शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
2
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
3
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
4
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
5
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
6
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
7
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
8
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
9
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
10
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
11
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
12
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
13
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
14
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
15
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
16
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
17
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
18
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
19
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
20
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

अंबादास कागदोपत्री नेता, खैरेंनी आता नातवंडे सांभाळावी; संदीपान भुमरेंची उद्धवसेनेच्या नेत्यांवर निशाणा

By बापू सोळुंके | Updated: April 13, 2025 22:02 IST

खैरे आणि अंबादास यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याचे गरज नाही - संदिपान भुमरे

छत्रपती संभाजीनगर: उद्धवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांना कोणी विचारत नाही, यामुळे त्यांनी आता नातवंडे सांभाळावी, तर अंबादास दानवे हे कागदोपत्री नेता आहे, या दोघांनी जिल्ह्याची वाट लावली, अशा शब्दात छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी त्यांच्यावर रविवारी निशाणा साधला.

मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या भुमरे यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, चंद्रकांत खैरे यांना का महत्व द्यायचे. हे स्वत: म्हणतात, मला कोणी विचारत नाही, माझं कोणी एकेत नाही. जनतेने त्यांना फार डोक्यावर घेतले होते. आता त्यांना कोणी विचारत नाही, हे खरे आहे. त्यांनी आता घरी बसून नातवंडे सांभाळावी. अंबादासने स्वत: केलेले काम दाखवावे असे नमूद करीत अंबादासचे प्रॅक्टीकल काहीच काम नाही. ते फक्त कागदोपत्री नेता असल्याची टीका खा. भुमरे यांनी केली. ते म्हणाले की, जिल्ह्याची लोकसभा गेली, सगळी विधानसभा गेली आता मनपा आणि जिल्हा परिषदही जाईल. उद्धवसेनेकडे काहीच राहणार नाही. या दोन्ही नेत्यांनी जिल्ह्याची वाट लावल्याचे भुमरे यांनी सांगितले. खैरे आणि अंबादास यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याचे गरज नाही. हे दोघेच भांडू लागली आहेत. यामुळे येथे हे दोघेच राहणार आहेत. वरीही ते दोघेच (उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे )बापलेक पक्षात राहणार असल्याचे भुमरे म्हणाले. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सतत पक्षप्रवेशासाठी रोज गर्दी होत आहे. उद्धवसेनेकडे माणसेच राहिले नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

भुमरे यांनी एमएलडी पाणी किती सांगावे; अंबादास दानवे यांचे खा.भुमरे यांना उत्तर

मला कागदीनेता म्हणणाऱ्या खासदार संदीपान भुमरे यांनीध एमएलडी पाणी किती असते हे सांगावे, मेरी संस्थेचा पाण्यासंबंधी मराठवाडा विरोधी अहवाल त्यांनी वाचला का? असा सवाल करीत त्यांना केवळ गुत्तेदारी करणे एवढेच माहिती आहे, असे खोचक प्रत्यूत्तर विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी दिले.

तापडिया नाट्य मंदीर येथे पत्रकारांनी भुमरे यांनी केलेल्या टीकेकडे आ.दानवे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, मी शहराच्या पाणी प्रश्नांवर सरकारविरोधात संघटन उभे करीत आहे. शहराचा पाणी प्रश्न कागदावर आहे का, असा सवाल त्यांनी केला. लोकसभा, विधानसभा निवडणूकीत उद्धवसेनेच्या पराभव झाल्याची टीका भुमरे यांनी केली होती. याकडे लक्ष वेधले असता आ.दानवे म्हणाले की, मागील निवडणुकांमध्ये सत्तेचा दुरुपयोग करुन आणि भ्रष्टाचाराचा पैसा वापर केल्याने आम्हाला सत्ता मिळाली नाही, असे नमूद केले.

टॅग्स :Sandeepan Bhoomraसंदीपान भुमरेAmbadas Danweyअंबादास दानवेChandrakant Khaireचंद्रकांत खैरेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर