शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणानुसार होतोय डासांमध्ये बदल : पावसाळ्यानंतर आढळणारा डेंग्यू आता कमी-अधिक प्रमाणात वर्षभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 00:01 IST

औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूचा विळखा तिपटीने वाढला आहे. विशेष म्हणजे वातावरणानुसार डासांमध्ये बदल होत आहे.

ठळक मुद्देडेंग्यूचा विळखा वाढला तिपटीने

औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूचा विळखा तिपटीने वाढला आहे. विशेष म्हणजे वातावरणानुसार डासांमध्ये बदल होत आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर होणारी डेंग्यूची लागण आता कमी-अधिक प्रमाणात वर्षभर होत असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली.पावसाळ्यात ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होण्यास हातभार लागतो. त्यामुळे पावसाळ्याला सुरुवात होताच आरोग्य विभागाकडून कोरडा दिवस, धूरफवारणीसह विविध उपाय राबविण्यावर भर दिला जातो. शहराबरोबरच ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम, घरांचे सर्वेक्षण करणे, डास नष्ट होण्यासाठी विविध उपाययोजना, कोरडा दिवस, धूरफवारणी यासह शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर विविध कार्यक्रम राबविण्यात येतात. या सगळ्यानंतरही आरोग्य विभागाला यंदा डेंग्यूवर नियंत्रण मिळण्यात अपयश आल्याचे दिसते.आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली हे चार जिल्हे आहेत. या चारही जिल्ह्यांमध्ये २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या तिप्पट झाली आहे. डेंग्यूच्या रुग्णांत डोकेदुखी, सांधे, अंग दुखणे, डोळ्यामागे वेदना, अशी लक्षणे असतात. डेंग्यूमध्ये प्लेटलेटचेही प्रमाण कमी होते. ९५ टक्के रुग्णांमध्ये गंभीर परिस्थिती नसते. परंतु डेंग्यूची वाढती रुग्णसंख्या ही चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.उन्हाबरोबर थंडीतही विषाणूपावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर डेंग्यूचा प्रादुर्भाव होतो. परंतु यंदा मे महिन्यात चार जिल्ह्यांत एकूण २१ रुग्ण आढळले. विशेष म्हणजे गतवर्षी मे महिन्यात एकही रुग्ण नव्हता. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये अनुक्रमे ६५ आणि २६ रुग्ण आढळले. त्यामुळे उन्हाबरोबर थंडीतही डेंग्यूचे विषाणू वाढत असल्याचे दिसते.विषाणूजन्य आजारडेंग्यू हा विषाणूजन्य आजार आहे. कमी तीव्रता, मध्यम तीव्रता आणि अधिक तीव्रता स्वरुपात त्याची लागण होते. पावसाळ्यानंतर लागण होणारा डेंग्यू आता वर्षभर ठाण मांडत आहे. थंडीमध्येही डेंग्यूची लागण होताना दिसत आहे.- डॉ. मकरंद दिवाण, उपाध्यक्ष, भारतीय बालरोग संघटना५ टक्के रुग्ण गंभीरडेंग्यूच्या डासांकडून वातावरणाला अनुसरून बदल केला जात असल्याचे दिसते. त्यामुळे वर्षभर कमी-अधिक प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. डेंग्यूची लागण होत असली तरी ९५ टक्के लोकांमध्ये कोणतीही गंभीर परिस्थिती नसते. केवळ ५ टक्के लोकांमध्ये गंभीर परिस्थिती उद्भवते.-डॉ. अभय पोहेकर, फिजिशियनआॅक्टोबरमध्ये सर्वाधिक रुग्णऔरंगाबादेत गतवर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूच्या संख्येत वाढ झाली आहे. यामध्ये आॅक्टोबर महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर रुग्ण कमी होत गेले आहेत. डास अळी आणि एडिस डासांच्या उत्पत्तीत वाढ झाल्याने ही संख्या वाढल्याचे दिसते.- अनिल पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी