शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

औरंगाबाद जिल्हा परिषदेसमोर निधीच्या खर्चाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 14:25 IST

मार्चअखेरपर्यंत हा निधी खर्च न झाल्यास तो शासनाला परत करण्याची नामुष्की ओढावणार आहे. 

ठळक मुद्देनिधी खर्चही मार्चअखेरची ‘डेडलाईन’ दोन्ही वर्षांतील खर्चाची टक्केवारी खूपच कमीसर्व विभागांची कसरत सुरू

औरंगाबाद : जिल्हा परिषदेला २०१७-१८ या आर्थिक वर्षात प्राप्त झालेला कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यासाठी आता सर्वच विभागांची कसरत सुरू आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत तब्बल १६८ कोटी ४ लाख ६७ हजार रुपयांचा निधी अखर्चित आहे. मार्चअखेरपर्यंत हा निधी खर्च न झाल्यास तो शासनाला परत करण्याची नामुष्की ओढावणार आहे. 

जि. प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर, अर्थ समितीचे सभापती विलास भुमरे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी मागील दोन महिन्यांपासून यंदा अखर्चित निधीपैकी एक रुपयाही व्यपगत होणार नाही, याबाबत सातत्याने सर्व विभागप्रमुख, सर्व गटविकास अधिकाऱ्यांना आढावा बैठकांच्या माध्यमातून सूचना दिल्या. त्यानुसार बहुतांशी कामांच्या निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या. 

अनेक कामांना प्रशासकीय, तांत्रिक मान्यता देण्यात आल्या. अनेक कामांच्या ‘वर्कआॅर्डर’ही दिल्या. काही कामांची बिले निकाली काढण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. एवढे सारे परिश्रम घेतल्यानंतरही फेब्रुवारीअखेरपर्यंत २०१७-१८ मध्ये जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या निधीपैकी सुमारे १६८ कोटी रुपये अखर्चित असल्याची बाब समोर आली आहे. चालू आर्थिक वर्षातील निधीच्या खर्चाचीदेखील सारखीच परिस्थिती आहे. यंदा जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या २०३ कोटी १९ लाख ८१ हजार रुपयांपैकी आतापर्यंत अवघे ९७ कोटी ३ लाख १३ हजार रुपये खर्च झाले आहेत. अजूनही १०६ कोटी १६ लाख ६८ हजार रुपये शिल्लक आहेत.

याव्यतिरिक्त शासनाकडून मिळालेल्या हस्तांतरित आणि अभिकरण योजनांचा ९० कोटी ४९ लाख रुपयांच्या निधीपैकी ५५ कोटी १० लाख ८५ हजार रुपये खर्च झाले असून, ३५ कोटी ३८ लाख १५ हजार रुपये खर्चाविना पडून आहेत. विशेष घटक योजनेंतर्गत यंदा ७१ कोटी ६४ लाख २५ हजार रुपयांचा निधी मिळाला होता. त्यापैकी अवघे ५ कोटी ९८ लाख ८५ हजार रुपये खर्च झाले असून, ६५ कोटी ६५ लाख ४० हजार रुपये शिल्लक आहेत. जि.प. उपकराच्या निधीचीही अवस्था तशीच आहे. ५४ कोटी ६१ लाख ४४ हजार रुपयांपैकी अवघे १३ कोटी ९ लाख ५३ हजार रुपये आतापर्यंत खर्च झाले आहेत. ४१ कोटी ५१ लाख ९० हजार रुपये मार्चअखेरपर्यंत खर्च करावे लागणार आहेत.

‘सीईओ’च सादर करणार अर्थसंकल्पलोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आता केव्हाही लागू शकते. अद्यापही अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेची नोटीस काढण्यात आलेली नाही. नोटीस जारी केल्यानंतर सभेसाठी किमान १० दिवसांचा अवधी द्यावा लागतो.४ त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्यामार्फतच सादर करण्याविषयी जिल्हा परिषदेत हालचाली सुरू झाल्या असून, १९ किंवा २० मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होईल. दरम्यान, यास स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी कौर यांनीही दुजोरा दिला आहे.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदfundsनिधीgovernment schemeसरकारी योजना