शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
6
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
7
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
8
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
9
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
10
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
11
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
12
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
13
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
14
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
17
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
18
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
19
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
20
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?

पार्किंगच्या जागांना विळखा

By admin | Updated: December 19, 2014 00:59 IST

विकास राऊत, औरंगाबाद शहरात वाहनांची संख्या वाढत आहे. वाहन पार्क करण्यासाठी मनपाने १० वर्षांत कुठेही सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही.

विकास राऊत, औरंगाबादशहरात वाहनांची संख्या वाढत आहे. वाहन पार्क करण्यासाठी मनपाने १० वर्षांत कुठेही सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. परिणामी पार्किंग अभावी शहरवासीयांचे हाल होत असतानाच २००२ पर्यंतच्या विकास आराखड्यात पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या जागेवरील आरक्षण उठवून त्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याच्या हालचाली पालिका दरबारी सुरू आहेत. तसे झाले तर भविष्यात शहरात पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. मनपा हद्दीतील विकास आराखड्यानुसार शहरातील वाढत्या वाहनसंख्येच्या अनुषंगाने आरक्षित केलेल्या पार्किंगच्या जागा धोक्यात आल्या आहेत. त्या जागांवरील आरक्षण उठविण्यासाठी मागील १० वर्षांपासून अनेकदा प्रयत्न झाले. २००७ पर्यंत अनेक जागांचे आरक्षण उठवून त्या बिल्डरांना देण्यात आल्या. सध्या काही जागांवर अतिक्रमणे झाली आहेत, तर काही ठिकाणी हक्कसोड प्रमाणपत्रांच्या आधारे दुसऱ्या ठिकाणच्या जागांचा मार्ग मोकळा करून दिला आहे.पालिकेने भूसंपादन करण्याचा आजवर विचार केलेला नाही. टीडीआर, एफएसएससारखा मोबदला देण्यासाठीही मनपा पुढे आलेली नाही. त्यामुळे जागा असतानाही शहरात पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात सध्या ६ लाख वाहने आहेत. पैठणगेट, सादिया मार्केट, नागेश्वरवाडी वगळता शहरात कुठेही पे अ‍ॅण्ड पार्कची सुविधा मनपाने दिलेली नाही. गुलमंडी, औरंगपुरा भाजीमंडई, नागेश्वरवाडी नाला, बीबी का मकबऱ्याजवळ, पाणचक्की, क्रांतीचौक, देवगिरी कॉलेजजवळील जागांवर पार्किंगचे आरक्षण आलेले आहे.वाढीव शहर हद्दीनुसार इटखेडा गट नं. ४०, ४१ मध्ये पार्किंगचे आरक्षण आले आहे. सातारा, पडेगाव, गारखेड्यात २००२ च्या विकास आराखड्यानुसार पार्किंगसाठी जागा आरक्षित केलेली आहे.