शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

चोरट्यांचे आव्हान; भरदुपारी घरफोड्या !

By admin | Updated: October 27, 2014 00:10 IST

रमेश शिंदे , औसा मागील तीन ते चार महिन्यांपासून औसा शहरासह तालुक्यात चोरट्यांनीच पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. तीन महिन्यांत ५० पेक्षा अधिक घरफोड्या झाल्या आहेत.

रमेश शिंदे , औसामागील तीन ते चार महिन्यांपासून औसा शहरासह तालुक्यात चोरट्यांनीच पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. तीन महिन्यांत ५० पेक्षा अधिक घरफोड्या झाल्या आहेत. चोरटे भरदुपारी हात साफ करीत असून पोलिसांचा तपास मात्र शून्यातच आहे. औसा शहरात ज्या काही मोठ्या घरफोड्या झाल्या त्याचे गुन्हे नोंदही आहेत. पण लहान-सहान घरफोड्यांचे गुन्हे नोंद होत नाहीत. त्यामुळे चोऱ्यांची ही मालिका वरिष्ठांच्या नजरेसमोर येत नाही. ऐन दिवाळीत भर दुपारी तीन-चार घरफोड्या झाल्या असून, आता तरी औसा पोलिस झोपेतून जागे होणार का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. औसा तालुक्यात औसा, किल्लारी व भादा हे तीन पोलिस ठाणे व औसा येथेच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय आहे. मागील तीन-चार महिन्यांपासून औसा शहरासह ग्रामीण भागात मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शहरात तर भरदिवसा घरफोड्या करण्याची मालिकाच चोरट्यांनी सुरू केली आहे. प्रत्येक तीन-चार दिवसांनी घरफोडी ठरलेलीच आहे. तीन महिन्यांपूर्वी नागरसोगा येथील मोहन मुसांडे यांच्या घरी ७ लाखांची चोरी झाली. त्यानंतर औसा शहरातील एका कापड दुकानातून ५० हजार लंपास करण्यात आले. गौरीशंकर मिटकरी या व्यापाऱ्याचे घरही भरदुपारी फोडले. मुख्याध्यापक अनिल मुळे, शिक्षक बालाजी लिंबाळकर, सुरेश दुरुगकर यांच्यासह अनेकांची घरे फोडली. यामध्ये लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. या लोकांनी पोलिसांत तक्रारी दिल्या. पण ज्यांचा कमी ऐवज चोरीस गेला, त्यांनी मात्र पोलिसांकडे तक्रारी देण्याचे टाळले. काही जण तक्रार करायला गेले. तर पोलिसांनीच त्यांना सल्ला दिला की तक्रार करून काय मिळणार आहे म्हणून अनेक तक्रारी दाखलच झाल्या नाहीत. पण या तीन ते चार महिन्यांत ५० पेक्षा अधिक घरफोड्या झाल्या आहेत. दिवाळीत ऐन पाडव्याच्या दिवशी बसस्थानकाजवळील अन्नपूर्णा नगरमधील टाचले व अन्य एक घर फोडले. त्याच रात्री हनुमान मंदिरानजिक एक किराणा दुकान तर भाऊबीजेदिवशी मिटकरी यांचे घर फोडले. दोन दिवसात चार ठिकाणी चोऱ्या झाल्या. पण एकही गुन्हा दाखल नाही. चोरी झालेल्या एकाने सांगितले की, चोरी झाली खरी. पण तक्रार देणे म्हणजे ‘भीक नको, कुत्रे आवर’ अशी अवस्था आहे. म्हणून अर्ज दिला नसल्याचे सांगितले. एकूणच चोरट्यांनी मात्र औसा पोलिसांनाच आव्हान दिले आहे.औसा शहरात चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या घटनांचा तपास लागत नसल्याने आरोपी अद्यापही मोकाटच असल्याचे पहावयास मिळत आहे. परिणामी, चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. विशेषत: सध्या दिवसा चोऱ्यांच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, दिवसा घर उघडे ठेवणे धोकादायक ठरत आहे. त्याचबरोबर घरास कुलूप लावलेले दिसल्यास चोरटे अशी घरे फोडून घरातील ऐवज लंपास करीत आहेत. त्यामुळे नागरिकांना घरास कुलूप लावून बाहेरगावी जाणे धोकादायक ठरत आहे. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.