शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

विद्यापीठात शुल्क लाटणारी टोळी

By admin | Updated: March 3, 2015 00:29 IST

औरंगाबाद : महाविद्यालयांमार्फत विविध शुल्कापोटी सादर केले जाणारे धनाकर्ष (डीडी) न वटवता ते परस्पर गायब करणारी मोठी टोळी विद्यापीठात सक्रिय आहे.

औरंगाबाद : महाविद्यालयांमार्फत विविध शुल्कापोटी सादर केले जाणारे धनाकर्ष (डीडी) न वटवता ते परस्पर गायब करणारी मोठी टोळी विद्यापीठात सक्रिय आहे. आतापर्यंत या टोळीने विद्यापीठाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा चुना लावल्याचे उघडकीस आले आहे. असे असतानादेखील प्रशासनाने सदरील टोळीचा पर्दाफाश करण्याच्या भानगडीत न पडता महाविद्यालयांमार्फत सादर केले जाणारे विविध शुल्क हे आता ‘आरटीजीएस’ प्रणालीच्या माध्यमातून स्वीकारण्याची प्रक्रिया अमलात आणली आहे. या प्रणालीमुळे विद्यापीठाला गतवर्षीच्या तुलनेत कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला आहे. यासंदर्भात विद्यापीठ सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, महाविद्यालयांमार्फत संलग्नीकरण शुल्क, शैक्षणिक शुल्क, एनएसएस शुल्क, परीक्षा शुल्क, विद्यार्थी कल्याणाच्या योजनांचे विविध शुल्क आतापर्यंत ‘डीडी’च्या माध्यमातून विद्यापीठास सादर केले जात होते. मात्र, विद्यापीठातील ‘बाबू’मंडळी व काही महाविद्यालयांनी हातमिळवणी करून प्राप्त ‘डीडी’च्या नोंदी रजिस्टरमध्ये केल्या जायच्या; पण सदरील ‘डीडी’ कालमर्यादेत विद्यापीठाच्या खात्यावर जमा न करता तो जाणीवपूर्वक कालबाह्य केले जात असे. त्यानंतर ‘डीडी’ कालबाह्य झाल्याचा निरोप संबंधित महाविद्यालयांना गेल्यानंतर ठरलेला ‘दाम’ घेऊन ते परत केले जात असे. दरवर्षी या माध्यमातून विद्यापीठाला कोट्यवधी रुपयांचा तोटा होत असल्याचे नुकतेच उघडकीसआले. ‘ईएमडी’ मध्येही तत्परता‘अर्नेस्ट मनी डिपॉझिट’ (ईएमडी) अर्थात संबंधित कंत्राटाच्या एकूण रकमेवर १ किंवा २ टक्के भरली जाणारी रक्कम ही परत करण्यामध्येही मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचे उघडकीस आले. ज्या संस्थांचे कंत्राट मंजूर झाले नाही, त्या कंत्राटदारांना ‘ईएमडी’ची रक्कम वर्षानुवर्षे परत केली जात नसे. यापुढे सदरील रक्कम ही निविदाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया विद्यापीठाने अमलात आणली आहे.