शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
2
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
3
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
4
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
5
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
6
कपडे फाडले; लाथा मारल्या, धमकी दिली, जगतापांनी आयोगाला दिलेल्या तक्रार अर्जात धक्कादायक बाबी समोर
7
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
8
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
9
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  
10
४ ग्रह, ४ राजयोग: १० राशींवर लक्ष्मी प्रसन्न, भरघोस भरभराट; बक्कळ पैसा, बंपर लाभ, वरदान काळ!
11
धक्कादायक! गाण्याचा आवाज कमी करायला सांगितल्याने पती चिडला, पत्नीवर फेकले टॉयलेट क्लीनर
12
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बनवले तरुणींचे अश्लील व्हिडीओ; ७ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
13
ऑपरेशन सिंदूर: सैन्याने IPS अधिकाऱ्याचा सन्मान का केला? पाकिस्तानचा रहीम यार खान एअरबेस जवळच होता...
14
बुलेट ट्रेनचं देशातील पहिलं रेल्वे स्टेशन बांधून तयार, या दोन स्थानकांदरम्यान धावणार पहिली ट्रेन
15
Somavati Amavasya 2025: पितरांच्या फोटोची जागा तर अयोग्य नाही? सोमवती अमवास्येला करा बदल!
16
Nuclear Weapon : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय... 
17
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
18
Corona Virus : मास्क लावायला हवा का, बूस्टर डोसची गरज आहे का, कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट किती संसर्गजन्य?
19
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
20
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी

चाऱ्यावाचून गुरांचा दावणीला पीळ

By admin | Updated: August 5, 2015 00:36 IST

बीड : कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडलेला शेतकरी आता जितराबाच्या काळजीने पूरता हातबल झाला आहे. धन्यासाठी राबराब राबणारा सर्जा अन् दुभती गाय

 

बीड : कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडलेला शेतकरी आता जितराबाच्या काळजीने पूरता हातबल झाला आहे. धन्यासाठी राबराब राबणारा सर्जा अन् दुभती गाय दावणीलाच पोटाला पिळ देते. हे बघताना बळीराजाचे काळीज पावसाअभावी करपडलेल्या पिकांसारखं करपत आहे. कुटुंबातल्या सदस्या इतकेच महत्वाचे असलेले जितराब आपल्या धन्याकडे पाहून हांबरते, तेव्हा आमचा जीव कासावीस होतो, अशा भावनिक प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी दिल्या आहेत. शासनस्तरावरून पशुपालनासाठी केवळ योजना आहेत, मात्र त्यासाठी निधी नसल्याने योजनांचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना होत नाही, ही वस्तूस्थिती आहे. आज घडीला जिल्ह्यात शून्य टक्के चारा आहे. आता जणावरांना खायला द्यायचे काय? असा प्रश्न पशुमालकांपुढे उभा ठाकला आहे. जनावरांना उसाचे वाढे व उस कांड्या खाऊ घातल्याने जनावरांच्या आरोग्याचे प्रश्न उपस्थित होऊ लागले असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आता ‘जितराब जगवायचं कसं’ असा सवाल जिल्हयातील साडेआठ लाख पशुमालकांनी उपस्थित केला असून याचे उत्तर आज घडीला प्रशासनाकडे देखील नाही. याबाबत जिल्हयातील परिस्थितीचा घेतलेला आढावा... पशुपालनाला व शेतकऱ्यांच्या कृषी व्यावसायाला चालना मिळावी यादृष्टीकोणातून राष्ट्रीय कृषी विकास योजना शासनाने सुरू केली. या योजने अंतर्गत गतवर्षी तीन कोटी रूपयाचा निधी मंजूर करून शेतकऱ्यांसाठी एकूण ११० कडबाकुटी वाटप केल्या.मात्र यंदा बळीराजा दुष्काळाच्या परिस्थितीत होरपळत असताना देखील शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत निधी दिलेला नाही. ४आजवर झाड पाल्याला तोंड न लावणाऱ्या जनावरांना अक्षरश: लिंबाचा पाला टाकण्याची वेळ आली आहे. पशुमालक जड अंत:करणाने जितराबांना झाडपाला टाकत आहेत. या दिवसात शेतकऱ्याकडे कडब्याची गंज असते. मात्र यंदा दुष्काळाने उध्वस्त झालेल्या बळीराजाला आपल्या लाडक्या जितराबांना कडू लिंबाचा पाला टाकण्याची वेळ आली आहे. अशी बिकट परिस्थिती जिल्ह्यात असताना देखील एकही छावणी शासनाने उभारली नाही. जिल्ह्यातल्या आठ लाख जितराबांच्या पोटाचा पिळ ना शासनाला दिसतोय.. ना जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांना...