शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

रेल्वे आगीचे कारण गुलदस्त्यात

By admin | Updated: October 27, 2014 00:13 IST

औरंगाबाद : नांदेड- मनमाड पॅसेंजरला औरंगाबाद- दौलताबाद रेल्वेस्थानकादरम्यान आग लागल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद : नांदेड- मनमाड पॅसेंजरला औरंगाबाद- दौलताबाद रेल्वेस्थानकादरम्यान आग लागल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जळालेल्या बोगीत एक स्टोव्ह आढळून आला, या स्टोव्हमुळे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर शॉर्टसर्किट, ब्रेक लायनरमधील तांत्रिक दोष, एखाद्या प्रवाशाने बिडी- सिगारेट पेटविण्याचा प्रयत्न केल्यानंतर ही आग लागली का, या सर्व दिशांनी तपास करण्यात येत आहे. या तपासासाठी रेल्वेच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती गठीत करण्यात आल्याचे विभागीय व्यवस्थापक पी.सी. शर्मा यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) पी.सी. शर्मा यांच्यासह नांदेड, औरंगाबाद येथील अधिकाऱ्यांनी जळालेल्या बोगीची पाहणी केली. दुर्घटनाग्रस्त बोगीला घटनास्थळी सोडून नांदेड- मनमाड पॅसेंजर सात बोगींसह पहाटे ३.३५ वाजता दौलताबाद स्थानकाकडे रवाना झाली, तर दुर्घटनाग्रस्त बोगीचा मागील भाग ४ वाजता औरंगाबाद स्थानकावर रवाना झाला. या रेल्वेगाडीतील प्रवाशांना रेल्वे प्रशासनातर्फे दौलताबाद स्थानकावर पाणी आणि खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. घटनेनंतर या रेल्वेने मनमाडकडे जाण्याचे प्रवाशांनी टाळले. यावेळी त्यांनी अन्य रेल्वेने पुढे जाण्यास प्राधान्य दिले. या दुर्घटनेनंतर अंधार आणि रेल्वे रुळाच्या बाजंूच्या झाडांमुळे प्रवाशांची धावपळ उडाली होती.रेल्वेगाड्यांची देखभाल अन दुरुस्तीकडे दुर्लक्षनांदेड-मनमाड पॅसेंजरच्या बोगीला आग लागलेल्या घटनेमागे शार्टसर्किट, ब्रेक लायनरमधील तांत्रिक दोष आदी कारणांची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा स्थितीमुळे रेल्वेगाड्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे दक्षिण मध्य रेल्वेचे दुर्लक्ष होत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पूर्णा येथे रेल्वेचे मेन्टेनन्स केले होते. ते पूर्वीप्रमाणे सुरूकरावे, अशी मागणी या घटनेनंतर जोर धरत आहे.गेल्या काही वर्षांत देशभरात रेल्वेगाड्यांच्या बोगींना आग लागल्याच्या घटना वेळोवेळी उघडकीस आल्या; परंतु त्यांची पुनरावृत्ती टाळण्यात रेल्वे प्रशासनाला अपयश येत असल्याचे रविवारी पहाटे झालेल्या घटनेनंतर दिसून येत आहे. अशा घटनेमागे शार्टसर्किट, रेल्वेगाडीच्या ब्रेकच्या घर्षणाची शक्यता वर्तविण्यात आली. त्यामुळे जीवित हानी टाळण्यासाठी या बाबींकडे रेल्वे प्रशासनाने अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे; परंतु त्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या गाड्यांच्या बोगी आणि इंजिन यांची पुणे, कल्याण आदी ठिकाणी देखभाल दुरुस्ती केली जाते.काही वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाने पूर्णा येथील लोको शेड हलविला. अन्य ठिकाणी रेल्वे बोगी, इंजिन, ब्रेक यांची तपासणी केली जात आहे; परंतु देखभाल आणि दुरुस्तीसाठी डिझेल लोको शेड पूर्णा येथेच कायम ठेवण्याची मागणी केली जात आहे. त्याकडे रेल्वे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. दुरुस्तीकडे दुर्लक्षरविवारी पहाटे घडलेल्या घटनेनंतर रेल्वेगाड्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे होत असलेल्या दुर्लक्षाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येथे जवळपास कोठेच रेल्वेच्या देखभाल दुरुस्तीची व्यवस्था नसल्याने बोगींमधील वायरिंग, ब्रेक तपासणी योग्य पद्धतीने नाही. रेल्वे प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळेच अशा दुर्घटना घडत आहेत. अशा दुर्घटना टाळण्यासाठी पूर्णा येथेच डिझेल लोको शेड सुरूकरण्याची आवश्यकता असल्याचे रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी म्हटले.फॉरेन्सिककडूनही तपासणीघटनेमागे घातपाताचीही शक्यता नाकारता येत नसल्याने रेल्वे अधिकाऱ्यांनी जळालेल्या रेल्वे बोगीची फॉरेन्सिकच्या पथकाकडून तपासणी करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनीही फॉरेन्सिक तपासणी करण्याची सूचना केली. यानंतर रविवारी दुपारी न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेचे सहायक संचालक ए.बी. भंगाळे व त्यांच्या टीमने घटनास्थळी जाऊन त्या बोगीची तपासणी केली, तसेच तेथून काही नमुने गोळा करून ते प्रयोगशाळेत नेले. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. रेल्वेसेवेवर परिणामघटनेमुळे मनमाड- काचीगुडा पॅसेंजर ही २६ आॅक्टोबरला दौलताबाद- मनमाड आणि मनमाड- दौलताबाद स्थानकादरम्यान अंशत: रद्द करण्यात आली, तर रात्री १.२२ वाजता रवाना होणारी हैदराबाद- अजमेर एक्स्प्रेस गाडी सकाळी ६ वाजेच्या सुमारास औरंगाबाद स्थानकाहून रवाना झाली. काकीनाडा- नगरसोल ही गाडी उशिरा धावली....तर मोठी दुर्घटनादुर्घटनेनंतर रेल्वे मिटमिट्याजवळ रेल्वे रुळावर थांबली होती. याचवेळी मनमाडमार्गे जाणारी हैदराबाद- अजमेर एक्स्प्रेस रात्री दीड वाजेच्या सुमारास औरंगाबाद स्थानकावर आली. घटनेची माहिती मिळाल्याने ही गाडी स्थानकावरच थांबविण्यात आली. माहिती मिळण्यास थोडाही उशीर झाला असता, तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.न्ोमके कारण चौकशीनंतरचआगीचे नेमके कारण सांगता येणार नाही. विविध शक्यतांची पडताळणी केली जाईल. घटनेच्या चौकशीसाठी चार अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली. या अपघातात कुणीही जखमी झालेले नाही, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक पी.सी. शर्मा यांनी सांगितले.नांदेड-मनमाड पॅसेंजर रेल्वेच्या बोगीला आग लागलेल्या घटनेनंतर औरंगाबाद येथील रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. औरंगाबाद स्थानकावर ही गाडी आल्यानंतर गाडीची तपासणी करण्याकडे दुर्लक्ष आणि हलगर्जीपणा केल्याबद्दल त्यांना निलंबित केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.