शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पीक कर्ज मंजुरीसाठी विभागीय कार्यालयात माराव्या लागणार चकरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 00:16 IST

बँकांच्या विभागीय कार्यालयातून गृहकर्जास मंजुरी मिळत असते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र बँकेने एक निर्णय घेतला आहे. ज्या शाखेचे एनपीएचे (थकीत कर्ज) प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे, तेथे नवीन पीक कर्ज मंजुरीचा व्यवस्थापकांचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. असे कर्ज मंजुरीचे निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येणार आहेत. यामुळे कर्ज मंजुरीची गती वाढणार आहे, असा दावा बँकेने केला असला प्रत्यक्षात मात्र, शेतकऱ्यांना विभागीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार आहेत.

ठळक मुद्देनिर्णय : गृहकर्जाच्या धर्तीवर पीक कर्जही मंजूर होणार महाराष्ट्र बँकेच्या वरिष्ठ पातळीवरून

औरंगाबाद : बँकांच्या विभागीय कार्यालयातून गृहकर्जास मंजुरी मिळत असते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र बँकेने एक निर्णय घेतला आहे. ज्या शाखेचे एनपीएचे (थकीत कर्ज) प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे, तेथे नवीन पीक कर्ज मंजुरीचा व्यवस्थापकांचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. असे कर्ज मंजुरीचे निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येणार आहेत. यामुळे कर्ज मंजुरीची गती वाढणार आहे, असा दावा बँकेने केला असला प्रत्यक्षात मात्र, शेतकऱ्यांना विभागीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार आहेत.संपूर्ण मराठवाडा दुष्काळात होरपळून निघाला आहे. शेतकरी तर हवालदिल झाले आहेत. तसेच यंदा मान्सूनचे भकीतही निराशाजनक असल्याचे सांगितल्या जात आहे. यामुळे बळीराजाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. त्यात नवीन पीक कर्जाचे प्रस्ताव सादर करणाऱ्यांना आता आपले बँकेचे व्यवहार चोख ठेवावे लागणार आहेत. नवीन पीक कर्ज मंजूर करणे पहिले शाखा व्यवस्थापकाच्या हाती होते. महाराष्ट्र बँकेने आता शाखा व्यवस्थापकाकडून ते अधिकार काढून घेतले आहेत व वरिष्ठ अधिकाºयांला अधिकार दिले आहेत. कारण, बँकेच्या म्हणण्यानुसार थकीत पीक कर्जाची संख्या वाढत आहे. यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. महाराष्ट्र बँकेच्या अहवालानुसार औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत मिळून ६३ शाखा आहेत. कृषी कर्जाची थकबाकी ३८९ कोटी ८३ लाख इतकी असून एनपीए २८.८३ टक्के एवढा आहे. लातूर विभागात १३७ कोटी ५९ लाख थकबाकी असून, एनपीएचे प्रमाण १८.२५ टक्के आहे. अकोला विभागात १२६ कोटी ४४ लाख रुपये थकबाकी असून, १८.२५ टक्के एनपीए आहे. जळगाव विभागात १०९ कोटी १९ लाख थकबाकी (एनपीए १५.०३ टक्के) आहे. यासंदर्भात मागील महिन्यात महाराष्ट्र बँकेची एक बैठक झाली. त्यात वाढत्या एनपीएचा मुद्दा गाजला होता. ज्या शाखांमध्ये १५ टक्क्यांपेक्षा अधिक एनपीए आहे, तेथील नवीन पीक कर्ज प्रकरणे विभागीय कार्यालयातून करण्याचा निर्णय घेण्यात आला. या नवीन निर्णयामुळे खरीप हंगामात मराठवाडा व विदर्भातील कृषी कर्जाचा विषय चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक