शहरं
Join us  
Trending Stories
1
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
2
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
3
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
4
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
5
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
6
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
7
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
8
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
9
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
10
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
11
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
12
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
13
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
14
Tarot Card: येत्या आठवड्यात वर्ष बदलतेय, त्याबरोबर भाग्यही बदलणार? वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
15
भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
16
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात भाजपा-शिंदेसेनेची युती अधांतरी, कार्यकर्त्यांत संभ्रम; गिरीश महाजनांना साकडं
17
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
18
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
19
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
20
Post Office Investment Scheme: दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांवर चलान फाडतात; पण माहिती देत नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 20:14 IST

औरंगाबाद पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या वाहतूक शाखेतर्फे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारक, चालकांवर ई-चलान प्रणालीद्वारे कारवाई करण्यात येत आहे

ठळक मुद्देशहरात १७ हजार २६१ वाहनधारकांचे चलान प्रलंबित

औरंगाबाद : शहरात रस्त्यावरून जाणाऱ्या शेकडो वाहनांवर विविध नियमांचा भंग केल्यामुळे ई-चलान फाडण्यात येते. वाहनचालकाला थांबवून ही कारवाई होत नसल्यामुळे चलान फाडण्यात आले की नाही, याची माहितीच संबंधितांना होत नाही. त्यामुळे शहरात तब्बल १७ हजार २६१ वाहनधारकांनी ई-चलान फाडल्यानंतर दंड भरलेला नाही. वाहनधारकांना आपल्या वाहनांवर एवढा दंड असल्याची माहिती पोहोचविण्याची कोणतीही यंत्रणा वाहतूक पोलीस, मोटार वाहन विभागाकडे अस्तित्वात नसल्याची बाब समोर आली आहे.

औरंगाबाद पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या वाहतूक शाखेतर्फे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारक, चालकांवर ई-चलान प्रणालीद्वारे कारवाई करण्यात येत आहे. चौकाचौकांत वाहतूक पोलीस हातातील मोबाईलमध्ये वाहनाचा फोटो काढून ई-चलान फाडतात. हे चलान फाडल्यानंतर दिवसभरात केलेल्या कारवायांची आकडेवारी जुळविण्यात येते. पोलीस कर्मचारी दिलेले टार्गेट पूर्ण करतात. हे करीत असताना वाहनधारकांकडून त्याची किती वसुली होते, याकडे कोणाचेही लक्ष देत नसल्याचे दंड थकीत असलेल्या वाहनांच्या संख्येवरून स्पष्ट झाले आहे.

औरंगाबाद शहरातच कारवाईनंतर १७ हजार २६१ वाहनधारकांनी दंड भरलेला नाही. या कारवाईतील बहुतांश वाहनधारकांना चलान फाडण्यात आल्याची माहितीच नसते. आरटीओकडे नाेंद असलेल्या वाहनांसोबत मोबाईल नंबर अपडेट नसतो. आरटीओ कार्यालयात नोंदणी अर्जावर मोबाईल क्रमांक नमूद केला जात नाही अथवा चुकीचा मोबाईल नंबर नमूद केला जातो. त्यामुळे वाहनधारकांना कारवाईची माहिती होत नाही. यातून दंडाची रक्कम वाढतच जाते. याशिवाय वाहतूक पोलीसही सतत ई-चलान घेत असल्यामुळे वाहनधारकांना अडवून चौकशी करीत नसल्याचे पाहणीत समोर आले. तसेच आपल्या वाहनांवर काही दंड आहे का, हे पाहण्यासाठी शासनाच्या वेबसाईटवर जाऊन गाडी नंबर आणि चेसिस नंबर टाकून पाहावे लागते. काही स्मार्ट वाहनधारक काही दंड आहे का, याची पाहणी करतात. मात्र, प्रत्येकालाच ते शक्य होत नसल्याचे दिसून आले.

वाहनधारकांनी अधिक काळजी घ्यावी वाहनधारकांना आपण कोठे नियमांचा भंग केला हे पूर्णपणे माहीत असते. तसेच सगळे काही ऑनलाईन असल्यामुळे त्यावर नंबर टाकून पाहावे. तेव्हा सगळ्या गोष्टी समोर येतात. पोलीस असेल किंवा आरटीओ विभाग हे कारवाई करीत असतात. वाहनधारकांनी अधिक काळजी घेतली पाहिजे.- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस