शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
2
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
3
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
4
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
5
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
6
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
7
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
8
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
9
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
10
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
11
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
12
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
13
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
14
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
15
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
16
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
17
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
18
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
19
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना
20
नैतिकता शिवणाऱ्या IAS अधिकाऱ्याने घेतली १० कोटींची लाच; कोण आहेत नागार्जुन गौडा? जाणून घ्या प्रकरण...

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विमानतळाच्या ‘टेकआॅफ ’ला खीळ :कनेक्टिव्हिटी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:36 IST

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आकाशात मराठवाड्यातील नांदेडपाठोपाठ आता शिर्डी विमानतळाचे वादळ घोंगावत आहे. या दोन विमानतळांसह अन्य विमानतळांवरील हवाई कनेक्टिव्हिटी वाढीचा वेग पाहता भविष्यात चिकलठाणा विमानतळावरील विमानसेवा ‘जमिनीवर’ येऊन शहराची हवाई कनेक्टिव्हिटी धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विमानसेवा वाढविण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न करण्याची गरज आहे.

संतोष हिरेमठ ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आकाशात मराठवाड्यातील नांदेडपाठोपाठ आता शिर्डी विमानतळाचे वादळ घोंगावत आहे. या दोन विमानतळांसह अन्य विमानतळांवरील हवाई कनेक्टिव्हिटी वाढीचा वेग पाहता भविष्यात चिकलठाणा विमानतळावरील विमानसेवा ‘जमिनीवर’ येऊन शहराची हवाई कनेक्टिव्हिटी धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विमानसेवा वाढविण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न करण्याची गरज आहे.उडान या योजनेंतर्गत ट्रूजेट कंपनीने २७ एप्रिलपासून नांदेड येथून नांदेड -हैदराबाद विमानसेवा सुरू केली. तसेच नांदेड-मुंबई विमानसेवाही सुरू आहे. याचा थेट फटका थेट शहरातील विमानसेवेवर होत आहे. विमानसेवेसाठी पूर्वी नांदेड येथील नागरिकांना औरंगाबादचा पर्याय होता; परंतु आता औरंगाबादऐवजी नांदेडवरूनच विमान उपलब्ध झाले आहे. दुसरीकडे गत महिन्यात शिर्डी विमानतळावरून विमानसेवेचा शुभारंभ झाला. शिर्डी विमानतळाच्या लोकार्पणप्रसंगी मुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्याऐवजी पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला अधिक प्राधान्य दिले जात असल्याचे दिसले. दहा विमान कंपन्या शिर्डीतून सेवा देण्यास इच्छुक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. शिर्डीहून हैदराबादसाठी विमानसेवा सुरू आहे.नोकरी, उद्योग, राजकीय तसेच पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात दिल्लीहून प्रवासी विमानाने ये-जा करतात. यासाठी एअर इंडियासोबत स्पाईस जेटचे विमान महत्त्वाचे ठरत होते; परंतु फेब्रुवारी २०१५ मध्ये स्पाईस जेटचे विमान बंद झाले. याचा मोठा फटका विमानतळाला बसला आहे. विमानतळावर येणाºया आणि जाणाºया प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. सुमारे ७० हजारांवर प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागला. यातील काही प्रवासी पुण्याकडे वळले तर उर्वरित मुंबई मार्गे दिल्लीला जाण्यावर भर देतात. शिर्डी, नांदेड विमानतळांमुळे आगामी कालावधीत आणखी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.विस्तारीकरणासाठी २०० कोटीचिकलठाणा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी २०० कोटी देण्याच्या घोषणेला अनेक महिने उलटून गेले. आता कुठे भूसंपादन संस्था म्हणून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्या. स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विस्तारीकरणाबरोबर विमानसेवा वाढविण्यासाठी हालचाल करण्याची गरज आहे.अन्यथा विस्तारीकरण होऊनही विमानसेवा ‘जैसे थे’ राहण्याचे नाकारता येत नाही.ही विमानसेवा हवीऔरंगाबादहून दिल्लीसाठी नवीन विमानसेवा सुरू करण्याची गरज आहे. देश-विदेशातील पर्यटकांची संख्या वाढण्यासाठी जयपूर- उदयपूर- दिल्ली विमान,तसेच बंगळुरू, चैन्नई, अहमदाबादसह बुद्धिस्ट सर्किटशी औरंगाबाद शहर विमानसेवेने जोडले जाण्याची गरज आहे. हैदराबादला जाण्यासाठी आणखी एखादी नवीन विमानसेवा सुरू झाली तरी त्यास मोठा प्रतिसाद मिळू शकतो,असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.हैदराबादसाठी शिर्डी,नांदेडकडेट्रूजेट कंपनी आता डिसेंबरमध्ये औरंगाबादेत आठवड्यातील तीनच दिवस सेवा देणार आहे. त्यामुळे इतर दिवशी औरंगाबादहून विमानाने हैदराबाद जाऊ इच्छिणारे प्रवासी नांदेड आणि शिर्डीकडे वळण्याची शक्यता व्यक्त होत आहे....तर दिल्ली विमानसेवा संकटातआजघडीला दिल्लीहून येणारे बहुतांश प्रवासी हे शिर्डी आणि शनी शिंगणापूरला भेट देणारे असतात. या प्रवाशांना समोर ठेवून आगामी कालावधीत विमान कंपन्या थेट दिल्ली-शिर्डी अशी सेवा सुरू करू शकतात, असे झाले तर सध्या सुरू असलेल्या एअर इंडियाच्या औरंगाबाद-दिल्ली विमानसेवेला फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.प्रतिसाद; पण परिणाम नाहीएअर कार्गोसाठी विमानतळाचे विस्तारीकरण झाले पाहिजे. त्यामुळे मोठी विमाने येतील. छोट्या-छोट्या शहरांशी औरंगाबादची हवाई कनेक्टिव्हिटी झाली पाहिजे. हैदराबाद, चैन्नईसह औद्योगिक, पर्यटन शहरे, बुद्धिस्ट सर्किटला प्राधान्य दिले पाहिजे. ‘सीएमआयए’कडून मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, पर्यटनमंत्र्यांकडे यासाठी पाठपुरावा केला जात आहे. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळतो; परंतु काही परिणाम होताना दिसत नाही.-प्रसाद कोकीळ, अध्यक्ष, चेंबर आॅफ मराठवाडाइंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर (सीएमआयए)परिणाम होण्याची शक्यताबहुतांश वेळी दिल्लीचे विमान फूल असते. नवीन विमानसेवा सुरू करण्याचे सध्यातरी नियोजन नाही. अन्य कंपन्यांकडून दिल्ली-शिर्डी विमानसेवा सुरू झाली, तर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी स्पर्धेमुळे तिकीट दरात बदल करावा लागेल.-रमेश नंदे, स्टेशन मॅनेजर,एअर इंडिया