शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

Children's Day Special 2018 : २० बालकांच्या जीवनात पसरला ‘प्रकाश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 15:35 IST

घाटी रुग्णालयातील नेत्र विभागाने वर्षभरात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून २० बालकांच्या जीवनात नेत्ररूपी ‘प्रकाश’ पसरवला आहे.

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : बालकांचे बालपण अगदी आनंदात जावे, कोणत्याही बंधनाशिवाय हा आनंद घेता यावा आणि भविष्यात एक चांगली व्यक्ती घडण्यासाठी आयुष्यात डोळ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे; परंतु डोळ्यातील दोषांमुळे अनेक बालकांच्या जीवनात अंधार पसरतो. मात्र, घाटी रुग्णालयातील नेत्र विभागाने वर्षभरात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून २० बालकांच्या जीवनात नेत्ररूपी ‘प्रकाश’ पसरवला आहे.

मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा, पडलेली पापणी अशा अनेक कारणांनी बालकांच्या दृष्टीत दोष निर्माण होतो. मोतीबिंदू हा केवळ ज्येष्ठांना होतो, हा समज आता मागे पडला आहे. जन्मत: बाळांमध्ये मोतीबिूंद आढळत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. अनेक बालकांच्या दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू होतो. त्यामुळे येणारे अंधत्व हे केवळ डोळ्यांपुरतेच नसते, तर बालकांच्या संपूर्ण आयुष्यच अंधारात जाते; परंतु घाटीतील उपचारांमुळे अनेकांच्या आयुष्यातील हा अंधार दूर झाला.

नेत्र विभागात वर्षभरात बालकांच्या २० मोतीबिंदू, १५ तिरळेपणा, १ काचबिंदू, ८ पडलेल्या पापणीची आणि १५ डोळ्यांतून पाणी येण्यासंदर्भातील शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. मुदतपूर्व जन्मलेल्या ६ बालकांच्या नेत्रदोषावर लेझर तंत्रज्ञानानेही उपचार करण्यात आले. बालकांवरील अशा शस्त्रक्रियांसाठी सहयोगी प्राध्यापक डॉ. वैशाली लोखंडे-उणे यांनी विशेष प्रशिक्षण घेतलेले आहे. विभागप्रमुख डॉ. वर्षा नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकारी डॉक्टरांच्या मदतीने बालकांच्या पर्यायाने कुटुंबात पसरलेला अंधार दूर केला जात आहे. शस्त्रक्रियेसह बाह्यरुग्ण विभागात वर्षभरात १७०० बालकांवर औषधोपचार करण्यात आले. 

नवजात शिशूंना दृष्टीजन्मल्यानंतर डोळ्यातील दोषामुळे नवजात शिशूंना काहीही आकलन होत नाही. त्यामुळे त्यांचा विकास खुंटतो; परंतु प्रसूतीनंतर डोळ्यातील दोष वेळीच ओळखून आता उपचार शक्य झाले आहेत. घाटीतील नेत्र विभागात सात आठवड्यांच्या बाळावरही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे डॉ. उणे यांनी सांगितले. म्हणजे सात आठवडे ते १५ वर्षांपर्यंतच्या बालकांचे नेत्रदोष दूर करण्यासाठी गोरगरिबांचे आधारवड असलेले घाटी रुग्णालय महत्त्वाची भूमिका निभावत आहे. 

बालकांनी तासभर मैदानात खेळावेलहान बालकांच्या डोळ्यात काही दोष असेल तर मूल मोठे झाल्यानंतर उपचार करू, असे अनेक पालक म्हणतात; परंतु जेवढ्या लवकर उपचार घेतला जाईल, तेवढा अधिक फायदा होतो. तिरळेपणात ८ ते १० वर्षांपर्यंतच्या बालकांमध्ये दृष्टी वाढविता येते; परंतु त्यानंतर अवघड होते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी बालकांनी दररोज किमान एक तास मैदानात खेळले पाहिजे. त्यातून डोळ्यांच्या तक्रारी कमी होण्यास मदत होते.- डॉ. वैशाली लोखंडे-उणे, सहयोगी प्राध्यापक, नेत्र विभाग, घाटी

टॅग्स :children's dayबालदिनgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीhospitalहॉस्पिटल