शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

औरंगाबाद जिल्हा परिषदेतील ‘चटोपाध्याय’चे प्रकरण आता नव्या ‘सीईओं’कडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 17:33 IST

जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्र्यरत साडेआठशे पात्र शिक्षकांच्या चटोपाध्याय वेतनश्रेणीच्या प्रस्तावावर मागील वर्षापासून निर्णय होत नाही.

ठळक मुद्देशासन निर्णयानुसार सलग १२ वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणीनुसार वरिष्ठश्रेणी व २४ वर्षांची सेवा पूर्ण झाल्यास निवडश्रेणी लागू केली जाते.

औरंगाबाद : जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्र्यरत साडेआठशे पात्र शिक्षकांच्या चटोपाध्याय वेतनश्रेणीच्या प्रस्तावावर मागील वर्षापासून निर्णय होत नाही. यासंदर्भात विविध शिक्षक संघटनांनी आंदोलने केली. अनेकदा शिक्षणाधिकारी, ‘सीईओ’, जि. प. अध्यक्षांना निवेदने दिली; परंतु एकही प्रकरण अद्याप निकाली काढण्यात आलेले नाही. आता दोन दिवसांपूर्वीच पदभार घेतलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्याकडे यासंबंधीची संचिका निर्णयास्तव शिक्षणाधिकारी जैस्वाल यांनी सादर केली आहे. 

शासन निर्णयानुसार सलग १२ वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणीनुसार वरिष्ठश्रेणी व २४ वर्षांची सेवा पूर्ण झाल्यास निवडश्रेणी लागू केली जाते. यासाठी १२ व २४ वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या शिक्षकांचे जि. प. शिक्षण विभागाकडे ९१६ प्रस्ताव प्राप्त झाले होते. प्राप्त प्रस्ताव निकाली काढण्यासाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा समितीने या प्रस्तावांची छाननी करून ८५१ शिक्षकांची अंतिम यादी तयार केली. ६५ प्रस्ताव अपात्र ठरले आहेत. 

तथापि, २३ आॅक्टोबर २०१७ रोजी जारी झालेल्या शासन निर्णयामध्ये सदरील वेतनश्रेणीचा लाभ देण्यापूर्वी संबंधित शिक्षकांच्या शाळा या शाळासिद्धीनुसार ‘ए’ ग्रेड असाव्यात, उच्च माध्यमिक शिक्षकांच्या इयत्ता ९ वी व १० वीचा निकाल ८० टक्क्यांपेक्षा अधिक असावा, असे निर्देश आहेत. सदरील शासन निर्णय जारी होण्याअगोदर जे पात्र शिक्षक आहेत, त्यांना या योजनेचा लाभ द्यावा, असे शासनाने परिपत्रकही निर्गमित केले आहे; पण जिल्हा परिषद प्रशासनाने चटोपाध्याय वेतनश्रेणी व निवडश्रेणीच्या प्रस्तावांवर निर्णयच घेतला नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रशासनाप्रती नाराजी पसरली आहे. 

शिक्षकांमध्ये आशेचे किरणयासंदर्भात विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर या सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा केली आहे. जे शिक्षक २३ आॅक्टोबर २०१७ रोजी जारी झालेल्या शासन निर्णयापूर्वी वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणीसाठी पात्र आहेत. त्यांना अन्य जिल्हा परिषदांनी या योजनेचा लाभ दिलेला आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेला यासंदर्भात पुरावेही दिलेले आहेत; पण प्रशासनाची भूमिका नकारात्मक होती. आता नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी निर्णय घेतील, असा विश्वास शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदTeacherशिक्षकzp schoolजिल्हा परिषद शाळा