शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या बाबतीत औरंगाबादला मुंबई होऊ देऊ नका; केंद्रीय पथकाच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 20:08 IST

  राज्यात कोरोनामुळे मृत्यूचा दर ३ टक्के इतका आहे, तर शहरात ५.४ टक्के इतका असल्यामुळे केंद्रीय पथकाने मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंंगच्या माध्यमातून आढावा घेतला.

ठळक मुद्देमृत्यूदर कमी करण्यावर लक्ष केंद्रित कराआॅक्सिजन बेड तयार ठेवा

औरंगाबाद : आतापर्यंत शहरात १०८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात कोरोनामुळे मृत्यूचा दर ३ टक्के इतका आहे, तर शहरात ५.४ टक्के इतका असल्यामुळे केंद्रीय पथकाने मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंंगच्या माध्यमातून आढावा घेतला. यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्यूचा दर कमी करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करा, अशी सूचना पथकातील अधिकारी व राज्याचे प्रभारी कुणालकुमार यांनी केली.  औरंगाबादची मुंबई होऊ देऊ नका, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. 

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्रीय पथकाचे प्रमुख कुणालकुमार, नागपूर एम्स रुग्णालयाचे अतिरिक्त प्रोफेसर डॉ. अरविंदसिंग कुशवाह, सहायक प्रोफेसर डॉ. सितिकांता बॅनर्जी यांनी मंगळवारी दुपारी दीड वाजता औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंंगच्या माध्यमातून आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी करून त्यांना मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, किडनी यासारख्या आजारांमुळे त्यांच्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाले तरी ते लवकर कळत नाही. त्यामुळे त्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. त्याकरिता अशा ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्यात, लवकरात लवकर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची सोय करावी, जेणेकरून त्यांना वेळीच उपचार मिळतील, तसेच त्यांच्यावर अधिक लक्ष ठेवण्यात यावे. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या संपर्कात राहून त्यांची वेळोवेळी माहिती घ्यावी, अशा सूचना कुणालकुमार यांनी मनपा आयुक्तांना केल्या. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर ती वाढू शकते, ही शक्यता गृहीत धरून आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली पाहिजे. विशेषकरून २० टक्के लोकांना आॅक्सिजनची गरज पडू शकते. त्याकरिता आॅक्सिजन बेड तयार ठेवा, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांना करण्यात आली.

९ हजार रुग्णांच्या भरतीची व्यवस्थामहापालिकेने आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा आयुक्तांनी सादर केला. शहरातील घाटी, सिव्हिल, मनपा कोविड केअर सेंटर यासह खासगी रुग्णालयांत ८० टक्के बेड राखीव ठेवण्यात आले असून, ९ हजार रुग्णांना भरती करून त्यांच्यावर उपचार करण्याची सोय करण्यात आली आहे. त्यासोबतच क्रिटिकेअर असलेल्या रुग्णांना आयसीयू, आॅक्सिजन, व्हेटिंलेटर असलेले  ७५८ बेड तयार ठेवण्यात आले असल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद