शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा अमृतमहोत्सव जोरदारपणे साजरा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:05 IST

औरंगाबाद : पंतप्रधानांनी जाहीर केल्यानंतर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभरात विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे. हैदराबाद मुक्तिसंग्राम स्वातंत्र्यलढ्याचा भाग आहे. ...

औरंगाबाद : पंतप्रधानांनी जाहीर केल्यानंतर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभरात विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे. हैदराबाद मुक्तिसंग्राम स्वातंत्र्यलढ्याचा भाग आहे. या लढ्याचा अमृतमहोत्सव आगामी १७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. हे अमृतमहोत्सवी वर्ष विविध उपक्रमांनी साजरे केले पाहिजे, या मागणीचा ठराव ४१व्या मराठवाडा साहित्य संमेलनात मंजूर केला.

निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त होऊन स्वतंत्र भारतात सामील होण्यासाठी इथल्या जनतेने मोठा लढा दिला आहे. त्यामुळे एक वर्ष उशिराने का होईना, १७ सप्टेंबर १९४८ रोजी या प्रदेशाला स्वातंत्र्य मिळाले आणि हा प्रदेश भारतीय संघराज्याचा अविभाज्य भाग झाला. येत्या १७ सप्टेंबरपासून हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षाला सुरुवात होत आहे. या मुक्तिलढ्याची प्रेरक आठवण लोकांमध्ये कायम राहावी, या लढ्यातील हुतात्मे आणि स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण जागते राहावे, यासाठी येत्या वर्षी सुरू होणाऱ्या अमृतमहोत्सवी वर्षात शासकीय आणि अशासकीय स्तरांवर वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जावे, अशी मागणी हे साहित्य संमेलन करीत आहे. ‘मराठवाडा साहित्य परिषद’ ही या लढ्याचे हत्यार म्हणून स्थापन झालेली संस्था आहे. या संस्थेने मुक्तिसंग्रामात मोलाची भूमिका बजावलेली आहे. म्हणून वर्षभर सांस्कृतिक, भाषिक आणि वाङ्मयीन उपक्रम राबविण्यासाठी या संस्थेला राज्य व केंद्र शासनाने वर्षारंभीच विशेष अनुदान द्यावे, अशीही मागणी ठरावाद्वारे केली. याशिवाय संमेलनात एकूण दहा ठराव मंजूर करण्यात आले.

चौकट,

इतर मंजूर ठराव

- मराठी भाषा विकास प्राधिकरण स्थापन करावे.

- मराठी भाषा विद्यापीठ आगामी वर्षांपासून कार्यान्वित व्हावे.

- प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मराठी भाषा समिती स्थापन केल्याबद्दल शासनाचे अभिनंदन.

- समृद्धी महामार्गाला मराठवाड्यातील सर्वच जिल्हे जोडण्यात यावेत.

- सर्वच शाळांमध्ये मराठीला प्रथम भाषेचा दर्जा द्यावा.

- शेतकरीविरोधी धोरण तत्काळ थांबवावे.

- मराठी भाषिकांना रेल्वे विभागात नोकरी मिळावी.

- जागतिक वारसा असलेली वेरूळ, अजिंठा ही ऐतिहासिक स्थळे लोकल रेल्वेमार्गाने जोडावीत.