शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

कोरोनाच्या बाबतीत औरंगाबादला मुंबई होऊ देऊ नका; केंद्रीय पथकाच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 20:08 IST

  राज्यात कोरोनामुळे मृत्यूचा दर ३ टक्के इतका आहे, तर शहरात ५.४ टक्के इतका असल्यामुळे केंद्रीय पथकाने मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंंगच्या माध्यमातून आढावा घेतला.

ठळक मुद्देमृत्यूदर कमी करण्यावर लक्ष केंद्रित कराआॅक्सिजन बेड तयार ठेवा

औरंगाबाद : आतापर्यंत शहरात १०८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात कोरोनामुळे मृत्यूचा दर ३ टक्के इतका आहे, तर शहरात ५.४ टक्के इतका असल्यामुळे केंद्रीय पथकाने मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंंगच्या माध्यमातून आढावा घेतला. यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्यूचा दर कमी करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करा, अशी सूचना पथकातील अधिकारी व राज्याचे प्रभारी कुणालकुमार यांनी केली.  औरंगाबादची मुंबई होऊ देऊ नका, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. 

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्रीय पथकाचे प्रमुख कुणालकुमार, नागपूर एम्स रुग्णालयाचे अतिरिक्त प्रोफेसर डॉ. अरविंदसिंग कुशवाह, सहायक प्रोफेसर डॉ. सितिकांता बॅनर्जी यांनी मंगळवारी दुपारी दीड वाजता औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंंगच्या माध्यमातून आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी करून त्यांना मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, किडनी यासारख्या आजारांमुळे त्यांच्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाले तरी ते लवकर कळत नाही. त्यामुळे त्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. त्याकरिता अशा ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्यात, लवकरात लवकर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची सोय करावी, जेणेकरून त्यांना वेळीच उपचार मिळतील, तसेच त्यांच्यावर अधिक लक्ष ठेवण्यात यावे. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या संपर्कात राहून त्यांची वेळोवेळी माहिती घ्यावी, अशा सूचना कुणालकुमार यांनी मनपा आयुक्तांना केल्या. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर ती वाढू शकते, ही शक्यता गृहीत धरून आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली पाहिजे. विशेषकरून २० टक्के लोकांना आॅक्सिजनची गरज पडू शकते. त्याकरिता आॅक्सिजन बेड तयार ठेवा, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांना करण्यात आली.

९ हजार रुग्णांच्या भरतीची व्यवस्थामहापालिकेने आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा आयुक्तांनी सादर केला. शहरातील घाटी, सिव्हिल, मनपा कोविड केअर सेंटर यासह खासगी रुग्णालयांत ८० टक्के बेड राखीव ठेवण्यात आले असून, ९ हजार रुग्णांना भरती करून त्यांच्यावर उपचार करण्याची सोय करण्यात आली आहे. त्यासोबतच क्रिटिकेअर असलेल्या रुग्णांना आयसीयू, आॅक्सिजन, व्हेटिंलेटर असलेले  ७५८ बेड तयार ठेवण्यात आले असल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद