शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

वातावरणानुसार होतोय डासांमध्ये बदल : पावसाळ्यानंतर आढळणारा डेंग्यू आता कमी-अधिक प्रमाणात वर्षभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 00:01 IST

औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूचा विळखा तिपटीने वाढला आहे. विशेष म्हणजे वातावरणानुसार डासांमध्ये बदल होत आहे.

ठळक मुद्देडेंग्यूचा विळखा वाढला तिपटीने

औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूचा विळखा तिपटीने वाढला आहे. विशेष म्हणजे वातावरणानुसार डासांमध्ये बदल होत आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर होणारी डेंग्यूची लागण आता कमी-अधिक प्रमाणात वर्षभर होत असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली.पावसाळ्यात ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होण्यास हातभार लागतो. त्यामुळे पावसाळ्याला सुरुवात होताच आरोग्य विभागाकडून कोरडा दिवस, धूरफवारणीसह विविध उपाय राबविण्यावर भर दिला जातो. शहराबरोबरच ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम, घरांचे सर्वेक्षण करणे, डास नष्ट होण्यासाठी विविध उपाययोजना, कोरडा दिवस, धूरफवारणी यासह शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर विविध कार्यक्रम राबविण्यात येतात. या सगळ्यानंतरही आरोग्य विभागाला यंदा डेंग्यूवर नियंत्रण मिळण्यात अपयश आल्याचे दिसते.आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली हे चार जिल्हे आहेत. या चारही जिल्ह्यांमध्ये २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या तिप्पट झाली आहे. डेंग्यूच्या रुग्णांत डोकेदुखी, सांधे, अंग दुखणे, डोळ्यामागे वेदना, अशी लक्षणे असतात. डेंग्यूमध्ये प्लेटलेटचेही प्रमाण कमी होते. ९५ टक्के रुग्णांमध्ये गंभीर परिस्थिती नसते. परंतु डेंग्यूची वाढती रुग्णसंख्या ही चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.उन्हाबरोबर थंडीतही विषाणूपावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर डेंग्यूचा प्रादुर्भाव होतो. परंतु यंदा मे महिन्यात चार जिल्ह्यांत एकूण २१ रुग्ण आढळले. विशेष म्हणजे गतवर्षी मे महिन्यात एकही रुग्ण नव्हता. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये अनुक्रमे ६५ आणि २६ रुग्ण आढळले. त्यामुळे उन्हाबरोबर थंडीतही डेंग्यूचे विषाणू वाढत असल्याचे दिसते.विषाणूजन्य आजारडेंग्यू हा विषाणूजन्य आजार आहे. कमी तीव्रता, मध्यम तीव्रता आणि अधिक तीव्रता स्वरुपात त्याची लागण होते. पावसाळ्यानंतर लागण होणारा डेंग्यू आता वर्षभर ठाण मांडत आहे. थंडीमध्येही डेंग्यूची लागण होताना दिसत आहे.- डॉ. मकरंद दिवाण, उपाध्यक्ष, भारतीय बालरोग संघटना५ टक्के रुग्ण गंभीरडेंग्यूच्या डासांकडून वातावरणाला अनुसरून बदल केला जात असल्याचे दिसते. त्यामुळे वर्षभर कमी-अधिक प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. डेंग्यूची लागण होत असली तरी ९५ टक्के लोकांमध्ये कोणतीही गंभीर परिस्थिती नसते. केवळ ५ टक्के लोकांमध्ये गंभीर परिस्थिती उद्भवते.-डॉ. अभय पोहेकर, फिजिशियनआॅक्टोबरमध्ये सर्वाधिक रुग्णऔरंगाबादेत गतवर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूच्या संख्येत वाढ झाली आहे. यामध्ये आॅक्टोबर महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर रुग्ण कमी होत गेले आहेत. डास अळी आणि एडिस डासांच्या उत्पत्तीत वाढ झाल्याने ही संख्या वाढल्याचे दिसते.- अनिल पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी