शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

वाहनांवर चलान फाडतात; पण माहिती देत नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 20:14 IST

औरंगाबाद पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या वाहतूक शाखेतर्फे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारक, चालकांवर ई-चलान प्रणालीद्वारे कारवाई करण्यात येत आहे

ठळक मुद्देशहरात १७ हजार २६१ वाहनधारकांचे चलान प्रलंबित

औरंगाबाद : शहरात रस्त्यावरून जाणाऱ्या शेकडो वाहनांवर विविध नियमांचा भंग केल्यामुळे ई-चलान फाडण्यात येते. वाहनचालकाला थांबवून ही कारवाई होत नसल्यामुळे चलान फाडण्यात आले की नाही, याची माहितीच संबंधितांना होत नाही. त्यामुळे शहरात तब्बल १७ हजार २६१ वाहनधारकांनी ई-चलान फाडल्यानंतर दंड भरलेला नाही. वाहनधारकांना आपल्या वाहनांवर एवढा दंड असल्याची माहिती पोहोचविण्याची कोणतीही यंत्रणा वाहतूक पोलीस, मोटार वाहन विभागाकडे अस्तित्वात नसल्याची बाब समोर आली आहे.

औरंगाबाद पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या वाहतूक शाखेतर्फे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारक, चालकांवर ई-चलान प्रणालीद्वारे कारवाई करण्यात येत आहे. चौकाचौकांत वाहतूक पोलीस हातातील मोबाईलमध्ये वाहनाचा फोटो काढून ई-चलान फाडतात. हे चलान फाडल्यानंतर दिवसभरात केलेल्या कारवायांची आकडेवारी जुळविण्यात येते. पोलीस कर्मचारी दिलेले टार्गेट पूर्ण करतात. हे करीत असताना वाहनधारकांकडून त्याची किती वसुली होते, याकडे कोणाचेही लक्ष देत नसल्याचे दंड थकीत असलेल्या वाहनांच्या संख्येवरून स्पष्ट झाले आहे.

औरंगाबाद शहरातच कारवाईनंतर १७ हजार २६१ वाहनधारकांनी दंड भरलेला नाही. या कारवाईतील बहुतांश वाहनधारकांना चलान फाडण्यात आल्याची माहितीच नसते. आरटीओकडे नाेंद असलेल्या वाहनांसोबत मोबाईल नंबर अपडेट नसतो. आरटीओ कार्यालयात नोंदणी अर्जावर मोबाईल क्रमांक नमूद केला जात नाही अथवा चुकीचा मोबाईल नंबर नमूद केला जातो. त्यामुळे वाहनधारकांना कारवाईची माहिती होत नाही. यातून दंडाची रक्कम वाढतच जाते. याशिवाय वाहतूक पोलीसही सतत ई-चलान घेत असल्यामुळे वाहनधारकांना अडवून चौकशी करीत नसल्याचे पाहणीत समोर आले. तसेच आपल्या वाहनांवर काही दंड आहे का, हे पाहण्यासाठी शासनाच्या वेबसाईटवर जाऊन गाडी नंबर आणि चेसिस नंबर टाकून पाहावे लागते. काही स्मार्ट वाहनधारक काही दंड आहे का, याची पाहणी करतात. मात्र, प्रत्येकालाच ते शक्य होत नसल्याचे दिसून आले.

वाहनधारकांनी अधिक काळजी घ्यावी वाहनधारकांना आपण कोठे नियमांचा भंग केला हे पूर्णपणे माहीत असते. तसेच सगळे काही ऑनलाईन असल्यामुळे त्यावर नंबर टाकून पाहावे. तेव्हा सगळ्या गोष्टी समोर येतात. पोलीस असेल किंवा आरटीओ विभाग हे कारवाई करीत असतात. वाहनधारकांनी अधिक काळजी घेतली पाहिजे.- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस