शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

चंद्रकांत खैरेंच्या तक्रारीचा तिसरा कोन !

By सुधीर महाजन | Updated: May 7, 2019 12:30 IST

दानवे विरोधात काम करतात अशी तक्रार निवडणूक काळातच करता आली असती; पण ती नंतर केली गेली. यामागे तिसरा कोन आहे

- सुधीर महाजन

निवडणुकीचा शिमगा ओसरल्यानंतर कवित्वाला बहर आला आहे साहजिकच आहे ते, कारण निवडणूक ही एक प्रकारचे युद्ध असते. ते रणांगणावर, दिवाणखाण्यात, सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि मानसशास्त्रीय या सर्वच पातळ्यांवर लढावे लागते. जसा युद्धाचा एक धर्म असतो तोच निवडणुकीत मित्र पक्षांचाही धर्म असतो मित्र पक्षांकडून घात अपेक्षित नसतो; परंतु औरंगाबादचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी मित्रपक्ष म्हणजे भाजप आणि त्यातही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युतीधर्म न पाळता घात केला असा थेट आरोप करून खळबळ उडवून दिली. औरंगाबादच्या निवडणुकीकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. कारण येथे शिवसेना, एम.आय.एम. आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव अशी तिहेरी लढत झाली. जाधवांच्या उमेदवारीने जशी रंगत वाढली तसा तिढाही, कारण जाधवांच्या मागे मराठा मतदार उभा राहिल्याचे चित्र निर्माण झाले होते. मराठा आंदोलनानंतर मराठा मतांचे धृवीकरण करण्याचा प्रयोग जाधवांच्या उमेदवारीतून झाल्याची चर्चा आहे. हर्षवर्धन जाधवांचे महत्त्व एवढेच नाही; तर ते रावसाहेब दानवेंचे जावई आहेत.

या निवडणुकीत रावसाहेब दानवेंनी शिवसेनेला मदत न करता हर्षवर्धन जाधवांना मदत केल्याचा खैरेंचा आरोप आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर दानवेंनी जाधवांना ५० लाखाची आर्थिक रसद पुरवली असा आरोप केला. या निवडणुकीत भाजप प्रचारात नव्हती त्यामुळे आपल्याला मदत मिळाली नाही अशी तक्रार आहे. खैरे यांनी ही तक्रार थेट अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे केली; पण यांचे स्पष्टीकरण पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुजीतसिंग ठाकुर यांनी केले. वास्तविक ते प्रदेशाध्यक्ष या नात्याने दानवे यांच्याकडून अपेक्षित होते आणि या घटनेपासून दानवेही कुठे दिसत नाहीत.

औरंगाबाद महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजप अशी सत्ताधारी आघाडी असली तरी येथेही युतीधर्माचे पालन होतानां दिसत नाही. शहरात तीव्र पाणी टंचाई आहे, त्यावर उपाय शोधण्याऐवजी भाजप नगरसेवकांनी आंदोलने केली, खरे तर ते सत्ताधारी; पण निवडणुकीपूर्वी शिवसेने विरोधात जनक्षोभ वाढविण्याचे काम भाजपने केले. पालिकेत पावलापावलावर एकमेकांना पद्धतशिरपणे कोलदांडा घालण्याचे काम हे दोन्ही पक्ष करतात. त्यामुळे विरोधीपक्षांना कामच राहिले नाही. निवडणुकीच्या काळात पक्षातील काही नेते मंडळी नागपूर, बीड, मुंबई, पुणे या शहरांमध्ये प्रचारासाठी गेली होती. शिवसेनेचा प्रचार टाळण्याचा हा उत्तम मार्ग त्यांनी शोधून काढला. प्रचार केला नाही असा आरोप करण्यास वाव न देण्याचा हा प्रकार म्हणावा लागेल.

खैरेंच्या  या तक्रारीला आणखी एक राजकीय पदर असल्याचे जोरदार चर्चा आहे. दानवे विरोधात काम करतात अशी तक्रार निवडणूक काळातच करता आली असती; पण ती नंतर केली. कारण रावसाहब दानवे यांनी आपले स्थान मराठवाड्यात भक्कम करतांना पक्षातील विरोधकांची व्यवस्थित व्यवस्था करून ठेवल्याने आज मराठवाड्याचे नेते अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यातून त्यांची नजर मुख्यमंत्री पदावर आहे, यामुळे त्यांचे पंख छाटण्यासाठी खैरेंच्या मार्फत भाजपमधूनच ही खेळी खेळली गेली अशी ही चर्चा आहे. खैरेंच्या आरोपांचे उत्तर दानवेंनी दिले असते तर संशयाचे मळभ हटले असते; पण आजपर्यंत ते समोर आले नाही, त्यामुळे संशय वाढला आहे. निकालापूर्वी नव्या साठमारीला सुरूवात झाली. निकालानंतर काय ?

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादChandrakant Khaireचंद्रकांत खैरे