शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

Children's Day Special 2018 : २० बालकांच्या जीवनात पसरला ‘प्रकाश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 15:35 IST

घाटी रुग्णालयातील नेत्र विभागाने वर्षभरात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून २० बालकांच्या जीवनात नेत्ररूपी ‘प्रकाश’ पसरवला आहे.

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : बालकांचे बालपण अगदी आनंदात जावे, कोणत्याही बंधनाशिवाय हा आनंद घेता यावा आणि भविष्यात एक चांगली व्यक्ती घडण्यासाठी आयुष्यात डोळ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे; परंतु डोळ्यातील दोषांमुळे अनेक बालकांच्या जीवनात अंधार पसरतो. मात्र, घाटी रुग्णालयातील नेत्र विभागाने वर्षभरात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून २० बालकांच्या जीवनात नेत्ररूपी ‘प्रकाश’ पसरवला आहे.

मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा, पडलेली पापणी अशा अनेक कारणांनी बालकांच्या दृष्टीत दोष निर्माण होतो. मोतीबिंदू हा केवळ ज्येष्ठांना होतो, हा समज आता मागे पडला आहे. जन्मत: बाळांमध्ये मोतीबिूंद आढळत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. अनेक बालकांच्या दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू होतो. त्यामुळे येणारे अंधत्व हे केवळ डोळ्यांपुरतेच नसते, तर बालकांच्या संपूर्ण आयुष्यच अंधारात जाते; परंतु घाटीतील उपचारांमुळे अनेकांच्या आयुष्यातील हा अंधार दूर झाला.

नेत्र विभागात वर्षभरात बालकांच्या २० मोतीबिंदू, १५ तिरळेपणा, १ काचबिंदू, ८ पडलेल्या पापणीची आणि १५ डोळ्यांतून पाणी येण्यासंदर्भातील शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. मुदतपूर्व जन्मलेल्या ६ बालकांच्या नेत्रदोषावर लेझर तंत्रज्ञानानेही उपचार करण्यात आले. बालकांवरील अशा शस्त्रक्रियांसाठी सहयोगी प्राध्यापक डॉ. वैशाली लोखंडे-उणे यांनी विशेष प्रशिक्षण घेतलेले आहे. विभागप्रमुख डॉ. वर्षा नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकारी डॉक्टरांच्या मदतीने बालकांच्या पर्यायाने कुटुंबात पसरलेला अंधार दूर केला जात आहे. शस्त्रक्रियेसह बाह्यरुग्ण विभागात वर्षभरात १७०० बालकांवर औषधोपचार करण्यात आले. 

नवजात शिशूंना दृष्टीजन्मल्यानंतर डोळ्यातील दोषामुळे नवजात शिशूंना काहीही आकलन होत नाही. त्यामुळे त्यांचा विकास खुंटतो; परंतु प्रसूतीनंतर डोळ्यातील दोष वेळीच ओळखून आता उपचार शक्य झाले आहेत. घाटीतील नेत्र विभागात सात आठवड्यांच्या बाळावरही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे डॉ. उणे यांनी सांगितले. म्हणजे सात आठवडे ते १५ वर्षांपर्यंतच्या बालकांचे नेत्रदोष दूर करण्यासाठी गोरगरिबांचे आधारवड असलेले घाटी रुग्णालय महत्त्वाची भूमिका निभावत आहे. 

बालकांनी तासभर मैदानात खेळावेलहान बालकांच्या डोळ्यात काही दोष असेल तर मूल मोठे झाल्यानंतर उपचार करू, असे अनेक पालक म्हणतात; परंतु जेवढ्या लवकर उपचार घेतला जाईल, तेवढा अधिक फायदा होतो. तिरळेपणात ८ ते १० वर्षांपर्यंतच्या बालकांमध्ये दृष्टी वाढविता येते; परंतु त्यानंतर अवघड होते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी बालकांनी दररोज किमान एक तास मैदानात खेळले पाहिजे. त्यातून डोळ्यांच्या तक्रारी कमी होण्यास मदत होते.- डॉ. वैशाली लोखंडे-उणे, सहयोगी प्राध्यापक, नेत्र विभाग, घाटी

टॅग्स :children's dayबालदिनgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीhospitalहॉस्पिटल