शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

पीक कर्जासाठी अवाजवी शुल्काची होतेय आकारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2015 00:52 IST

जालना : बँक आॅफ महाराष्ट्रकडून नवीन पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून अवाजवी शुल्क आकाण्यात येत असल्याची तक्रार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष

जालना : बँक आॅफ महाराष्ट्रकडून नवीन पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून अवाजवी शुल्क आकाण्यात येत असल्याची तक्रार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे यांनी बँकेच्या पुणे येथील अध्यक्षांकडे मंगळवारी केली आहे.याबाबत दिलेल्या निवेदनात जिल्हाध्यक्ष डोंगरे यांनी म्हटले आहे की, या बँकेच्या विविध शाखांतून जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी नेहमी पीक कर्ज घेतात. मागील कर्जाचा नियमित भरणा करून ते नवीन पीक कर्ज घेतात. मागील वर्षापर्यंत पीक कर्ज घेताना शेतकऱ्यांना केवळ एक रुपयाचे तिकिट लावावे लागत होते. मात्र यंदापासून दीड हजार रुपयांपर्यंतचे विविध प्रकारचे अवाजवी शुल्काचा भरणा करावा लागत आहे. त्यानंतरच नवीन पीक कर्ज दिले जाईल, असे बँकेच्या स्थानिक व्यवस्थापकांकडून सांगण्यात येत आहे.वास्तविक संपूर्ण देशात शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक कर्जावर व्याज देखील आकारू नये, त्यांना मोफत पीक कर्ज दिले जावे, याकरीता केंद्र शासन तसेच महाराष्ट्र शासन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र शासनाने तर जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांना बिनव्याजी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना लागू केली आहे. तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून ३ टक्के व्याज सवलत योजना व महाराष्ट्र शासनाकडून २.५ टक्के व्याज सवलत योजना सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे अवाजवी शुल्क आकारून शेतकऱ्यांना अडचणीत आणू नये.उलट शेतकऱ्यांकरीता एखादी सवलतीची योजना लागू करून त्यांना काही मदत करता येईल असे प्रयत्न करावेत, अशी मागणी करून डोंगरे यांनी बँकेने अवाजवी शुल्क आकारणी बंद न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)