शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

चाऱ्यावाचून गुरांचा दावणीला पीळ

By admin | Updated: August 5, 2015 00:36 IST

बीड : कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडलेला शेतकरी आता जितराबाच्या काळजीने पूरता हातबल झाला आहे. धन्यासाठी राबराब राबणारा सर्जा अन् दुभती गाय

 

बीड : कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडलेला शेतकरी आता जितराबाच्या काळजीने पूरता हातबल झाला आहे. धन्यासाठी राबराब राबणारा सर्जा अन् दुभती गाय दावणीलाच पोटाला पिळ देते. हे बघताना बळीराजाचे काळीज पावसाअभावी करपडलेल्या पिकांसारखं करपत आहे. कुटुंबातल्या सदस्या इतकेच महत्वाचे असलेले जितराब आपल्या धन्याकडे पाहून हांबरते, तेव्हा आमचा जीव कासावीस होतो, अशा भावनिक प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी दिल्या आहेत. शासनस्तरावरून पशुपालनासाठी केवळ योजना आहेत, मात्र त्यासाठी निधी नसल्याने योजनांचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना होत नाही, ही वस्तूस्थिती आहे. आज घडीला जिल्ह्यात शून्य टक्के चारा आहे. आता जणावरांना खायला द्यायचे काय? असा प्रश्न पशुमालकांपुढे उभा ठाकला आहे. जनावरांना उसाचे वाढे व उस कांड्या खाऊ घातल्याने जनावरांच्या आरोग्याचे प्रश्न उपस्थित होऊ लागले असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आता ‘जितराब जगवायचं कसं’ असा सवाल जिल्हयातील साडेआठ लाख पशुमालकांनी उपस्थित केला असून याचे उत्तर आज घडीला प्रशासनाकडे देखील नाही. याबाबत जिल्हयातील परिस्थितीचा घेतलेला आढावा... पशुपालनाला व शेतकऱ्यांच्या कृषी व्यावसायाला चालना मिळावी यादृष्टीकोणातून राष्ट्रीय कृषी विकास योजना शासनाने सुरू केली. या योजने अंतर्गत गतवर्षी तीन कोटी रूपयाचा निधी मंजूर करून शेतकऱ्यांसाठी एकूण ११० कडबाकुटी वाटप केल्या.मात्र यंदा बळीराजा दुष्काळाच्या परिस्थितीत होरपळत असताना देखील शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत निधी दिलेला नाही. ४आजवर झाड पाल्याला तोंड न लावणाऱ्या जनावरांना अक्षरश: लिंबाचा पाला टाकण्याची वेळ आली आहे. पशुमालक जड अंत:करणाने जितराबांना झाडपाला टाकत आहेत. या दिवसात शेतकऱ्याकडे कडब्याची गंज असते. मात्र यंदा दुष्काळाने उध्वस्त झालेल्या बळीराजाला आपल्या लाडक्या जितराबांना कडू लिंबाचा पाला टाकण्याची वेळ आली आहे. अशी बिकट परिस्थिती जिल्ह्यात असताना देखील एकही छावणी शासनाने उभारली नाही. जिल्ह्यातल्या आठ लाख जितराबांच्या पोटाचा पिळ ना शासनाला दिसतोय.. ना जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांना...