शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणामुळे बालके अस्वस्थ !

By admin | Updated: January 23, 2017 23:47 IST

उस्मानाबाद प्रशासनाच्या बेफिकीरीमुळे जिल्ह्यातील अनेक वाड्या-वस्त्यांवरही मेळघाटासारखीच विदारक परिस्थिती असल्याचे वास्तव समोर आले आहे.

बाबूराव चव्हाण उस्मानाबादकालपर्यंत ठाणे, गडचिरोली आदी जिल्ह्यातील कुपोषित चिमुरड्यांच्या बातम्या आपण दूरचित्रवाणीवर पहात होतो. मात्र, केवळ प्रशासनाच्या बेफिकीरीमुळे जिल्ह्यातील अनेक वाड्या-वस्त्यांवरही मेळघाटासारखीच विदारक परिस्थिती असल्याचे वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे, जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या उस्मानाबादपासून अवघ्या आठ-नऊ किलोमिटरवर असलेल्या उपळे (मा) येथील शाहुनगरमध्ये एक -दोन नव्हे, तर तब्बल आठ ते नऊ चिमुरडे कुपोषणाच्या दुसऱ्या ते तिसऱ्या टप्प्यात आहेत. मात्र, महिला व बालकल्याणच्या माध्यमातून या चिमुकल्यांसाठी कोट्यवधीचा निधी खर्च करणाऱ्या प्रशासनाला याचा थांगपत्ताही लागलेला नाही. उपळ्याच्या शाहुनगरमधील या कुपोषित बालकांपर्यंत शासनाचा ना महिला व बालकल्याण विभाग पोहोंचला ना आरोग्य विभाग. लातूरस्थित एका डॉक्टरने या बालकांची तपासणी केल्यानंतर स्वत:च्या लेटरपॅडवर महिला व बालकल्याण विभागाला तेथील वास्तव कळविले. मात्र, आठवडा उलटला तरीही ना बालकल्याण विभागाने दाखल घेतली ना प्रशासनातील इतर यंत्रणेला तेथे जावेसे वाटले.कुपोषणाचा कलंक पुसला जावा, यासाठी शासनस्तरावरून विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. यातील बहुतांशी योजना या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून राबविल्या जातात. परंतु, उस्मानाबाद तालुक्यातील उपळे (मा) येथील वडर शाहुनगर भागातील कुपोषणाशी झुंज देणारी बालके पाहिल्यानंतर योजनांच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्या शिवाय रहात नाही. शहरापासून अवघ्या ९ किमी अंतरावर असलेल्या या गावांतील बालकांना कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठीच्या योजनांचा लाभ मिळू शकत नसेल, तर दुर्गम भागातील खेडेगावांचा विचार न केलेलाच बरा. औरंगाबाद-सोलापूर या महामार्गापासून अवघ्या काही अंतरावर उपळे (मा) हे गाव आहे. या गावालगतच शाहुनगरचा भाग आहे. या ठिकाणी वास्तव्यास असणारी बहुतांशी कुटुंबाचा उदरनिर्वाह मोलमजुरीवर चालतो. पद्माबाई कराळे यांचे यापैकीच एक कुटुंब. मोलमजुरीला गेले तरच चुल पेटते. याच्या कुटुंबातील आदिनाथ कराळे हा दहा वर्षीय मुलगा कुपोषणाशी झुंजत आहे. या दहा वर्षीय मुलाचे वजन सात ते आठ किलो असल्याचे कुटुंबियाकडून सांगण्यात आले. कुपोषणामुळे या मुलाला स्वत:ची कामेही स्वत: करता येत नाहीत. आई-वडीलांनाही कामावर गेल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे दिवसभर आदिनाथचा सांभाळ करण्याची जबाबदारी वृद्ध आजीवर येवून ठेपली आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने खाजगी दवाखान्यात जावून उपचार घेता आले नाहीत. अन् शासनाकडूनही ना पोषण आहार मिळाला ना औषधी. सुरूवातीच्या काळात जिल्हा रूग्णालयातही चकरा मारल्या. परंतु, संबंधित अधिकाऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याची प्रतिक्रीया आदिनाथच्या आईने नोंदविली.हाच प्रश्न अंबिका जाधव यांच्या कुटुंबाला भेडसावित आहे. कुटुंबात गोपाळ जाधव (वय-३) आणि आरती जाधव (वय-७) ही भावंडे आहेत. यांनाही कुपोषणाने ग्रासले आहे. मुलांना कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी कधी शासकीय रूग्णालय तर कधी खाजगी दवाखान्याचे उंबरठे झिजविले. परंतु, शासकीय यंत्रणेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, असे अंबिका जाधव यांचे म्हणणे आहे. आरती सात वर्षाची आहे. मात्र अशक्तपणामुळे तिला स्पष्टपणे बोलता येत नाही. गोपाळची स्थितीही यापेक्षा काही वेगळी नाही. हतबल झालेल्या जाधव कुटुंबियाने देवावर भरवसा ठेवून कोणाच्या तरी सांगण्यावरून मुलाच्या गळ्यात कापडामध्ये लिंबू बांधल्याचे दिसून आले. याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता, मात्र प्रशासन ढुंकूनही पहात नाही. खाजगी दवाखान्यात जाण्यासाठी पैसे नाहीत. मग देवावर भरवसा ठेवण्याशिवाय करणार काय? असा प्रतिसवाल प्रस्तूत प्रतिनिधीला केला. ही प्रातिनिधीक स्वरूपातील उदाहरणे असून आणखी आठ ते नऊ बालके मध्यम तसेच तीव्र कमी वजनाची आहेत. त्यामुळे हा प्रकार महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा आरोग्य विभाग गांभीर्याने घेणार कधी? असा सवाल आता उपस्थित होवू लागला आहे.