शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

Children's Day Special 2018 : २० बालकांच्या जीवनात पसरला ‘प्रकाश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 15:35 IST

घाटी रुग्णालयातील नेत्र विभागाने वर्षभरात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून २० बालकांच्या जीवनात नेत्ररूपी ‘प्रकाश’ पसरवला आहे.

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : बालकांचे बालपण अगदी आनंदात जावे, कोणत्याही बंधनाशिवाय हा आनंद घेता यावा आणि भविष्यात एक चांगली व्यक्ती घडण्यासाठी आयुष्यात डोळ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे; परंतु डोळ्यातील दोषांमुळे अनेक बालकांच्या जीवनात अंधार पसरतो. मात्र, घाटी रुग्णालयातील नेत्र विभागाने वर्षभरात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून २० बालकांच्या जीवनात नेत्ररूपी ‘प्रकाश’ पसरवला आहे.

मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा, पडलेली पापणी अशा अनेक कारणांनी बालकांच्या दृष्टीत दोष निर्माण होतो. मोतीबिंदू हा केवळ ज्येष्ठांना होतो, हा समज आता मागे पडला आहे. जन्मत: बाळांमध्ये मोतीबिूंद आढळत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. अनेक बालकांच्या दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू होतो. त्यामुळे येणारे अंधत्व हे केवळ डोळ्यांपुरतेच नसते, तर बालकांच्या संपूर्ण आयुष्यच अंधारात जाते; परंतु घाटीतील उपचारांमुळे अनेकांच्या आयुष्यातील हा अंधार दूर झाला.

नेत्र विभागात वर्षभरात बालकांच्या २० मोतीबिंदू, १५ तिरळेपणा, १ काचबिंदू, ८ पडलेल्या पापणीची आणि १५ डोळ्यांतून पाणी येण्यासंदर्भातील शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. मुदतपूर्व जन्मलेल्या ६ बालकांच्या नेत्रदोषावर लेझर तंत्रज्ञानानेही उपचार करण्यात आले. बालकांवरील अशा शस्त्रक्रियांसाठी सहयोगी प्राध्यापक डॉ. वैशाली लोखंडे-उणे यांनी विशेष प्रशिक्षण घेतलेले आहे. विभागप्रमुख डॉ. वर्षा नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकारी डॉक्टरांच्या मदतीने बालकांच्या पर्यायाने कुटुंबात पसरलेला अंधार दूर केला जात आहे. शस्त्रक्रियेसह बाह्यरुग्ण विभागात वर्षभरात १७०० बालकांवर औषधोपचार करण्यात आले. 

नवजात शिशूंना दृष्टीजन्मल्यानंतर डोळ्यातील दोषामुळे नवजात शिशूंना काहीही आकलन होत नाही. त्यामुळे त्यांचा विकास खुंटतो; परंतु प्रसूतीनंतर डोळ्यातील दोष वेळीच ओळखून आता उपचार शक्य झाले आहेत. घाटीतील नेत्र विभागात सात आठवड्यांच्या बाळावरही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे डॉ. उणे यांनी सांगितले. म्हणजे सात आठवडे ते १५ वर्षांपर्यंतच्या बालकांचे नेत्रदोष दूर करण्यासाठी गोरगरिबांचे आधारवड असलेले घाटी रुग्णालय महत्त्वाची भूमिका निभावत आहे. 

बालकांनी तासभर मैदानात खेळावेलहान बालकांच्या डोळ्यात काही दोष असेल तर मूल मोठे झाल्यानंतर उपचार करू, असे अनेक पालक म्हणतात; परंतु जेवढ्या लवकर उपचार घेतला जाईल, तेवढा अधिक फायदा होतो. तिरळेपणात ८ ते १० वर्षांपर्यंतच्या बालकांमध्ये दृष्टी वाढविता येते; परंतु त्यानंतर अवघड होते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी बालकांनी दररोज किमान एक तास मैदानात खेळले पाहिजे. त्यातून डोळ्यांच्या तक्रारी कमी होण्यास मदत होते.- डॉ. वैशाली लोखंडे-उणे, सहयोगी प्राध्यापक, नेत्र विभाग, घाटी

टॅग्स :children's dayबालदिनgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीhospitalहॉस्पिटल