शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

चिकूचे उत्पादन निम्म्यापेक्षाही कमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 20:15 IST

दुष्काळ झळा : पीक विम्यातूनही वगळले; पिशोर परिसरातील शेतकरी संकटात

- मुबीन पटेल

पिशोर (जि. औरंगाबाद) : यंदा दुष्काळामुळे पिशोरसह परिसरात चिकू उत्पादनात मोठी घट झाली असून, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी झाले आहे. शिवाय शासनाच्या फळबाग पीक विम्यामध्ये चिकू या पिकाचा समावेश न केल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

कन्नड तालुक्यातील पिशोर परिसर चिकूचे आगार म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, शंभर ते दीडशे वर्षांपूर्वीच्या जुन्या बागा येथे तग धरून आहेत. आठवड्यातून चार दिवस येथे चिकूचा बाजार भरतो. यात नांदेड, लातूर, परभणी, बीड, जालना, औरंगाबाद, बुलडाणा तर आंध्र प्रदेशमधील निजामाबाद व एदलाबाद येथून व्यापारी येत असतात. पिशोर परिसरात मुख्यत्वेकरून कालीपत्ती (गावरान) आणि गोलपत्ती हे चिकूचे वाण जास्त प्रचलित असून, खाण्यास चविष्ट व गोड असल्याने मागणी जास्त आहे. गावातील प्रत्येक शेतकऱ्याकडे छोटी का होईना चिकूची बाग आहे. यामुळे दरवर्षी आर्थिक स्थिती थोडी मजबूत होण्यासाठी या बागा मोठा आधार आहेत. पिशोरसह दिगर, शफेपूर, रामनगर, खातखेडा, पळशी बु., पळशी खुर्द, कोळंबी, भारंबा, शाफियाबाद, भिलदरी, जवखेडा, मोहंद्री, वासडी, हस्ता, निंभोरा, पिंपरखेडा, नेवपूर, नागापूर, करंजखेडा, नाचनवेल आदी गावांतील शेतकºयांकडे चिकू बाग आहेत.

यावर्षी चांगले पर्जन्यमान होईल, या आशेवर बळीराजा होता. परंतु रबी हंगाम पिकांना फटका तर बसलाच सोबत चिकूच्या बागांनाही मोठी झळ बसली आहे. पाण्याअभावी फुलोरा न लागल्याने फळधारणा अत्यंत कमी झाली आहे. परिणामी फक्त ३० ते ४० टक्के इतकेच उत्पादन झालेले आहे. गतवर्षी उत्पादन थोडे बरे होते; परंतु अनेक व्यापा-यांचे अंदाज चुकल्याने त्यांना तोटा सहन करावा लागला होता. यावर्षी मात्र व्यापारी ताकही फुंकून पीत असून, माल बघूनच बाग खरेदी करीत आहेत.

विम्यातून वगळले, दुष्काळी अनुदानही नाहीशासनाच्या फळबाग पीक विमा योजनेत चिकूचा समावेश न केल्याने शेतकरी हताश झाला असून, दुष्काळी अनुदानही मिळाले नाही. यामुळे परिसरात पाच हजारांच्या जवळपास चिकूच्या बागा असूनही कृषी विभागाने चिकूला डावलल्याने मोठी खंत असल्याच्या प्रतिक्रिया शेतक-यांनी दिल्या.

टॅग्स :agricultureशेतीfruitsफळेdroughtदुष्काळFarmerशेतकरी