शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नवीन पीक कर्ज मंजुरीसाठी विभागीय कार्यालयात माराव्या लागणार चकरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 00:16 IST

बँकांच्या विभागीय कार्यालयातून गृहकर्जास मंजुरी मिळत असते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र बँकेने एक निर्णय घेतला आहे. ज्या शाखेचे एनपीएचे (थकीत कर्ज) प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे, तेथे नवीन पीक कर्ज मंजुरीचा व्यवस्थापकांचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. असे कर्ज मंजुरीचे निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येणार आहेत. यामुळे कर्ज मंजुरीची गती वाढणार आहे, असा दावा बँकेने केला असला प्रत्यक्षात मात्र, शेतकऱ्यांना विभागीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार आहेत.

ठळक मुद्देनिर्णय : गृहकर्जाच्या धर्तीवर पीक कर्जही मंजूर होणार महाराष्ट्र बँकेच्या वरिष्ठ पातळीवरून

औरंगाबाद : बँकांच्या विभागीय कार्यालयातून गृहकर्जास मंजुरी मिळत असते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र बँकेने एक निर्णय घेतला आहे. ज्या शाखेचे एनपीएचे (थकीत कर्ज) प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे, तेथे नवीन पीक कर्ज मंजुरीचा व्यवस्थापकांचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. असे कर्ज मंजुरीचे निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येणार आहेत. यामुळे कर्ज मंजुरीची गती वाढणार आहे, असा दावा बँकेने केला असला प्रत्यक्षात मात्र, शेतकऱ्यांना विभागीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार आहेत.संपूर्ण मराठवाडा दुष्काळात होरपळून निघाला आहे. शेतकरी तर हवालदिल झाले आहेत. तसेच यंदा मान्सूनचे भकीतही निराशाजनक असल्याचे सांगितल्या जात आहे. यामुळे बळीराजाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. त्यात नवीन पीक कर्जाचे प्रस्ताव सादर करणाऱ्यांना आता आपले बँकेचे व्यवहार चोख ठेवावे लागणार आहेत. नवीन पीक कर्ज मंजूर करणे पहिले शाखा व्यवस्थापकाच्या हाती होते. महाराष्ट्र बँकेने आता शाखा व्यवस्थापकाकडून ते अधिकार काढून घेतले आहेत व वरिष्ठ अधिकाºयांला अधिकार दिले आहेत. कारण, बँकेच्या म्हणण्यानुसार थकीत पीक कर्जाची संख्या वाढत आहे. यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. महाराष्ट्र बँकेच्या अहवालानुसार औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत मिळून ६३ शाखा आहेत. कृषी कर्जाची थकबाकी ३८९ कोटी ८३ लाख इतकी असून एनपीए २८.८३ टक्के एवढा आहे. लातूर विभागात १३७ कोटी ५९ लाख थकबाकी असून, एनपीएचे प्रमाण १८.२५ टक्के आहे. अकोला विभागात १२६ कोटी ४४ लाख रुपये थकबाकी असून, १८.२५ टक्के एनपीए आहे. जळगाव विभागात १०९ कोटी १९ लाख थकबाकी (एनपीए १५.०३ टक्के) आहे. यासंदर्भात मागील महिन्यात महाराष्ट्र बँकेची एक बैठक झाली. त्यात वाढत्या एनपीएचा मुद्दा गाजला होता. ज्या शाखांमध्ये १५ टक्क्यांपेक्षा अधिक एनपीए आहे, तेथील नवीन पीक कर्ज प्रकरणे विभागीय कार्यालयातून करण्याचा निर्णय घेण्यात आला. या नवीन निर्णयामुळे खरीप हंगामात मराठवाडा व विदर्भातील कृषी कर्जाचा विषय चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक