शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

चिकलठाणा विमानतळाचा 'कृषी उडान- २.०' मध्ये समावेशासास केंद्र सरकार सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 18:38 IST

Aurangabad International Airport : चिकलठाणा विमानतळाचा या योजनते समावेश झाला तर औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतीमाल देशाच्या विविध बाजारपेठेत कमी वेळेत पोहचेल.

औरंगाबाद : शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा म्हणून शेतमाल (कृषी उत्पादन) कमीत कमी वेळेत देशातील विविध बाजारपेठांमध्ये वेळेवर पोहोचावे याकरिता चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा (Aurangabad International Airport ) कृषी उडान-२.० ( Krushi Uddan Scheme ) योजनेत समावेश करण्याबाबत सकारात्मक असल्याचे केंद्रिय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia ) यांनी एका पत्राद्वारे कळवले आहे. याबाबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक सल्लागार समितीचे सदस्य तथा खासदार इम्तियाज जलील ( Imtiaz Jalil ) यांनी मागणी केली होती. जर समावेश झाला तर या निर्णयाचा मोठा फायदा औरंगाबाद जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याला होणार आहे.  औरंगाबाद जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल होत असून उत्पादनात झपाट्याने वाढ होत आहे. देशातील इतर बाजारपेठेत येथील शेतमाल कमीतकमी वेळेत पोहचविण्याची व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना मालाचा योग्य मोबदला मिळत नाही. यात मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागते. यासाठी शेतमालाची कमीतकमी वेळेत हवाई मार्गाने वाहतूक करणे आवश्यक आहे, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना दिनांक ०५ डिसेंबर २०२१ रोजी दिलेल्या पत्रातून केली होती. याबाबत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कृषी उडान योजनेत औरंगाबादसह मराठवाड्याचा समावेश करण्याच्या व्यवहार्यतेचा भविष्यात नागरी विमान वाहतूक मंत्रालय सकारात्मक विचार करणार असल्याचे खा. जलील यांना कळविले आहे. चिकलठाणा विमानतळाचा या योजनते समावेश झाला तर औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतीमाल देशाच्या विविध बाजारपेठेत कमी वेळेत पोहचेल. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळण्यास मदत होईल.

काय आहे कृषी उडान योजना २.०कृषी उत्पादन योजना १.० ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय मार्गावर शेतकऱ्यांना कृषी उत्पादनांच्या वाहतुकीत मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. जेणेकरून अनेक मूल्यांची प्राप्ती सुधारू शकेल. ऑक्टोबर २०२१ मध्ये सुरू करण्यात आलेली, कृषी उडान योजना २.० मध्ये डोंगराळ भाग, ईशान्येकडील राज्ये आणि आदिवासी भागातील नाशवंत मालवाहू उत्पादनांच्या वाहतुकीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या योजनेचा उद्देश सर्व कृषी उत्पादनांसाठी, विशेषत: देशाच्या ईशान्य, डोंगराळ आणि आदिवासी भागातून उद्भवलेल्या सवलतीच्या, विनाव्यत्यय आणि वेळेनुसार हवाई वाहतूक सुनिश्चित करणे हा आहे.

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळImtiaz Jalilइम्तियाज जलील