शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

चाऱ्यावाचून गुरांचा दावणीला पीळ

By admin | Updated: August 5, 2015 00:36 IST

बीड : कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडलेला शेतकरी आता जितराबाच्या काळजीने पूरता हातबल झाला आहे. धन्यासाठी राबराब राबणारा सर्जा अन् दुभती गाय

 

बीड : कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडलेला शेतकरी आता जितराबाच्या काळजीने पूरता हातबल झाला आहे. धन्यासाठी राबराब राबणारा सर्जा अन् दुभती गाय दावणीलाच पोटाला पिळ देते. हे बघताना बळीराजाचे काळीज पावसाअभावी करपडलेल्या पिकांसारखं करपत आहे. कुटुंबातल्या सदस्या इतकेच महत्वाचे असलेले जितराब आपल्या धन्याकडे पाहून हांबरते, तेव्हा आमचा जीव कासावीस होतो, अशा भावनिक प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी दिल्या आहेत. शासनस्तरावरून पशुपालनासाठी केवळ योजना आहेत, मात्र त्यासाठी निधी नसल्याने योजनांचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना होत नाही, ही वस्तूस्थिती आहे. आज घडीला जिल्ह्यात शून्य टक्के चारा आहे. आता जणावरांना खायला द्यायचे काय? असा प्रश्न पशुमालकांपुढे उभा ठाकला आहे. जनावरांना उसाचे वाढे व उस कांड्या खाऊ घातल्याने जनावरांच्या आरोग्याचे प्रश्न उपस्थित होऊ लागले असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आता ‘जितराब जगवायचं कसं’ असा सवाल जिल्हयातील साडेआठ लाख पशुमालकांनी उपस्थित केला असून याचे उत्तर आज घडीला प्रशासनाकडे देखील नाही. याबाबत जिल्हयातील परिस्थितीचा घेतलेला आढावा... पशुपालनाला व शेतकऱ्यांच्या कृषी व्यावसायाला चालना मिळावी यादृष्टीकोणातून राष्ट्रीय कृषी विकास योजना शासनाने सुरू केली. या योजने अंतर्गत गतवर्षी तीन कोटी रूपयाचा निधी मंजूर करून शेतकऱ्यांसाठी एकूण ११० कडबाकुटी वाटप केल्या.मात्र यंदा बळीराजा दुष्काळाच्या परिस्थितीत होरपळत असताना देखील शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत निधी दिलेला नाही. ४आजवर झाड पाल्याला तोंड न लावणाऱ्या जनावरांना अक्षरश: लिंबाचा पाला टाकण्याची वेळ आली आहे. पशुमालक जड अंत:करणाने जितराबांना झाडपाला टाकत आहेत. या दिवसात शेतकऱ्याकडे कडब्याची गंज असते. मात्र यंदा दुष्काळाने उध्वस्त झालेल्या बळीराजाला आपल्या लाडक्या जितराबांना कडू लिंबाचा पाला टाकण्याची वेळ आली आहे. अशी बिकट परिस्थिती जिल्ह्यात असताना देखील एकही छावणी शासनाने उभारली नाही. जिल्ह्यातल्या आठ लाख जितराबांच्या पोटाचा पिळ ना शासनाला दिसतोय.. ना जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांना...