शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
2
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
3
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
4
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
5
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
6
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
7
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
8
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
9
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
10
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
11
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
12
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
13
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
14
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
15
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
16
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
17
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
18
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

अंबादास कागदोपत्री नेता, खैरेंनी आता नातवंडे सांभाळावी; संदीपान भुमरेंची उद्धवसेनेच्या नेत्यांवर निशाणा

By बापू सोळुंके | Updated: April 13, 2025 22:02 IST

खैरे आणि अंबादास यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याचे गरज नाही - संदिपान भुमरे

छत्रपती संभाजीनगर: उद्धवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांना कोणी विचारत नाही, यामुळे त्यांनी आता नातवंडे सांभाळावी, तर अंबादास दानवे हे कागदोपत्री नेता आहे, या दोघांनी जिल्ह्याची वाट लावली, अशा शब्दात छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी त्यांच्यावर रविवारी निशाणा साधला.

मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या भुमरे यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, चंद्रकांत खैरे यांना का महत्व द्यायचे. हे स्वत: म्हणतात, मला कोणी विचारत नाही, माझं कोणी एकेत नाही. जनतेने त्यांना फार डोक्यावर घेतले होते. आता त्यांना कोणी विचारत नाही, हे खरे आहे. त्यांनी आता घरी बसून नातवंडे सांभाळावी. अंबादासने स्वत: केलेले काम दाखवावे असे नमूद करीत अंबादासचे प्रॅक्टीकल काहीच काम नाही. ते फक्त कागदोपत्री नेता असल्याची टीका खा. भुमरे यांनी केली. ते म्हणाले की, जिल्ह्याची लोकसभा गेली, सगळी विधानसभा गेली आता मनपा आणि जिल्हा परिषदही जाईल. उद्धवसेनेकडे काहीच राहणार नाही. या दोन्ही नेत्यांनी जिल्ह्याची वाट लावल्याचे भुमरे यांनी सांगितले. खैरे आणि अंबादास यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याचे गरज नाही. हे दोघेच भांडू लागली आहेत. यामुळे येथे हे दोघेच राहणार आहेत. वरीही ते दोघेच (उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे )बापलेक पक्षात राहणार असल्याचे भुमरे म्हणाले. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सतत पक्षप्रवेशासाठी रोज गर्दी होत आहे. उद्धवसेनेकडे माणसेच राहिले नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

भुमरे यांनी एमएलडी पाणी किती सांगावे; अंबादास दानवे यांचे खा.भुमरे यांना उत्तर

मला कागदीनेता म्हणणाऱ्या खासदार संदीपान भुमरे यांनीध एमएलडी पाणी किती असते हे सांगावे, मेरी संस्थेचा पाण्यासंबंधी मराठवाडा विरोधी अहवाल त्यांनी वाचला का? असा सवाल करीत त्यांना केवळ गुत्तेदारी करणे एवढेच माहिती आहे, असे खोचक प्रत्यूत्तर विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी दिले.

तापडिया नाट्य मंदीर येथे पत्रकारांनी भुमरे यांनी केलेल्या टीकेकडे आ.दानवे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, मी शहराच्या पाणी प्रश्नांवर सरकारविरोधात संघटन उभे करीत आहे. शहराचा पाणी प्रश्न कागदावर आहे का, असा सवाल त्यांनी केला. लोकसभा, विधानसभा निवडणूकीत उद्धवसेनेच्या पराभव झाल्याची टीका भुमरे यांनी केली होती. याकडे लक्ष वेधले असता आ.दानवे म्हणाले की, मागील निवडणुकांमध्ये सत्तेचा दुरुपयोग करुन आणि भ्रष्टाचाराचा पैसा वापर केल्याने आम्हाला सत्ता मिळाली नाही, असे नमूद केले.

टॅग्स :Sandeepan Bhoomraसंदीपान भुमरेAmbadas Danweyअंबादास दानवेChandrakant Khaireचंद्रकांत खैरेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर