शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

चिकलठाण्याहून ६० देशांत होईल मालाची निर्यात

By admin | Updated: December 22, 2015 23:54 IST

औरंगाबाद : चिकलठाणा विमानतळावरून एअर कार्गो सेवा सुरू झाल्यानंतर शहरातून हवाई सेवेने आखाती देशांबरोबर तब्बल ६० देशांमध्ये कमीत कमी वेळेत शेती मालाच्या निर्यातीचा मार्ग मोकळा होणार आहे.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर कार्गो सेवा सुरू झाल्यानंतर शहरातून हवाई सेवेने आखाती देशांबरोबर तब्बल ६० देशांमध्ये कमीत कमी वेळेत उद्योग, शेती व्यवसायातील मालाच्या निर्यातीचा मार्ग मोकळा होणार आहे. देश-विदेशांत मालाची निर्यात करण्यासाठी औरंगाबादेतील औद्योगिक क्षेत्रासाठी एअर कार्गो सेवा एक प्रकारे वरदान ठरणार आहे. या सेवेमुळे कमीत कमी वेळेत मालाची निर्यात करून औरंगाबाद शहर आंतरराष्ट्रीय पातळीवर आणखी भरारी घेणार आहे.केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमा शुल्क परिषदेने चिकलठाणा विमानतळाचा आपल्या मानांकन यादीत समावेश केला. त्यामुळे चिकलठाणा विमानतळ देशातील १९ वे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरले आहे. त्यामुळे चिकलठाणा विमानतळावरून बहुप्रतीक्षित एअर कार्गोची सुविधा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. देशांतर्गत एअर कार्गो सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रियाही आता पूर्ण झाली असून, दिल्ली येथील एजन्सीला त्याचे कंत्राट मिळाले आहे. जानेवारीत ही सेवा सुरू होणार आहे, तर आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा विमानतळ प्राधिकरण स्वत: हाताळणार असून, मार्चपर्यंत ही सेवाही सुरू होईल.जगप्रसिद्ध वेरूळ आणि अजिंठा लेणी, शहरातील पर्यटनस्थळांबरोबर परिसरातील औद्योगिक क्षेत्रामुळेही औरंगाबादचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे. आॅटोमोबाईल्स, कृषी उत्पादने, फार्मासह विविध राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्या औरंगाबादलगतच्या औद्योगिक वसाहतींमध्ये आहेत. आजघडीला या कंपन्या रेल्वे आणि रोड ट्रान्सपोर्टद्वारे मुंबई, दिल्ली येथून देश-विदेशांमध्ये मालाची निर्यात करतात; परंतु अशा प्रकारे मालाच्या निर्यातीमध्ये अधिक वेळ जातो. अशाच प्रकारे शेतीमालाचीही निर्यात होते. मात्र, एअर कार्गो सेवेमुळे कमीत कमी वेळेत या मालाची निर्यात होण्यास हातभार लागणार असल्याने निर्यातदारांचा हा त्रास कायमचा थांबणार आहे.नाशवंत पदार्थांसाठी फायदेशीरफळे, भाज्या अशा शेतीमालाचीही देश-विदेशांत निर्यात केली जाते. फळे, भाज्या हा नाशवंत माल असतो. हा माल कमीत कमी वेळत निश्चित ठिकाणी पोहोचणे गरजेचे असते; अन्यथा हा माल पोहोचेपर्यंत खराब होतो. रस्ते वाहतुकीद्वारे अनेकदा या समस्येला सामोरे जावे लागते. त्याचा आर्थिक फटका निर्यातदारांना सहन करावा लागतो. त्यामुळे अशा नाशवंत मालाची निर्यातीसाठी एअर कार्गो सेवा सर्वाधिक फायदेशीर ठरणार आहे.