शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

गोठ्यास आग; दीड लाखांचे नुकसान

By admin | Updated: March 27, 2016 23:47 IST

वारंगा फाटा : कळमनुरी तालुक्यातील भोसी येथील एका गोठ्यास आग लागून शेतीउपयोगी साहित्य जळून राख झाल्याने जवळपास दीड लाखांचे नुकसान झाल्याची घटना २६ मार्च रोजी सायंकाळी घडली.

वारंगा फाटा : कळमनुरी तालुक्यातील भोसी येथील एका गोठ्यास आग लागून शेतीउपयोगी साहित्य जळून राख झाल्याने जवळपास दीड लाखांचे नुकसान झाल्याची घटना २६ मार्च रोजी सायंकाळी घडली.संतोष रामभाऊ कदम यांचे कुटूंबिय शेतातील कामे आटोपून घरी गेले होते. सायंकाळी साडेसात वाजता त्यांच्या शेतातील गोठ्यास अचानक आग लागली. सदरील घटनेची माहिती मिळताच संतोष कदम यांचे कुटुंबिय, पं.स.सदस्य विजय अवचार, गजानन अवचार व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने रौद्ररुप धारण केल्याने ती आटोक्यात येवू शकली नाही. या आगीत शेतीपयोगी साहित्य, शेणखत, औजारे, गुरांना खावायास ठेवलेले सोयाबीनचे कुटार, विद्युतपंप, वायर, पीव्हीसी पाईप, टीनपत्रे, फवारणीचे पेट्रोलपंप आदींचे मिळून जवळपास दीड लाखावर नुकसान झाले आहे. तसा पंचनामा तोंडापूर येथील तलाठी एन.एल. देशमुख यांनी विजय अवचार, माधव अवचार, मारोती व्यवहारे, योगेश देवकते, टोपाजी कदम या पंचासमक्ष केला आहे. सुदैवाने जिवीतहानी टळली. दरम्यान गोठ्यास आग लागून झालेल्या नुकसानीमुळे संतोष कदम यांच्यावर ऐन दुष्काळात नवे संकट आले आहे. ही आग कशामुळे लागली? याचे कारण समजू शकले नाही. आगीत सर्व शेतीपयोगी साहित्य व गुरांचा अन्न म्हणून वापरण्यात येणारे कुटार जळाल्याने सर्व गोष्टी नव्याने खरेदी करणे म्हणजे दुष्काळात सदरील शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. (वार्ताहर)