शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

घरातून पळून शिर्डीला निघालेल्या बालकांनी जन्मदात्यांसोबत परत जाण्यास दिला नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:04 IST

औरंगाबाद : आई-वडील मारतात म्हणून तिघा भावंडांनी घरातून पळ काढला. त्यांच्यासोबत त्यांचा मित्रही सोबतीला आला. हे चौघे रेल्वेने शिर्डीकडे ...

औरंगाबाद : आई-वडील मारतात म्हणून तिघा भावंडांनी घरातून पळ काढला. त्यांच्यासोबत त्यांचा मित्रही सोबतीला आला. हे चौघे रेल्वेने शिर्डीकडे निघाले; पण रेल्वे सुरक्षा बलाच्या गस्तीत ही मुले पालकांशिवाय आढळली. चारही मुलांना औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर उतरवून घेत पालकांना माहिती देण्यात आली. धावत-पळत आई-वडील औरंगाबादेत पाेहोचले; परंतु तिघा मुलांनी जन्मदात्यांसोबत परत जाण्यास नकार दिला. त्यामुळे या मुलांना बालकल्याण समितीच्या माध्यमातून बालगृहात दाखल करण्यात आले आहे.

रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक के. चंदूलाल यांना गस्तीदरम्यान शुक्रवारी रात्री काकीनाडा एक्स्प्रेसमध्ये १० वर्षांचा मुलगा, एक ८ वर्षांची आणि दुसरी १२ वर्षांची मुलगी, असे तिघे भावंडे, तसेच त्यांचा १२ वर्षांचा मित्र प्रवास करताना आढळले. चौघेही राहणारे परळी वैजनाथ येथील असून, चंदूलाल यांनी या चौघांची विचारपूस केली. तेव्हा आई-वडील मारहाण करीत असल्याने आम्ही शिर्डीला चाललो, असे तिघा भावंडांनी सांगितले. त्यांच्यासोबत पालक नसल्याने चौघांनी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर उतरवून घेण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली. मुले सापडल्याच्या आनंदात तिघा मुलांचे आई-वडिलांनी धावतपळत औरंगाबाद गाठले; परंतु मुलांनी त्यांच्यासोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला.

मुलांच्या जिद्दीपुढे सर्व हतबल

मुलांच्या जिद्दीपुढे आई-वडील आणि रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी हतबल झाले. त्यामुळे यासंदर्भात बालकल्याण समितीला माहिती देण्यात आली. त्यानंतर चौघांना बालगृह-निरीक्षणगृहात दाखल करण्यात आले. रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अरविंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक के. चंदूलाल, हेड काॅन्स्टेबल बी. जी. लोणे, काॅन्स्टेबल सरिता मान, छोटी पुनिया, धनेश कुमारी यांनी ही कार्यवाही केली.

-----

फोटो ओळ...

घरातून पळून आलेल्या बालकांसह रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी, कर्मचारी.