शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

विजेच्या लपंडावाने चिकलठाणा एमआयडीसी ठप्प; ८५ युनिटचे कामकाज विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 12:48 IST

एका फिडरमुळे दररोज वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार होत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत असल्याचे उद्योजकांनी म्हटले.

ठळक मुद्देचिकलठाणा औद्योगिक वसाहतीत विजेचा लपंडाव सुरूच आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता वीज गुल झाल्याने ८५ युनिटचे कामकाज तासभर ठप्प झाले.

औरंगाबाद : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत विजेचा लपंडाव सुरूच आहे. मंगळवारी (दि.१७) सकाळी १० वाजता वीज गुल झाल्याने ८५ युनिटचे कामकाज तासभर ठप्प झाले. एका फिडरमुळे दररोज वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार होत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत असल्याचे उद्योजकांनी म्हटले.

चिकलठाण्यातील रेडियंट अ‍ॅग्रो फिडरसंदर्भात गेल्या दोन वर्षांपासून उद्योजकांकडून पाठपुरावा सुरूआहे; परंतु त्यावर काहीही तोडगा निघत नाही, त्यामुळे या फिडरवरील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. वेळेवर वीज बिल भरण्यास प्राधान्य दिले जाते; परंतु त्या तुलनेत सुविधा मिळत नसल्याची ओरड उद्योजकांकडून होत आहे. या अडचणींमुळे १० जुलै रोजी उद्योजकांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्याची भेट घेऊन वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासंदर्भात चर्चा केली. यावेळी चिकलठाणा एमआयडीसीत वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार होतो.

येथील रेडियंट अ‍ॅग्रो आणि अन्य फिडरची दुरुस्ती करण्यात यावी, शेंद्रा औद्योगिक वसाहतीत दुरुस्ती व देखभाल केंद्र सुरूकरणे, वाळूज येथील गट क्रमांक २२ व २३ मधील उद्योजकांना वीजपुरवठा करण्यासाठी अतिरिक्त फिडरची व्यवस्था करणे, पावसाळ्यात पुरवठा सुरळीत राहील यासाठी दक्षता घेणे, आदी मागण्या करण्यात आल्या. मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन उद्योजकांना देण्यात आले; परंतु अद्यापही दररोज वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार सुरूच आहे. 

पावसामुळे सोमवारी रात्रीदेखील येथील पुरवठा तासभर बंद झाला होता. त्यानंतर रेडियंट अ‍ॅग्रो फिडरमधील नादुरुस्तीने मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास वीजपुरवठा बंद पडला. तासभर वीजपुरवठा बंद होता, त्यामुळे कामकाज विस्कळीत झाले. परिणामी नुकसानीला सामोरे जावे लागल्याचे उद्योजकांनी म्हटले. वीज गेल्यानंतर उद्योजकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. तेव्हा यंत्रणा जुनी झाल्याचे अजब उत्तर देण्यात आल्याचे उद्योजकांनी सांगितले. नादुरुस्तीमुळे फिडर बंद पडले होते. तात्काळ दुरुस्ती करण्यात आल्याचे महावितरणच्या अभियंत्यांनी सांगितले.

काम होते बंदपाऊस असो किंवा नसो दररोज वीजपुरवठा खंडित होतो. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. मंगळवारी दीड तास वीज गेली. परिणामी दोन कंपन्यांतील १३० कामगारांचे काम थांबते. जनरेटर वापरणे परवडणारे नाही. दुसरीकडे महावितरण समस्यांचे निराकरण करीत नाही.-विजय लेकुरवाळे, उद्योजक 

टॅग्स :Chikhalthana MIDCचिखलठाणा एमआयडीसीmahavitaranमहावितरणbusinessव्यवसाय