वीजपुरवठा बंद पडत असल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. तासन्तास मशीन बंद होत असल्याने वेळेवर आॅर्डर पूर्ण करून देता येत नसल्याने नवीन काम मिळण्यावर परिणाम होत आहे.चिकलठाणा औद्योगिक वसाहत शासनाला कोट्यवधीचा महसूल देत आहे. मात्र, या परिसरात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण राहिले नाही. येथील उद्योजक पैसा लावण्यास तयार आहेत, अत्याधुनिक मशीन आहेत, कामगारही सज्ज आहेत; पण वीजपुरवठा नसल्याने सर्व काम ठप्प पडत आहे. मागील महिनाभरापासून दररोज कोणत्या ना कोणत्या फिडरवर एक ते तीन तास वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे कंपनीतील सर्व काम ठप्प पडत आहे. यासंदर्भात उद्योजक किशोर राठी यांनी सांगितले की, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत असंख्य अडचणींना तोंड देत येथील कंपन्या तग धरून आहेत. कोट्यवधीचा महसूल या परिसरातून शासनाला प्राप्त होतो; पण त्या तुलनेत या वसाहतीत मूलभूत सुविधा पुरविण्यात शासनाला अपयश येत आहे. दररोज येथील उद्योगांना नवनवीन समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मागील महिनाभरापासून या परिसरातील वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे वेळेवर उत्पादन तयार करून आॅर्डर पूर्ण करणे कठीण जात आहे. परिणामी, नवीन आॅर्डर मिळण्यास विलंब होत आहे. याचा परिणाम, येथील उलाढालीवर होत आहे. उद्योजक मनीष अग्रवाल म्हणाले की, दररोेज एक ते तीन तास वीजपुरवठा बंद पडला की, पुन्हा मशीन सुरू होऊन काम सुरळीत होण्यास एक ते दीड तास लागतो. यात विनाकारणच वेळ व पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. तासन्तास कामगार बसून राहत आहेत. मागील अनेक दिवसांपासून महावितरण फॉल्ट शोधत आहे; पण यश येत नाही. लवकरात लवकर फॉल्ट शोधून वीजपुरवठा अखंडित करावा, असे आवाहन आम्हा सर्व उद्योगाजकांच्या वतीने करण्यात आले आहे.दिवसेंदिवस काम करणे कठीणमागील महिनाभरापासून कधी इंडस्ट्रिअल फिडर १, कधी फिडर २, तर कधी रेडिएन्ट फिडर, अशा तीन फिडरवरील वीजपुरवठा आलटूनपालटून बंद होत आहे. पूर्वी दिवसातून अर्धातास वीजपुरवठा खंडित होत असे. आता तो २ ते ३ तास खंडित होत आहे. महावितरणचे अंडरग्राऊंड काम सुरू आहे. यामुळे वीज खंडित होते, असे सांगितले जात आहे. पूर्वी शुक्रवारीच वीजपुरवठा बंद होईल, असे सांगण्यात आले होते. एखाद्या दिवशी ठीक आहे; पण दररोज वीजपुरवठा बंद पडत असल्याने कंपनी चालविणे कठीण झाले आहे.-अनुप काबरा,उद्योजक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसीmahavitaranमहावितरण