शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

माणगाव परिषदेचे शताब्दी वर्ष विद्यापीठ साजरे करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:52 IST

कोल्हापूरमधील माणगाव येथे १९२० मध्ये राजर्षी शाहू महाराज यांनी आयोजित सभेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची देशपातळीवर ओळख झाली. या ऐतिहासिक घटनेचे शताब्दी वर्ष कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ आणि येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संयुक्तरीत्या साजरे करणार आहे, अशी माहिती कुलगुरू देवानंद शिंदे यांनी गुरुवारी (दि.१३) पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देविद्यापीठ : १९२० ला शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांची झाली होती सभा

औरंगाबाद : कोल्हापूरमधील माणगाव येथे १९२० मध्ये राजर्षी शाहू महाराज यांनी आयोजित सभेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची देशपातळीवर ओळख झाली. या ऐतिहासिक घटनेचे शताब्दी वर्ष कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ आणि येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संयुक्तरीत्या साजरे करणार आहे, अशी माहिती कुलगुरू देवानंद शिंदे यांनी गुरुवारी (दि.१३) पत्रकार परिषदेत दिली.राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे होते. १९२० ला कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव येथे शाहू महाराजांनी मागासवर्गीयांची परिषद आयोजित केली होती. या परिषदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रथमच शाहू महाराजांनी, ‘मागासवर्गीयांनो तुम्हाला तुमचा नेता मिळाला’ असे सांगून बाबासाहेब हे देशाचे नेते आहेत असे त्यांच्या भाषणातून जाहीर केले. या ऐतिहासिक घटनेचे हे शताब्दी वर्ष आहे. हे वर्ष कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ आणि येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संयुक्तरीत्या साजरे करणार आहे. या माध्यमातून दोन्ही विद्यापीठे विविध उपक्रम राबवून महापुरुषांना अभिवादन करतील, अशी माहिती कुलगुरू देवानंद शिंदे यांनी दिली.परिषदेची माहिती व्यापक व्हावीमाणगाव परिषद ही घटना मोठी असून, याबद्दल पुरेसे बोलले जात नाही. यानंतरच खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा घटनाकार म्हणून उदय झाला. नव्या पिढीला याची माहिती व्हावी, या घटनेची व्यापकता वाढून प्रबोधन व्हावे या हेतूने दोन्ही विद्यापीठे हे शताब्दी वर्ष साजरे करणार असल्याचेही कुलगुरू शिंदे यांनी सांगितले.व्यवस्थापन सुधार हेच लक्षविद्यापीठातील शिक्षक-विद्यार्थी, कर्मचारी- अधिकारी यात सुसंवाद व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे कुलगुरू शिंदे यांनी सांगितले. तसेच सध्या सुरू असलेल्या सीईटी आणि त्यानंतर प्रवेश प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडणे हे मुख्य काम आहे. विद्यापीठात विद्यार्थी हे केंद्रस्थानी असून, शिक्षक हा गाभा असून येथील बौद्धिक संपदेचा योग्य वापर करण्यासंदर्भात योग्य निर्णय घेण्यात येतील. विविध विभागातील रिक्त पदांवर सीएसबीवरील प्राध्यापकांच्या नियुक्त्या प्राधान्याने करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. यासोबतच विद्यार्थिनी वसतिगृहातील अडचणी स्वत: जाऊन पाहणार असल्याची माहितीसुद्धा कुलगुरू शिंदे यांनी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रuniversityविद्यापीठ