शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

औरंगाबाद जिल्हा परिषदेसमोर निधीच्या खर्चाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 14:25 IST

मार्चअखेरपर्यंत हा निधी खर्च न झाल्यास तो शासनाला परत करण्याची नामुष्की ओढावणार आहे. 

ठळक मुद्देनिधी खर्चही मार्चअखेरची ‘डेडलाईन’ दोन्ही वर्षांतील खर्चाची टक्केवारी खूपच कमीसर्व विभागांची कसरत सुरू

औरंगाबाद : जिल्हा परिषदेला २०१७-१८ या आर्थिक वर्षात प्राप्त झालेला कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यासाठी आता सर्वच विभागांची कसरत सुरू आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत तब्बल १६८ कोटी ४ लाख ६७ हजार रुपयांचा निधी अखर्चित आहे. मार्चअखेरपर्यंत हा निधी खर्च न झाल्यास तो शासनाला परत करण्याची नामुष्की ओढावणार आहे. 

जि. प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर, अर्थ समितीचे सभापती विलास भुमरे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी मागील दोन महिन्यांपासून यंदा अखर्चित निधीपैकी एक रुपयाही व्यपगत होणार नाही, याबाबत सातत्याने सर्व विभागप्रमुख, सर्व गटविकास अधिकाऱ्यांना आढावा बैठकांच्या माध्यमातून सूचना दिल्या. त्यानुसार बहुतांशी कामांच्या निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या. 

अनेक कामांना प्रशासकीय, तांत्रिक मान्यता देण्यात आल्या. अनेक कामांच्या ‘वर्कआॅर्डर’ही दिल्या. काही कामांची बिले निकाली काढण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. एवढे सारे परिश्रम घेतल्यानंतरही फेब्रुवारीअखेरपर्यंत २०१७-१८ मध्ये जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या निधीपैकी सुमारे १६८ कोटी रुपये अखर्चित असल्याची बाब समोर आली आहे. चालू आर्थिक वर्षातील निधीच्या खर्चाचीदेखील सारखीच परिस्थिती आहे. यंदा जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या २०३ कोटी १९ लाख ८१ हजार रुपयांपैकी आतापर्यंत अवघे ९७ कोटी ३ लाख १३ हजार रुपये खर्च झाले आहेत. अजूनही १०६ कोटी १६ लाख ६८ हजार रुपये शिल्लक आहेत.

याव्यतिरिक्त शासनाकडून मिळालेल्या हस्तांतरित आणि अभिकरण योजनांचा ९० कोटी ४९ लाख रुपयांच्या निधीपैकी ५५ कोटी १० लाख ८५ हजार रुपये खर्च झाले असून, ३५ कोटी ३८ लाख १५ हजार रुपये खर्चाविना पडून आहेत. विशेष घटक योजनेंतर्गत यंदा ७१ कोटी ६४ लाख २५ हजार रुपयांचा निधी मिळाला होता. त्यापैकी अवघे ५ कोटी ९८ लाख ८५ हजार रुपये खर्च झाले असून, ६५ कोटी ६५ लाख ४० हजार रुपये शिल्लक आहेत. जि.प. उपकराच्या निधीचीही अवस्था तशीच आहे. ५४ कोटी ६१ लाख ४४ हजार रुपयांपैकी अवघे १३ कोटी ९ लाख ५३ हजार रुपये आतापर्यंत खर्च झाले आहेत. ४१ कोटी ५१ लाख ९० हजार रुपये मार्चअखेरपर्यंत खर्च करावे लागणार आहेत.

‘सीईओ’च सादर करणार अर्थसंकल्पलोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आता केव्हाही लागू शकते. अद्यापही अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेची नोटीस काढण्यात आलेली नाही. नोटीस जारी केल्यानंतर सभेसाठी किमान १० दिवसांचा अवधी द्यावा लागतो.४ त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्यामार्फतच सादर करण्याविषयी जिल्हा परिषदेत हालचाली सुरू झाल्या असून, १९ किंवा २० मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होईल. दरम्यान, यास स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी कौर यांनीही दुजोरा दिला आहे.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदfundsनिधीgovernment schemeसरकारी योजना