शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

मतविभाजन रोखणे आघाडीला आव्हान!

By admin | Updated: November 16, 2016 00:14 IST

जालना : जालना नगर पालिका ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने शस्त्रे परजली

जालना : जालना नगर पालिका ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने शस्त्रे परजली असून, मतविभाजन टाळण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात आले आहे. एकूणच आघाडीच्या नेत्यांनी शस्त्रे परजली असून, गुरुवारपासून खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुराळा उडण्यास सुरुवात होणार आहे. जालना नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गत काही दिवसांत नाट्यमय घडामोडींना वेग आला. भाजपा आणि शिवसेनेने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यानंतर युतीने अपक्ष असलेल्या शकुंतला कदम यांना या पदासाठी उमेदवार म्हणून पुरस्कृत केले. त्यामुळे आघाडीच्या उमेदवारांचा आत्मविश्वास दुणावला आहे. असे असले तरी अपक्ष उमेदवाराकडून मतांचे विभाजन होऊ नये, या दृष्टीने दोन्ही पक्षांच्या धुरिणांकडून निवडणुकीतील प्रचाराची रणनीती आखली जात आहे. जालना शहरात मुस्लिम आणि दलित मतांचा टक्का लक्षणीय आहे. याच आधारावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी राजकीय गणित जुळविली आहेत. तसेच पालिकेत गत पाच वर्षांत केलेली विकास कामे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले जात आहेत. सध्या नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदांचे उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. या बैठकांतून आपापसातील मतभेद वा हेवेदावे बाजूला ठेवून एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले जात असले तरी दगाफटका होऊ नये, यासाठी दक्षता घेतली जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना व भाजपाच्या पुरस्कृत उमेदवार शकुंतला कदम याही राजकीयदृष्ट्या अनुभवी असल्याने आघाडीचे नेते संधी घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. मतांचे गणित जुळविण्यात त्यांनीही सुरुवात केली असून, विविध राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. यातून समाजातील दलित व मुस्लिम बांधव आपल्याकडे खेचण्याचा त्यांचा प्रयत्न असून, यात त्यांना कितपत यश येते, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. संगीता गोरंट्याल आणि शकुंतला कदम यांच्यातच थेट लढत होण्याची चिन्हे असून, प्रचारात कोणते मुद्दे उपस्थित होतात. मतदारांना ते कितपत पटतात, यावर यशअपयशाचे गणित अवलंबून राहणार आहे. १७ नोव्हेंबर रोजी उमेदवारांना चिन्हाचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रचारास सुरुवात होणार असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहे. त्यानंतर केवळ आठ दिवस प्रचाराचा झंझावात राहणार असून, उमेदवार प्रचारास सज्ज झाले आहेत.