शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

विजेच्या लपंडावाने चिकलठाणा एमआयडीसी ठप्प; ८५ युनिटचे कामकाज विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 12:48 IST

एका फिडरमुळे दररोज वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार होत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत असल्याचे उद्योजकांनी म्हटले.

ठळक मुद्देचिकलठाणा औद्योगिक वसाहतीत विजेचा लपंडाव सुरूच आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता वीज गुल झाल्याने ८५ युनिटचे कामकाज तासभर ठप्प झाले.

औरंगाबाद : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत विजेचा लपंडाव सुरूच आहे. मंगळवारी (दि.१७) सकाळी १० वाजता वीज गुल झाल्याने ८५ युनिटचे कामकाज तासभर ठप्प झाले. एका फिडरमुळे दररोज वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार होत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत असल्याचे उद्योजकांनी म्हटले.

चिकलठाण्यातील रेडियंट अ‍ॅग्रो फिडरसंदर्भात गेल्या दोन वर्षांपासून उद्योजकांकडून पाठपुरावा सुरूआहे; परंतु त्यावर काहीही तोडगा निघत नाही, त्यामुळे या फिडरवरील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. वेळेवर वीज बिल भरण्यास प्राधान्य दिले जाते; परंतु त्या तुलनेत सुविधा मिळत नसल्याची ओरड उद्योजकांकडून होत आहे. या अडचणींमुळे १० जुलै रोजी उद्योजकांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्याची भेट घेऊन वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासंदर्भात चर्चा केली. यावेळी चिकलठाणा एमआयडीसीत वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार होतो.

येथील रेडियंट अ‍ॅग्रो आणि अन्य फिडरची दुरुस्ती करण्यात यावी, शेंद्रा औद्योगिक वसाहतीत दुरुस्ती व देखभाल केंद्र सुरूकरणे, वाळूज येथील गट क्रमांक २२ व २३ मधील उद्योजकांना वीजपुरवठा करण्यासाठी अतिरिक्त फिडरची व्यवस्था करणे, पावसाळ्यात पुरवठा सुरळीत राहील यासाठी दक्षता घेणे, आदी मागण्या करण्यात आल्या. मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन उद्योजकांना देण्यात आले; परंतु अद्यापही दररोज वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार सुरूच आहे. 

पावसामुळे सोमवारी रात्रीदेखील येथील पुरवठा तासभर बंद झाला होता. त्यानंतर रेडियंट अ‍ॅग्रो फिडरमधील नादुरुस्तीने मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास वीजपुरवठा बंद पडला. तासभर वीजपुरवठा बंद होता, त्यामुळे कामकाज विस्कळीत झाले. परिणामी नुकसानीला सामोरे जावे लागल्याचे उद्योजकांनी म्हटले. वीज गेल्यानंतर उद्योजकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. तेव्हा यंत्रणा जुनी झाल्याचे अजब उत्तर देण्यात आल्याचे उद्योजकांनी सांगितले. नादुरुस्तीमुळे फिडर बंद पडले होते. तात्काळ दुरुस्ती करण्यात आल्याचे महावितरणच्या अभियंत्यांनी सांगितले.

काम होते बंदपाऊस असो किंवा नसो दररोज वीजपुरवठा खंडित होतो. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. मंगळवारी दीड तास वीज गेली. परिणामी दोन कंपन्यांतील १३० कामगारांचे काम थांबते. जनरेटर वापरणे परवडणारे नाही. दुसरीकडे महावितरण समस्यांचे निराकरण करीत नाही.-विजय लेकुरवाळे, उद्योजक 

टॅग्स :Chikhalthana MIDCचिखलठाणा एमआयडीसीmahavitaranमहावितरणbusinessव्यवसाय