शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

चोरट्यांचे आव्हान; भरदुपारी घरफोड्या !

By admin | Updated: October 27, 2014 00:10 IST

रमेश शिंदे , औसा मागील तीन ते चार महिन्यांपासून औसा शहरासह तालुक्यात चोरट्यांनीच पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. तीन महिन्यांत ५० पेक्षा अधिक घरफोड्या झाल्या आहेत.

रमेश शिंदे , औसामागील तीन ते चार महिन्यांपासून औसा शहरासह तालुक्यात चोरट्यांनीच पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. तीन महिन्यांत ५० पेक्षा अधिक घरफोड्या झाल्या आहेत. चोरटे भरदुपारी हात साफ करीत असून पोलिसांचा तपास मात्र शून्यातच आहे. औसा शहरात ज्या काही मोठ्या घरफोड्या झाल्या त्याचे गुन्हे नोंदही आहेत. पण लहान-सहान घरफोड्यांचे गुन्हे नोंद होत नाहीत. त्यामुळे चोऱ्यांची ही मालिका वरिष्ठांच्या नजरेसमोर येत नाही. ऐन दिवाळीत भर दुपारी तीन-चार घरफोड्या झाल्या असून, आता तरी औसा पोलिस झोपेतून जागे होणार का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. औसा तालुक्यात औसा, किल्लारी व भादा हे तीन पोलिस ठाणे व औसा येथेच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय आहे. मागील तीन-चार महिन्यांपासून औसा शहरासह ग्रामीण भागात मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शहरात तर भरदिवसा घरफोड्या करण्याची मालिकाच चोरट्यांनी सुरू केली आहे. प्रत्येक तीन-चार दिवसांनी घरफोडी ठरलेलीच आहे. तीन महिन्यांपूर्वी नागरसोगा येथील मोहन मुसांडे यांच्या घरी ७ लाखांची चोरी झाली. त्यानंतर औसा शहरातील एका कापड दुकानातून ५० हजार लंपास करण्यात आले. गौरीशंकर मिटकरी या व्यापाऱ्याचे घरही भरदुपारी फोडले. मुख्याध्यापक अनिल मुळे, शिक्षक बालाजी लिंबाळकर, सुरेश दुरुगकर यांच्यासह अनेकांची घरे फोडली. यामध्ये लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. या लोकांनी पोलिसांत तक्रारी दिल्या. पण ज्यांचा कमी ऐवज चोरीस गेला, त्यांनी मात्र पोलिसांकडे तक्रारी देण्याचे टाळले. काही जण तक्रार करायला गेले. तर पोलिसांनीच त्यांना सल्ला दिला की तक्रार करून काय मिळणार आहे म्हणून अनेक तक्रारी दाखलच झाल्या नाहीत. पण या तीन ते चार महिन्यांत ५० पेक्षा अधिक घरफोड्या झाल्या आहेत. दिवाळीत ऐन पाडव्याच्या दिवशी बसस्थानकाजवळील अन्नपूर्णा नगरमधील टाचले व अन्य एक घर फोडले. त्याच रात्री हनुमान मंदिरानजिक एक किराणा दुकान तर भाऊबीजेदिवशी मिटकरी यांचे घर फोडले. दोन दिवसात चार ठिकाणी चोऱ्या झाल्या. पण एकही गुन्हा दाखल नाही. चोरी झालेल्या एकाने सांगितले की, चोरी झाली खरी. पण तक्रार देणे म्हणजे ‘भीक नको, कुत्रे आवर’ अशी अवस्था आहे. म्हणून अर्ज दिला नसल्याचे सांगितले. एकूणच चोरट्यांनी मात्र औसा पोलिसांनाच आव्हान दिले आहे.औसा शहरात चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या घटनांचा तपास लागत नसल्याने आरोपी अद्यापही मोकाटच असल्याचे पहावयास मिळत आहे. परिणामी, चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. विशेषत: सध्या दिवसा चोऱ्यांच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, दिवसा घर उघडे ठेवणे धोकादायक ठरत आहे. त्याचबरोबर घरास कुलूप लावलेले दिसल्यास चोरटे अशी घरे फोडून घरातील ऐवज लंपास करीत आहेत. त्यामुळे नागरिकांना घरास कुलूप लावून बाहेरगावी जाणे धोकादायक ठरत आहे. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.