शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
3
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
4
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
5
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
6
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
7
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
8
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
9
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
10
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
11
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
12
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
13
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
14
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
15
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
16
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
17
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
18
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
19
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
20
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

बोगस कर्मचारी भरती प्रकरणात औरंगाबाद मनपाच्या दहा अधिकार्‍यांवर दोषारोपपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 13:19 IST

महानगरपालिकेत २०१०-१४ या चार वर्षांमध्ये लाडपागे समितीच्या शिफारशीअंतर्गत तब्बल १८८ बोगस कर्मचार्‍यांची भरती करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी शासनाने पुणे परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तुकाराम मुंडे यांच्यामार्फत केली. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने दहा दोषी अधिकार्‍यांवर दोषारोपपत्र शासनाकडे दाखल केले.

ठळक मुद्दे महानगरपालिकेत २०१०-१४ या चार वर्षांमध्ये लाडपागे समितीच्या शिफारशीअंतर्गत तब्बल १८८ बोगस कर्मचार्‍यांची भरती करण्यात आली होती.याप्रकरणी गंभीर स्वरुपाची अनियमितता झाली असल्याने या ११ अधिकार्‍यांविरुद्ध नागरी सेवा नियम १९७९ मधील नियम ८ नुसार संयुक्त विभागीय चौकशी करण्यास मान्यता

औरंगाबाद : महानगरपालिकेत २०१०-१४ या चार वर्षांमध्ये लाडपागे समितीच्या शिफारशीअंतर्गत तब्बल १८८ बोगस कर्मचार्‍यांची भरती करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी शासनाने पुणे परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तुकाराम मुंडे यांच्यामार्फत केली. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने दहा दोषी अधिकार्‍यांवर दोषारोपपत्र शासनाकडे दाखल केले.

मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सांगितले की, या अधिकार्‍यांमध्ये तत्कालीन उपायुक्त अजय चारठाणकर, तत्कालीन मुख्य लेखापरीक्षक विलास जाधव, विद्यमान उपायुक्त रवींद्र निकम, सी. एम. अभंग, महावीर पाटणी, नाथा चव्हाण यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीच्या अनियमिततेस १० अधिकारी जबाबदार ठरत असल्यामुळे संबंधित अधिकार्‍यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केली असल्याचे सिद्ध होते. याप्रकरणी गंभीर स्वरुपाची अनियमितता झाली असल्याने या ११ अधिकार्‍यांविरुद्ध नागरी सेवा नियम १९७९ मधील नियम ८ नुसार संयुक्त विभागीय चौकशी करण्यास मान्यता दिली आहे. चौकशी सुरू करण्यासाठी १० अधिकार्‍यांचे दोषारोपाचे प्रारूप सरकारकडे पाठविण्याचे आदेश मनपा आयुक्तांना देण्यात आले होते.

अडीच महिन्यांनंतर दोषारोपपत्र सादरमुख्यमंत्री कार्यालयातून १५ नोव्हेंबर रोजी मनपा आयुक्तांना पत्र प्राप्त होताच विभागीय चौकशी करण्यासाठी दोषारोपपत्र सादर करण्याचे पत्र प्राप्त झाल्यानंतर आयुक्तांनी अधिकार्‍यांची समिती गठीत केली होती. या समितीने तत्कालीन अधिकार्‍यांचे दोषारोपपत्र तयार केले. हे दोषारोपपत्र तयार करण्यासाठी अडीच महिन्यांचा कालावधी लागला. दहा अधिकार्‍यांचे दोषारोपपत्र तयार करून विभागीय चौकशीसाठी सरकारकडे पाठविण्यात आले असल्याचे आयुक्त मुगळीकर यांनी सांगितले. 

भरती प्रकरणात अडकलेले अधिकारी विजय जावरे यांचे निधन झाले, तर तत्कालीन उपायुक्त अजय चारठाणकर हे सध्या उपायुक्त पदावर नाशिक महानगरपालिकेत कार्यरत आहेत. उपायुक्त (महसूल) रवींद्र निकम, पदनिर्देशित अधिकारी सी. एम. अभंग, वॉर्ड अधिकारी महावीर पाटणी, नाथा चव्हाण हे सध्या महानगरपालिकेत कार्यरत आहेत. तसेच तत्कालीन आस्थापना अधिकारी सपना वसावा या मुख्याधिकारी म्हणून नगरपालिकेत कार्यरत आहेत. तत्कालीन मुख्य लेखापरीक्षक विलास जाधव हे सेवानिवृत्त झाले आहेत. तर तत्कालीन मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे, मो.रा. थत्ते हे वित्त विभागात बदलीच्या ठिकाणी कार्यरत आहेत. विधि सल्लागार ओ. सी. शिरसाट हे सेवानिवृत्त झाले आहेत. जावरे यांचे निधन झाल्यामुळे त्यांचे दोषारोपपत्र सादर करण्यात आले नाही. १८८ कर्मचार्‍यांची नियमबाह्यपणे भरती केली. याप्रकरणी कर्मचार्‍यांबद्दल कोणती भूमिका घ्यावी, याकरिता मार्गदर्शन करावे असे पत्र सरकारकडे पाठविण्यात आल्याचे आयुक्त मुगळीकर यांनी सांगितले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबादCorruptionभ्रष्टाचार