शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
3
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
4
अफगाणिस्तानात भूकेने हाहाकार; अर्धी जनता अन्नाविना, मदतीचा ओघही आटला! नेमकं काय झालं?
5
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
6
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
7
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
8
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
9
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
10
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
11
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
12
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
13
इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
14
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
15
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
16
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
17
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
18
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
19
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
20
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
Daily Top 2Weekly Top 5

चिकलठाण्याहून ६० देशांत होईल मालाची निर्यात

By admin | Updated: December 22, 2015 23:54 IST

औरंगाबाद : चिकलठाणा विमानतळावरून एअर कार्गो सेवा सुरू झाल्यानंतर शहरातून हवाई सेवेने आखाती देशांबरोबर तब्बल ६० देशांमध्ये कमीत कमी वेळेत शेती मालाच्या निर्यातीचा मार्ग मोकळा होणार आहे.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर कार्गो सेवा सुरू झाल्यानंतर शहरातून हवाई सेवेने आखाती देशांबरोबर तब्बल ६० देशांमध्ये कमीत कमी वेळेत उद्योग, शेती व्यवसायातील मालाच्या निर्यातीचा मार्ग मोकळा होणार आहे. देश-विदेशांत मालाची निर्यात करण्यासाठी औरंगाबादेतील औद्योगिक क्षेत्रासाठी एअर कार्गो सेवा एक प्रकारे वरदान ठरणार आहे. या सेवेमुळे कमीत कमी वेळेत मालाची निर्यात करून औरंगाबाद शहर आंतरराष्ट्रीय पातळीवर आणखी भरारी घेणार आहे.केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमा शुल्क परिषदेने चिकलठाणा विमानतळाचा आपल्या मानांकन यादीत समावेश केला. त्यामुळे चिकलठाणा विमानतळ देशातील १९ वे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरले आहे. त्यामुळे चिकलठाणा विमानतळावरून बहुप्रतीक्षित एअर कार्गोची सुविधा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. देशांतर्गत एअर कार्गो सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रियाही आता पूर्ण झाली असून, दिल्ली येथील एजन्सीला त्याचे कंत्राट मिळाले आहे. जानेवारीत ही सेवा सुरू होणार आहे, तर आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा विमानतळ प्राधिकरण स्वत: हाताळणार असून, मार्चपर्यंत ही सेवाही सुरू होईल.जगप्रसिद्ध वेरूळ आणि अजिंठा लेणी, शहरातील पर्यटनस्थळांबरोबर परिसरातील औद्योगिक क्षेत्रामुळेही औरंगाबादचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे. आॅटोमोबाईल्स, कृषी उत्पादने, फार्मासह विविध राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्या औरंगाबादलगतच्या औद्योगिक वसाहतींमध्ये आहेत. आजघडीला या कंपन्या रेल्वे आणि रोड ट्रान्सपोर्टद्वारे मुंबई, दिल्ली येथून देश-विदेशांमध्ये मालाची निर्यात करतात; परंतु अशा प्रकारे मालाच्या निर्यातीमध्ये अधिक वेळ जातो. अशाच प्रकारे शेतीमालाचीही निर्यात होते. मात्र, एअर कार्गो सेवेमुळे कमीत कमी वेळेत या मालाची निर्यात होण्यास हातभार लागणार असल्याने निर्यातदारांचा हा त्रास कायमचा थांबणार आहे.नाशवंत पदार्थांसाठी फायदेशीरफळे, भाज्या अशा शेतीमालाचीही देश-विदेशांत निर्यात केली जाते. फळे, भाज्या हा नाशवंत माल असतो. हा माल कमीत कमी वेळत निश्चित ठिकाणी पोहोचणे गरजेचे असते; अन्यथा हा माल पोहोचेपर्यंत खराब होतो. रस्ते वाहतुकीद्वारे अनेकदा या समस्येला सामोरे जावे लागते. त्याचा आर्थिक फटका निर्यातदारांना सहन करावा लागतो. त्यामुळे अशा नाशवंत मालाची निर्यातीसाठी एअर कार्गो सेवा सर्वाधिक फायदेशीर ठरणार आहे.